Category: होम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्‍या प्रकांड पंडिताचा ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन. शोषित-वंचितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. बाबसाहेबांच्या निधनाची वार्ता देशासह जगभरात वाऱ्यासारखी पसरली होती. ही वार्ता ऐकून देशातील प्रत्येक नागरिकांना हंबरडा फुटला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव मुंबईत आल्यानंतर मुंबईत प्रचंड गर्दी झाली. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला असंख्य लोकं जमली. अक्षरशः मुंबई थांबली होती. बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. २५ कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर ५ गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या गोदीतील सुमारे २५ हजार कामगार आले होते, अशी आठवण डॉ.जितेंद्र आव्हाड करुन देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आचार्य अत्रे यांचे भाषण झाले. आचार्य अत्रे या भाषणात म्हणतात,असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’ आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत..? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली..? “महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत..! भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हा तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अशी शब्दुसमनांची आदरांजलीआमदारडॉ.जितेंद्रआव्हाडयांनी वाहिली आहे.

खारफुटीवरील भराव रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत

ठाणे : ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासानाने गेल्या काही महिन्यांपासून पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडी किनारी भागातील…

 अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

 महेक पोकरची धुवाधार शतकी खेळी   ठाणे : सलामीला आलेल्या  महेक पोकरची कर्णधारपदाला साजेशी धडाकेबाज शतकी खेळी हे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबवर मिळवलेल्या मोठया विजयाचे वैशिष्ट्य ठरली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टरी क्रिकेट क्लबने २९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबला ९१ धांवात गुंडाळत मोठा विजय साजरा केला. सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात महेक आणि अलीना मुल्ला या सलामीच्या जोडीने दिडशतकी भागीदारी रचत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३० चौकार आणि एक षटकारासह १५५ चेंडूत १८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अलिना ६१ धावांवर बाद झाल्यावर ही भागिदारी संपुष्टात आली. अलिनानाने अर्धशतकी खेळीत ११चौकार आणि एक षटकार ठोकला. महेकने १०१ चेंडूत २० चौकार मारत ११२ धावा केल्या. क्रितिका यादवने ४८ धावा केल्या. आकृती भोईरने  दोन, पलक धरमशी आणि दिपीका भारियाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना प्रियंका राठोड आणि पलक धरमशीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. प्रियंकाने ३१ आणि पलकने २९ धावा केल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाना दडपणाखाली ठेवताना अलिनानाने तीन, प्रिशा देवरुखकर, विधी मथुरिया आणि  तन्वी परबने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. शतकविर महेक पोकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्रिकेट क्लब : ४० षटकात ४ बाद २९३ ( महेक पोकर ११२, अलिना मुल्ला ६१, क्रितिका यादव ४८, आकृती भोईर ८-५९-२, पलक धरमशी ८-५९-१, दिपीका भारिया ३-२२-१) विजयी विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : ३०.१ षटकात ९१ ( प्रियंका राठोड ३१, पलक धरमशी २९, अलिना खान ८-१-२७-३, क्रितिका यादव ७-१-१८-१, प्रिशा देवरुखकर ६-१-२०-१, विधी मथुरिया २.१-३-१, तन्वी परब १-६-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : महेक पोकर (व्हिक्टरी क्रिकेट क्लब). 00000

Heading – ठाण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये आता सर्वंकष स्वच्छता मोहीम

शनिवारपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातून उपक्रमाला सुरुवात ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमधून या उपक्रमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ठराविक दिवशी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. या मोहिमेत दैंनदिन साफसफाईबरोबरच मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. आयुक्त राव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय या भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. अशा ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात आज, शनिवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव भागातील वस्तीमधून होणार आहे. कोट शहरातील मुख्य रस्त्यांपाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छताविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका ००००

जरंडी गाव राज्यात रोल मोडेल करणार – डॉ. विकास मीना

सोयगाव : जरंडीचा उत्कृष्ट विकास आहे त्यामुळे जरंडी गाव आता सोलार वीज जोडणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवून जरंडी गावात आता जिल्हा परिषदेच्या वतीने सोलार वीज पुरविण्यात येईल व गाव राज्यात रोल…

ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान 

 बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला. धार्मिक आणि सामाजिक समारंभ असलेल्या या सोहळ्यात  ह .भ.प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे पूजन करण्यात आले. त्यांनतर जवळपास ५० किलो पैशाची नाणी, मिठाई आणि सुकामेवा या साहित्यातून तुला करण्यात आली. विशेष म्हणजे  बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मातोश्री पार्वती यांचा सहा वर्षांपूर्वी सहस्रचंद्र सोहळा झाला होता. त्यानंतर हा सन्मान निवृत्तीबुवा चौधरी यांना मिळाला. त्यामुळे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या रूपाने भजन परंपरेचा अलौकिक सत्कार या निमिताने झाला. ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  मूळचे पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या उत्थानासाठी त्यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे. आजही त्यांचे हे कार्य पुढे सुरूच आहे. त्यांच्या शिकवणीतून तयार झालेले शिष्यांचीही या क्षेत्रात नाव उज्वल केले आहे.  ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या देखरेखीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी भावनेतून संपन्न झाला. दरम्यान या सोहळ्यात निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुश्राव्य भजनही झाले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी, शिवमाला पाटील, श्रुती पाटील यांचे अभंग गायन झाले. त्यांना नादब्रम्ह साधना परिवाराने साथ दिली.

तारापूर येथील अनेक कंपन्यांनी आमदार भाई जगताप यांच्या युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले

मुंबई : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५  डिसेंबर रोजी बोईसर मधील तारापूर एम्.आय.डि.सी.येथील मे. साळवी केमिकल्स लिमिटेड, मे. केशव…

आंबेकर स्मृती संतप्ताहाला आजपासून आरंभ!

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक स्व.गं.द. आबेकर यांच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ ७ ते १३ डिसेंबर पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमाने स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.संघटनेचे…

आंबोली – मांगेली वन पट्ट्यात आढळले ८ पट्टेरी वाघ…!

 वन विभागाकडून विविध उपाययोजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आंबोली – मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे. राज्याचा वनविभाग,सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कंझरवेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जानेवारी ते मे (२०२४) दरम्यान ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह ‘आणि  कर्नाटकातल्या ‘काली टायगर रिझर्व्ह’ या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असता सिंधुदुर्गातील आंबोली – मांगेली या कॉरिडॉर मध्ये ही नोंद झाली आहे. या वाघांमध्ये ५ मादी व ३ नर वाघांचा समावेश असून  वनखात्याने वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यात हे सर्व वाघ आणि वाघिणी कैद झाल्या आहेत.या आधी सुद्धा झालेल्या सर्वेक्षणात या पट्ट्यात वाघांचे वास्तव्य असल्याचे समोर आले होते.काही स्वयंसेवी सेवी संस्थानी ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये या परिसरात वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते.दोन वर्षापूर्वी आंबोली वनक्षेत्र  परिसरात वाघ एका गाईला खात असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.मात्र वन विभागाकडून वाघांचे अस्तित्व या परिसरात असल्याचे नाकारण्यात आले होते.काही महिन्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात भेकुर्ली परिसरात दिवसाढवळ्या वाघ वावरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वनशक्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आंबोली – मांगेली हा ‘व्याघ्र कॉरिडॉर ‘ म्हणून संरक्षित व्हावा यासाठी उच्च न्यायालयात एक सार्वजनिक हिताची याचिका दाखल केली होती व या परिसरात वाघांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी लावून धरली होती. संस्थेचे प्रमुख दयानंद स्टॅलिन यांनी या पट्ट्यात तब्बल ५० वाघांचा वावर असल्याचा दावा केला होता.अन्य एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आल्याचेही म्हटले होते. वनखात्याने सर्वेक्षण केल्यानंतर या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणात वाघांचे वास्तव्य समोर आल्याने आणि इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद झाल्याने वनविभाग आता सतर्क झाला आहे. या परिसरात वाघांचे वास्तव्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखात्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शिकारी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दोन तालुक्यातील ज्या गावांमध्ये या वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे ती सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेली २५ गावे ही ‘ ईको सेन्सिटिव्ह ‘ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य शासनाला दिले आहेत.

डॉ. नरेन्द्र जाधव  यांनी लिहिलेल्या डॉ आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन सकाळी ६ डिसेंबर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री…