Author: bittambatami.com

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार १९ जून रोजी आयोजन करण्यातयेणार आहे. मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळासाडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन आर नामदे, राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस बी काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी गडावर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी या साठी करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही व यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. तत्पूर्वी जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणाना निर्देश दिले.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १,१६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत असून निवडणूक कर्मचारी, सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी; तसेच मतदान यंत्र, साहित्य मतदान केंद्रात सोडण्याचे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत घेऊन येण्यासाठी एसटी, बेस्ट बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या ६२९ बस धावणार असून, एसटीच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात १,१६१ बस धावतील. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यापासून ते पाचव्या टप्प्यांपर्यंत एसटी महामंडळाने राज्यभरात एकूण ८,९४५ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यासह ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात मतदान होईल. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे. तर, पालघर लोकसभा मतदारसंघात २५४ बस, ठाणे, भिवंडी, कल्याण ६५ बस, नाशिक आणि दिंडोरी ५१५ बस, धुळ्यासाठी २०० बस धावणार आहेत. अशा एकूण एसटीच्या १,१६१ बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह उपनगरांतही लागू आहे. मुंबई उपगनरात ३८२ बस मुंबई शहरात २१२ बस अशा एकूण ५९४ बस धावणार आहेत. तर, मुंबई शहर भागात व्हीलचेअर असलेल्या १० आणि उपनगरांत २५ अशा एकूण ३५ बस धावणार आहेत. १८ ते २० मेपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ६२९ बसगाड्या संपूर्ण मुंबईभर धावणार आहेत. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच बेस्ट बसलाही तेवढीच रक्कम मिळणार असल्याने एकूण महसूल कोट्यवधीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असे बेस्ट उपक्रमातील आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २० मे रोजी मुंबईकरांचा प्रवास अवघड निवडणुकीच्या कामात बेस्ट उपक्रमातील बस उपलब्ध केल्याने २० मे रोजी मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बसची संख्या अपुरी असेल. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे.

सलग तिस-या दिवशीही अनधिकृत होर्डिंगविरोधी  कारवाईत 10 मोठे होर्डींग निष्कासित

3 दिवसात 31 आकाराने मोठे होर्डींग हटवले – वाशीगावाजवळील अवाढव्य होर्डींगचाही समावेश नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींगविरोधी धडक मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सलग तिस-या दिवशीही प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या आकाराचे 10 होर्डींग निष्कासित करण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने बैठक घेत परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागामार्फत लगेचच अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या समुहाने धडाकेबाज कारवाई करीत पहिल्या दिवशी सायं. 6 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत नमुंमपा क्षेत्रातील 15 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग निष्कासित केले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करीत 6 मोठे होर्डींग हटविण्यात आले. ही अनधिकृत मोहीम तिस-या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवत 18 मे रोजी पहाटेपर्यंत 10 मोठे होर्डींग सुरक्षितपणे निष्कासित करण्यात आले असून सलग 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले आहेत. 17 मे पासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहीमेत सायन पनवेल रोडनजिक वाशीगाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डींग हटविण्याची कारवाई 2 दिवस अहोरात्र काम करून करण्यात आली असून त्याठिकाणचे 4 होर्डींग निष्कासित करण्यात आले आहेत. नेरूळ विभागातही हर्डिलिआ कंपनीनजिक सायन पनवेल रोडशेजारी लक्ष्मीवाडी या ठिकाणी असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आलेले आहेत. ऐरोली विभागात ऐरोली – पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर 20 येथील होर्डींग तसेच ऐरोली सेक्टर 9 दिवागाव येथे वंदना अपा. येथील होर्डिंग अशी 2 मोठी अनधिकृत होर्डींग हटविण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील रबाले रेल्वेस्टेशन समोर मोनार्क हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे अनिधकृत होर्डींग विरोधातील धडक मोहीमेत तिस-या दिवशी 10 मोठे अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले असून त्यामध्ये वाशीगाव येथील प्रचंड मोठ्या होर्डींगचाही समावेश आहे. अशाप्रकारे 15 तारखेपासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग हटविण्याची कारवाई करण्यात आली असून होर्डींग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासोबतच हायवे लगतची मोठी होर्डींग काढताना रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेत अशा ठिकाणची होर्डींग मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत काढण्यात आली आहेत. ही अनधिकृत होर्डींग विरोधातील कारवाई आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त व सर्वच विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी आणि कामगार करीत आहेत

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान…

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचे आवाहन ठाणे : देशासाठी  सैनिक करतात बलिदान… तुम्ही करा ना मतदान .. असा संदेश मतदान जनजागृती करण्यासाठी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात “संवाद मतदारांचा… संकल्प मतदानाचा” या सुसंवाद कार्यक्रमात ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मतदारांना दिला. देशाच्या सीमेवर सैनिक आपले रक्षण करीत असल्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करीत आहेत. सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत..आपण निदान मतदान तरी करावे, असा संदेश या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मनोज शिवाजी सानप यांनी दिला. सीमेवर देशाचे रक्षण करताना शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे या वीरमातेची गाथा त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून उभी केली. देशासाठी सैनिक म्हणून मुलाचे बलिदान हा अभिमान आणि दुसरीकडे मुलगा गमावल्याचे आईचे दु:ख हा प्रसंग एका वीरमातेच्या भूमिकेतून त्यांनी साकारला. आज सीमेवर सैनिक रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान देत आहेत, मग आपल्याला तर फक्त मतदान करावयाचे आहे, असे आवाहन करीत मतदान नक्की करा आणि आपली भारतीय लोकशाही बळकट करा, हे असे आवाहन वीरमाता मतदारांना करीत असल्याचा प्रसंग मनोज सानप यांनी साकारला. मतदान हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने बजावणे आपला अधिकार आहे. सैनिक सीमेवर बलिदान करीत आहेत, आपल्याला फक्त मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे, असे जनजागृतीपर आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार दि. 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी २५- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत सखी मतदान केंद्रे : १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ४३६ (रॉयल कॉलेज), १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.४३९ (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. २ तळमजला), १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९९ (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन १ रोड नं. २२ वागळे इस्टेट, ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २६५ (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १५२ (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर ५, ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.१२४ (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांग मतदान केंद्रे- १४५ मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९१ (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३२६ (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे )  कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३०६ (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं २ गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८३ (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १४१ (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16),  बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २०५ (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर ११ प्लॉट नं. ९ नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत. युवा मतदान केंद्रे  – मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९६ (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं १), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३३२ (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १७० (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३५३ (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं ३, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १६९ (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर ७ दिवा गांव ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८ (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

एसटीपी ठेकेदाराकडुन रस्ते पूर्ववत करण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू !

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी माथेरान : दरवर्षी माथेरान मध्ये अडीचशे ते तीनशे इंच पावसाची नोंद होते. अतिवृष्टीमुळे नेहमीच रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून जात असल्याने रस्त्यांची वाताहत होते यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने माथेरान या अतिसंवेदनशील क्षेत्रात रस्त्याची धूप थांबविण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गावातील अनेक ठिकाणी सुरुवातीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते त्यानंतर दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या मुख्य मार्गावर धुळीमुळे व्यापारी वर्गाचे दुकानातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान व्हायचे यासाठी हा मुख्य रस्ता धूळविरहित करण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून काम सुरू केले होते परंतु अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामावरसुध्दा नेहमीप्रमाणे आक्षेप घेण्यात आल्यामुळे हे महत्वपूर्ण काम अर्धवट स्थितीत आहे. नुकताच सांडपाणी प्रक्रिया कामी रस्त्यांची खोदाई करून मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली आहे.हे रस्ते खोदताना जे काढलेले पेव्हर ब्लॉक होते ते पुन्हा लावू नये असा पवित्रा  विकासाला विरोध करणाऱ्या गावातील काही मंडळींनी घेतला होता.त्यामुळे जर का ह्या खोदलेल्या रस्त्यांवर काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लावले नसते तर आगामी काळात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराघरात पावसाळी पाणी जाऊन वित्तहानी झाली असती याकामी गावातील अन्य काही अभ्यासू,गावाचे हित पाहणाऱ्या लोकांच्या आग्रहास्तव हे रस्ते अबाधित राहण्यासाठी, गावाची सुंदरता टिकून रहावी धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी संबंधीत ठेकेदाराला सूचित केल्यावर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत. सनियंत्रण समितीने मुख्य रस्त्यावरील नवीन क्ले पेव्हर ब्लॉकचा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्याने ब्लॉकचे नवीन काम बंद केले आहे. काही राजकीय पक्षांची मंडळी येथील काही भोळ्या भाबड्या लोकांना हाताशी धरून आतापर्यंत जी जी विकासकामे झाली आहेत त्यास केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी विकासाला विरोध करत आहेत. परंतु राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या वतीने येणाऱ्या विकासकामांला नाहक विरोध करून सर्वसामान्य लोकांचे आणि भावी पिढीला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात पर्यटन क्रांती घडवायची असेल तर विकास कामांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. श्रेयवादामुळे आर्थिक लाभासाठी झटणारी काही मंडळीना गावाबद्दल काहीही सहानुभूती नसून आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडेच त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. असे सूर सर्वत्र स्थानिकांमधून  ऐकावयास मिळत आहेत. ——————————————————- क्ले पेव्हर ब्लॉक ही माथेरानचे रस्ते बनविण्याकरिता काळाची गरज आहे. दर वर्षी माथेरान मध्ये जास्त पाऊस होत असल्यामुळे रस्ते वाहून जात होते याचा विचार करून मॉनेटरिंग कमिटीने क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धा रस्ता झाल्यानंतर या ब्लॉकला विरोध होतोय. दगड मातीचे रस्ते बनविन्याकरिता मोठया प्रमाणात दरवर्षी दगड माती उपलब्ध  होत नसल्याने भविष्यात  माथेरानचे संपूर्ण रस्ते बनविण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही. वसंत कदम—-अध्यक्ष शिवगर्जना मित्र मंडळ माथेरान

वर्तकनगर रहिवाशांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे !

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकास रखडल्याने वर्तकनगर येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आता या रहिवाशांनी  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नं. १२ इमारतीचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. पाठपुरावा करूनही विकासक दाद देत नव्हता. अखेर येथील ३२ कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी राजू फाटक यांनी विनंती करत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट करून दिली. आमदार प्रताप सरनाईक यांनी रहिवाशांच्या बैठकीत विकासकाला फोन केला. विकासकाने येत्या ८ दिवसात रहिवाशांशी चर्चा करतो असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांना लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शब्दाला मान देऊन मतदान बहिष्कार निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मतदान साहित्य पोहोचले मतदान केंद्रांवर !

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण,  ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना* बजावता येणार मतदानाचा हक्क – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण ६६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ   – एकूण मतदार – २०८७६०४ (पुरुष मतदार-११२९७१४, महिला मतदार- ९५७१९१, तृतीय पंथी मतदार-३३९, सेवा मतदार-३६०). भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68). शहापूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39). भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14) कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140). मुरबाड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83). कल्याण लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579). अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).…