Category: होम

इथे फक्तडॉ.. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन, कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक !

अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी  प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे. वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुराणी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करूनडॉ..जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे. १५ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा हा परिसर अविकसित होता. सन 2009 मध्येडॉ..जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी,  वीज या सर्व समस्या…

महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच उद्धव ठाकरेंसोबत – राजन राजे

‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे पक्षाध्यक्ष  राजन राजे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे,…

डहाणू मतदारसंघात विनोद निकोले यांच्यासाठी वृंदा करात मैदानात

अनिल ठाणेकर डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू (अज) मतदारसंघातील माकप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी निवडणूक सभांना संबोधित केले. तलासरी…

दिव्यांच्या चंदेरी सोनेरी तेजोमय प्रकाशाने न्हाऊन निघाली वाळकेश्वरची बाणगंगा 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात महिलाभगिनींचा मोठा सहभाग दिनेश मराठे  मुंबई : कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर शुक्रवारी सायंकाळी 7:30  ते 9:30 च्या दरम्यान पार्वतीपते हरहर महादेव च्या जयघोषात महामंगल असा देह चित्त भान हरपणारा नयनरम्य दीपोत्सव आणि महाआरती सोहळा मोठया हर्ष उल्हासात संपन्न झाला.या मनाला सुखद आनंद देणाऱ्या महाआरती सोहळ्याचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उत्तर प्रदेश येथील वाराणसी स्थित श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती साम्यमिंद्र तीर्थ स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्ष प्रविण कानविंदे,सेक्रेटरी शशांक गुळगुळे आणि सीईओ प्रोजेक्ट ऋत्विक औरंगाबादकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत केले. यंदाच्या 11 व्या वर्षी त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर भाविकांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या हर्षोल्हासात  ढोलताशाच्या गजरात हर हर शंभो जय शिव शंभूच्या जय घोषात दीपोत्सव आणि महाआरती संपन्न झाली.या महाआरतीला मुंबईसह ठाणे, डोंबिवली,कल्याण,कर्जत,कसारा येथून लोकं आली होती. बाणगंगेच्या दगडी पायर्‍यांच्या घाटावर बसलेल्या गंगाभक्तांच्या मुखातून हर हर महादेव आणि जय जय गंगे नमामी गंगे,हर हर शंभो जय शिव शंभूचा जयघोष सुरू होता.त्यात भगवी पताका डौलाने नाचवत ढोल ताशा पथकाने उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती. बाणगंगा काठावर सर्वत्र गगनभेदी घोषणा शंखनाद,केशरी ध्वज नृत्य, पाण्यात पोहणारे,बदकांचे थवे त्यात छोट्या 4 होड्यात फोटोसाठी छायाचित्रकारांची चाललेली लगबग,पायर्‍यावर बसलेली भाविक मंडळी पहायला मिळत होती.स्थानिक तरुण तरुणी, तर दूरवरून आलेले काही भाविक आपल्या पत्नी, लहानग्यांना घेऊन महाआरतीच्या जल्लोषात मग्न होती. त्यातही महिलांनी केलेला साजशृंगार  सर्वांचे चित्त आकर्षित करीत होती. चारही बाजूंनी दिव्यांचा लखलखाट प्रकाशमान होत असल्यामुळे येथे दीपोत्सवाच्या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बाणगंगेच्या किनारी उभारलेल्या खास सात स्टेजवर मंगलमय गणेश स्तुती,गंगा स्तुती, गीत गात सात षोडशी कन्या पारंपारिक वेषभूषा करीत भरत नाट्यम नृत्य करताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंदोत्सव झळकत होता. पौरोहित्य सादर करीत असलेल्या मंगलमय श्रीगणेश वंदना,रुद्र सूक्त,पुरुष सुक्त,श्रीसूक्त आणि शांती पाठाच्या मंगलमय वेद मंत्राच्या घोषाने वातावरणात अगदी वाराणसी येथील गंगा आरतीचा अनुभव निर्माण करीत होते तर किनारी बसुन मुली आणि  महिला गंगेत प्रज्वलन केलेले दीप सोडत होत्या.हे विलोभनीय वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते. हर हर महादेव या जयघोषात शिव तांडव स्तोत्र घेत उपस्थितांचे स्वागत केले गेले .प्रथम धूपारची, दीपारती आणि शेवटी महाआरती झाली.यावेळी सोहळे परिधान केलेले गळ्यातील रुद्राक्ष माला,भगवे अंगरखा या पारंपारिक वेषभूषा केलेले तरुण पुरोहित तालबद्ध होऊन महाआरती करीत होते. भाविकांनी पार्वतीपते हरहर महादेव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम च्या जय घोषात सारा बाणगंगा परीसर भाविकांनी  दुमदुमुन सोडला.त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, दुर्गे दुर्गटभारी, शिव तांडव स्तोत्र, पुरुष सूक्त,गंगा स्तुती, रामस्तुती,शिवपार्वती स्तुती आणि जल,वायू,आकाश, अग्नी आणि पृथ्वीचे आभार व्यक्त करीत वेद मंत्र,पौराणिक मंत्र म्हणत वातावरण एका दिव्य सोहळ्याचा आनंद भाविकांनी अनुभवला. येथील स्थानिक बाणगंगा रहिवाशी महिला पुरुष यानी घाट सजविण्यात मोठे सहकार्य केले.येथील घाटावर जागो जागी काढलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या रांगोळ्यांच्या…

निवडणूक आणि मैदानातले मुद्दे

महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील राजकारण खोके, गद्दार, धडा शिकवणार, करेक्ट कार्यक्रम करणार याभोवतीच फिरली. बराच वेळ मराठा आरक्षणाला कुरवाळण्यात गेला. भरीला लाडकी बहीण…

मुलांनो मैदानात या…

आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. २१ व्या शतकातील या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन, इंटरनेट हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. केवळ घरातील मोठ्या माणसंकडेच नव्हे…

टाटा समूह हवाई दलासाठी विमाने बनवणार

लष्करातील उत्पादने ‌‘मेड इन इंडिया‌’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने आता खासगी कंपन्याही विकसित करू लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा…

बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !

श्रध्दांजली योगेश ित्रवेदी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना…

ज्याला पाडायचे त्याला पाडा

भुजबळांच्या येवल्यात जरांगेचा एल्गार येवला : निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय मागे घेताना मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, मराठा बांधवांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडावे, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणावे. फक्त कोणताही…