Category: होम

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे. मुंबई शहरात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे लाखो रहिवासी आहेत, हा समाज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे चौगुले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी नाथपंथी डवरी समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.

काँग्रेस व डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या राजनाथसिंह यांनी माफी मागावी

 डॉ. बाबासाहेबांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून भाजपाकडूनच संविधाननिर्मात्यांचा अपमान – वर्षा गायकवाड मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनता पक्ष व आरएसएस यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वात पवित्र ग्रंथ संविधान दिले त्या संविधानाला भाजपा व आरएसएस मानत नाहीत. मनुवादी प्रवृत्तींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून संविधान व संविधाननिर्माते बाबासाहेब यांचा अपमान केला आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे ते सातत्याने खोटे व अपप्रचार करणारी माहिती पसरवत असतात. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही तेच केले असून काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत आहेत. राजनाथसिंह यांना माहित असायसा हवे की संविधानाला विरोध त्यांच्या मातृसंस्थेनेच केलेला आहे. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा भाजपा व आरएसएस खुलेआम करत आहे. ४०० पार चा नारा कशासाठी दिला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही. भाजपाच्या राज्यात आजही दलित व मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार होत आहेत. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आदर व सन्मान केला आहे. तत्कालीन मुंबई प्रांतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले व संविधानाची जबाबदारी दिली. पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. राजनाथसिंह सवयीप्रमाणे खोटे बोलले असून काँग्रेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी व माहिती पसरवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

जागर निष्ठेचा

कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांनी वाहिली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली कल्याण : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी आज सकाळी काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. हे स्मारक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भारतातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. बासरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारले गेले…

AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं;

आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघ्या काही तासांचा कालावधी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईहून दोन एबी फॉर्म पाठवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात शिंदेंनी दोघांना तिकीट देत बंडखोरीला हवा दिली. देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं. त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजश्री अहिरराव यांना शिंदेसेनेनं वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे. महायुतीत सीटिंग गेटिंगचा फॉर्म्युला ठरलेला असल्यानं देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पक्षानं विद्यमान खासदार सरोज अहिरे यांना तिकीट दिलं. पण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिररावदेखील…

हर्षित बोबडेची शतकी खेळी व्यर्थ

ठाणे : हर्षित बोबडेच्या दमदार शतकी खेळीनंतरही पहिल्या डावात अवघ्या एका धावेने पिछाडीवर पडल्यामुळे यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पर्धेतील प्रवास आटोपता घ्यावा लागला. सनराईझ क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील २३५ धावांना उत्तर देताना स्पोर्टिंग क्लब कमिटीने २३४ धावापर्यत मजल मारली होती. प्रथम फलंदाजी करताना अर्णव मिरगेच्या ७६ धावांच्या अर्धशतकी खेळीने सनराईझ क्रिकेट क्लबने द्विशतकी धावसंख्या उभारली. तन्मय मालुसरेने चार आणि आर्यन राजने तीन बळी मिळवले. उत्तरादाखल हर्षितने १२३ आणि स्पर्धेत फलंदाजीत छाप पाडणाऱ्या विवान हजारेच्या ४६ धावांच्या खेळीनंतरही स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शौर्य नवलेने चार फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावात सनराईझ क्रिकेट क्लबने २ बाद १०७ धावापर्यत मजल मारली होती. संक्षिप्त धावफलक : सनराईझ क्रिकेट क्लब : (पहिला डाव) : सर्वबाद २३५ ( अर्णव मिरगे ७६,तन्मय मालुसरे २०-६-६६-४,आर्यन राज १४-६-२२-३). दुसरा डाव : ३६ षटकात २ बाद १०७.…

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन 2024 स्पर्धा

हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन 24 द्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित माहिमकरने पुरुष आणि १७ वर्षांखालील मुले एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. महालक्ष्मी येथील वेलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत बिनसीडेड हर्षितने कमालीचे सातत्य राखताना पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित श्वेतांक कर्णिकवर ३४ मिनिटांमध्ये 21-13, 21-10 असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुले गटात दुसऱ्या सीडेड हर्षितने बिगरमानांकित सुमीत माडे याचा 21-16, 21-15 असा पराभव केला. १७ वर्षांखालील मुली एकेरीच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित खुशी पाहवाने अव्वल सीडेड श्रावनी पाटील हिला चुरशीच्या लढतीत 18-21, 21-14, 28 26 असे हरवले. अंतिम फेरीत…

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेसाठी १० लाखांची बक्षिसे जाहिर

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२४-२०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा रंगणार असून पुरुष गटातील पहिल्या ३२ तर महिला गटातील पहिल्या १६ विजेत्यांना मिळून एकंदर १० लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून बाहेर गावच्या खेळाडूंची निवास, चहापान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती प्रवेश अर्जासोबत असलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावरून करण्यात येईल.

चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई : उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने…

मिरा-भाईंदरच्या विकासात नरेंद्र मेहतांची महत्त्वाची भूमिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मीरा-भाईंदर : मिरा भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला  आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे…

जेव्हा गद्दारी झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड हेच पवारांसोबत पहाड बनून उभे राहिले – कन्हैय्या कुमार

 महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल – अजय राय अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्ष मागे जाऊन पहा, जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबतडॉ..जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या एमएप व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित  होते. आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी देशभरातील विविध मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाहि की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्याडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणा राज्यातील सत्ताधाऱ्यांना पहात आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे. पण, गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. हरयाणामध्ये आपण जिंकत होतो. मात्र, भाजपने गडबडी केली. म्हणूनच प्रत्येक मत महत्वाचे आहे. प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैय्या कुमार यांनी, खरी राष्ट्रवादी आणि डॉ..जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले. पण, आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही, हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला ‘गुमराह’ करीत आहेत. पण, त्यांनी हे लक्षात ठेवावे; त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही, असे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता ५० कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. कारण, गद्दारीचा पाया रचणारे उपमुख्यमंत्री धर्म…