Author: bittambatami.com

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सुनिल तटकरे यांनी घेतला आढावा

महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम  पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

उत्तर, पश्चिम भारतात परिवर्तनाचे वारे का?

मागोवा भागा वरखडे नेहमी उत्तम यश मिळवून देणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपच्या ६७ जागा कमी होणे हा निवडणुकांना कलाटणी देणारा मुद्दा भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरला.…

प्रभू रामचंद्र आणि हनुमंताने फिरविली पाठ; अहंकाराच्या उडाल्या ठिकऱ्या !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशातील सुमारे शंभर कोटी मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत अनेकांचे ‘हिशेब’ चुकते केले. धर्माचा आणि प्रभू रामचंद्र तसेच महावीर हनुमंताच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांकडे…

गरज नव्या शैक्षणिक धोरणाची…

महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

दिल्लीश्वरांचे पुन्हा शिक्कामोर्तब नवी दिल्ली: देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यावर आज दिल्लीश्वरांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले. आगामी विधानसभा निवडणूक भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असून फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…

महायुतीत ‘बोंबा बोंब’

संजय शिरसाठांची भुजबळ तर, मिटकरींची भाजपाविरोधात बोंब स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस दिवसागणिक सार्वजनिक होऊ लागली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याच्या नादात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते दुसऱ्या पक्षाविरोधात बोंब…

रिक्षा, टॅक्सी चालकांनाही आता ग्रॅच्युईटी मिळणार !  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट  मुंबई :  रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा  मुख्यमंत्री शिंदेंनी केली…

विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

११ जागांसाठी १२ जुलैला मतदान मुंबई   : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहि. विधानसभा सदस्यांमधून निवडून दिलेले विधान परिषदेतील ११ सदस्य…

मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…