Category: होम

उल्हासनगरात पप्पू कलानी व कुमार आयलानी आमने-सामने आल्याने दोन्ही गटात तणाव

  उल्हासनगर दि.20(सुनिल इंगळे ):- भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालया समोर पप्पू कलानी हे समर्थकासह समोर गेल्याने, दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. आयलानी यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन…

केतकी धुरेची 158 धावांची नाबाद खेळी; भारत सीसीचा मोठा विजय 

– एमसीए महिला क्रिकेट लीग 2024   मुंबई : मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत सीसीने तिसऱ्या एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस सीसीविरुद्ध 97 धावांनी विजय मिळवला. न्यू हिंद मैदान, माटुंगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मंगळवारी केतकी हिने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना 116 चेंडूमध्ये 22 चौकार आणि 4 षटकारांसह झंझावाती दीड शतकी खेळी केली. तिच्या फटकेबाज शतकी खेळीमुळे भारत सीसीने डाव 40 षटकांत 6 बाद 261 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ग्लोरियस सीसीचा डाव 40 षटकांत 8 बाद 164 धावांवर संपला. साध्वी संजय (७७ धावा) आणि वैष्णवी वर्मा (४८ धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारत सीसीकडून कशिश निर्मल ३७ धावांत २ आणि निर्वाण राणे २६ धावांत २ विकेट घेत मोठा विजय आणखी सुकर केला. डॉ. डी. वाय. पाटील एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लबला १३७ धावांनी पराभूत केले. स्वरा खेडेकरची नाबाद शतकी खेळी (115 चेंडू, 12 चौकार) तसेच लावण्या शेट्टी (8 धावांत 3 विकेट),  वर्षा नागरे (28 धावांत 3 विकेट), प्रिया मेहताने आणि मेगन रॉड्रिग्जची (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. प्रथम फलंदाजी करताना डी.वाय. पाटीलने 40 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी केआरपी इलेव्हन सीसीला 24.3 षटकांत अवघ्या 80 धावांत गुंडाळले. एका अन्य सामन्यात, भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या जान्हवी काटेने (धावा 110, 103 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार) आणखी एक शतक झळकावून एकतर्फी सामन्यात फोर्ट यंगस्टर्स सीसीला व्हिक्ट्री सीसीविरुद्ध 83 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. संक्षिप्त धावफलक: भारत सीसी – 40 षटकात 6 बाद 261 (केतकी धुरे 158* (116 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार), लक्ष्मी सरोज 37; दिशा चांडक 2/24, वैष्णवी वर्मा 2/38) वि. ग्लोरियस सीसी – ४० षटकांत ८ बाद १६४(साध्वी संजय ७७, वैष्णवी वर्मा ४८; कशिश निर्मल २/३७, निर्वाण राणे २/२६). निकाल  – भारत सीसी ९७ धावांनी विजयी. डॉ. डी. वाय. पाटील एसए – 40 षटकांत 5 बाद 217 (स्वरा खेडेकर 100* (115 चेंडू, 12 चौकार); चेतना कांबळे 2/31) वि. केआरपी इलेव्हन सीसी –…

बॉम्बे जिमखाना क्रिकेट निवडचाचणी २१ आणि २२ नोव्हेंबरला

मुंबई : बॉम्बे जिमखान्याच्या बीजी केअर्स (BG Cares) या सीएसआर उपक्रमातर्गत जिमखाना मैदानावर २१ आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट…

१८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, त्यांच्या मातोश्री शकुंतला ठाकूर, पत्नी वर्षा ठाकूर, बंधू परेश ठाकूर, अर्चना…

मतदारयादीतील घोळामुळे दिव्यांग मतदारांना नाहक त्रास

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बुधवारी धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे बहुसंख्य मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोहोचली नसल्यामुळे मतदान केंद्रात पोहोचल्यानंतर अनेकांना…

नाशिक-बोरिवली विद्युत बससेवा प्रारंभ

हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या सेवेस प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानानंतर बाहेर प्रवास करण्यास पसंती दिली. राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या बुधवारपासून सुरू झाल्या. मुंबई नाका परिसरातील महामार्ग ब स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक रोहिणी ठाकरे, प्रताप राजपूत आणि पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत नाशिक- बोरिवली शिवाई बसचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना पेढे तसेच गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण बस या मतदान प्रक्रियेत कार्यरत होत्या. यामुळे शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बससेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. प्रवाशांचा या बससेवेस चांगला प्रतिसाद राहिला. 0000

राज ठाकरेंच्या बनावट पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईः वरळीतील तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावटपत्र वायरल झाले असून त्यात राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात धनुष्यबाणाला समर्थन दिल्याचे नमुद करण्यात आले…

 “काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला”

विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल   वसई: मंगळवारच्या नोटा वाटप नाट्य प्रकरणानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे ठाकूर म्हणाले.  मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला. मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली होती. या प्रकरणात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या ३६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र आता बविआवर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपचे नव्हते तसेच हॉटेल ठाकुरांच्या मालकीचे होते असाही आरोप तावडे यांनी केला आहे. बुधवारी हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणामुळे भाजपाला फायदा होईल असे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपने मतदारांपर्यंत वाटले असा होतो. पैसे तुमचे, वाटले तुम्ही आणि फायदा देखील तुम्हाला होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. विवांता हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे होते असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. त्याला ठाकूर यांनी जोरदार उत्तर दिले. जर हॉटेल माझ्या मालकीचे होते तर भाजपने का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करून द्यावे असेही ते म्हणाले. विनोद विनोद तावडे काल विरार मध्ये असताना भिजलेला कोंबडीप्रमाणे बसले होते. मला सारखे फोन करता होते. आता मुंबईत गेल्यावर त्यांना कंठ फुटला असून ते आरोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले. ‘आज दिखेंगे तो पिटेंगे’ आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदारसंघामध्ये बाहेरची लोकं आल्याने हा वाद निर्माण झाला होता. आज जर पुन्हा कोणी बाहेरून आलेले दिसले तर त्याला पुन्हा फटकावणार असा इशाराही ठाकूर यांनी ‘दिखेंगे तो पिटेंगे’ या धर्तीवर दिला. 00000

तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई  ः तृतीयपंथी समाजाला मोठ्या संघर्षातून मतदानाचा हक्क मिळाला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी  बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तृतीयपंथी समाजाला मतदानाच्या हक्कापासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागते होते. आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. मुंबई व उपनगरात मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे वास्तव्य आहे. त्यात उपनगरात १,०७६ पेक्षा अधिक तृतीयपंथी राहतात. घाटकोपर, मानखुर्द, मानखुर्द, शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, धारावी, माहीम, दहिसर, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा व अन्य मतदान केंद्रांवर जाऊन तृतीयपंथींनी मतदान केले. कागदपत्राच्या अपुऱ्या अभावामुळे कित्येक तृतीयपंथींना मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान केल्याची भावना किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलाम खान यांनी व्यक्त केली आहे. ०००