Category: होम

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रशिक्षण संपन्न

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे,दि.19(जिमाका):- प्रत्येक निवडणुकीत पोलीस दलाने नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे काम केलेले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन नि:पक्षपातीपणे व जबाबदारीने काम करावे, असे मार्गदर्शन कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या निर्देशाप्रमाणे आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांचे “कायदा व सुव्यवस्था” या विषयाबाबतचे प्रशिक्षण पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नोडल अधिकारी, कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील सर्व उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही निवडणुकांमध्ये पोलीस प्रशासनाची महत्वाची जबाबदारी असते. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात असतात, त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. निवडणुकीची ड्यूटी ही कायद्याचे पालन करुन डोळ्यात तेल घालून करणे आवश्यक आहे. मॉक ड्रिल्स कधी घ्यावेत याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची याची जबाबदारी देखील पोलीसांवर असते व ती आपण काटेकोरपण पार पाडत असतो, त्यामुळे या निवडणुकीतही आपण सर्वजण ती निश्चितपणे पार पडणार आहोत, असा विश्वासही कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही दक्षता पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवावी. तसेच मतदान केंद्रावर कोणतेही गैरव्यवहार होणार नाही, या दृष्टीने काम करावयाचे आहे, अशा सूचनाही यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. 00000

मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार

पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम   बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असून भाजपने कथोरे यांना तिकीट दिल्याने त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यासह कथोरे यांच्याविरुद्ध आघाडी उघडणाऱ्या अनेकांना धक्का दिला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे यांचे नाव निश्चित झाले. दरम्यान यापूर्वी किसन कथोरे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही कथोरे यांच्याविरुद्ध जुन्या जाणत्या भाजप पदाधिकाऱ्यांची आघाडी उभी केली होती. तसेच कथोरे यांना, हिम्मत असेल तर अपक्ष लढून आपली ताकद दाखवा असे आव्हानही पाटील यांनी उघडपणे दिले होते. त्याचवेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुरबाड ग्रामीण मधून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कथोरे यांना आव्हान देत मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. या पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधामुळे किसन कथोरे शरद पवारांच्या गटात जाणार असल्याची एक मांडणी केली जात होती. हीच मांडणी करत शिवसेनेतील काही इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मुरबाड विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यासाठी आदेश द्या, अशी विनंती केली होती . मात्र रविवारी भाजपने पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपने सर्वांना स्पष्ट उत्तर दिल्याचे बोलले जाते आहे. पहिल्या यादीतील किसन कठोर यांच्या नावामुळे पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच भाजपने कथोरे यांच्या पक्षातील विरोधकांना थेट उत्तर दिल्याचे बोलले जाते.

 मतदारराजासाठी धावाधाव!

 जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन   नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन केले आहे. यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, ऑटोरिक्षा आदी विविध वाहनांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे नियोजन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य, मतदार जनजागृती साहित्य, ईव्हीएम मशीन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहने, भरारी पथकांसाठी वाहने आदी वाहनांचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वाहतूक व्यवस्था पथकाच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

एस्टीपीकडून रस्ते पूर्ववत करण्यास सुरुवात

माथेरान : दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण प्रकल्प( एस्टीपी ) कामे पूर्ण करण्यासाठी कामाने वेग घेतला असून ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठेत रस्त्यांची खोदाई पूर्ण करण्यात आली आहे. त्या भागातील रस्ते बुजवून पूर्ववत करण्यात येत आहेत. चार महिने पावसाळ्यात ही कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे दसऱ्या नंतर या कामाना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.खोदाई केल्यानंतर सर्व मातीचा उपयोग होण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठविण्यात येत आहे. लवकरच या रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येणार असून हे रस्ते पूर्ववत केले जाणार असल्याचे संबंधीत ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात गावांमध्ये स्वच्छता दिसून येणार असल्याने अनेक ठिकाणी शौचालयाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची दुर्गंधी यायची.काही हॉटेल धारकांनी स्वतःच्या हॉटेलमध्ये एस्टीपी प्लांट केला नसल्याने त्या हॉटेलचे सांडपाणी मुख्य रस्त्यावरील चेंबर मध्ये कचरा गोळा झाल्यास सर्व घाण परिसरात पसरल्याने दुर्गंधीचे प्रमाण दिसून यायचे. एस्टीपी प्लांट मुळे गावात दुर्गंधी हद्दपार होणार असून स्वच्छता राखण्यास मदत होईल असे सुज्ञ,अभ्यासू  नागरिक बोलत आहेत.

 मध्यवर्ती मतदान केंद्रातील नियंत्रण कक्षात लँडलाईन व टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

 १४७ कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर केलेली आहे. १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी मतदारांच्या तक्रारी नोंदविणे, त्यांना माहिती देणे या कामे करण्याकरिता १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती मतदान केंद्रात नियंत्रण कक्ष (२४४७) उभारण्यात आले असून या नियंत्रण कक्षात लँडलाईन दूरध्वनी क्रमांक ०२२- २०८१२८३६ व  १८००२२००२१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, असे १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंढे यांनी कळविले आहे.

काँग्रेसच्या ‘हाताला’ ‘मशाली’चे चटके; नाना पटोले, राऊतांमध्ये उडाले खटके

रमेश औताडे मुंबई : निव़डणूका जाहिर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी जोरदार घमासान सुरु आहे. पण महाविकास आघाडीत या जागावाटपावरून बिघाड असल्याचे आज जाहिरपणे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि…

– ५१ नागरिकांना हरवलेले मोबाईल रिटर्न गिफ्ट

विठ्ठलवाडी पोलिसांची कामगिरी उल्हासनगर-  हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ नागरिकांचे त्यांचे हरवलेले किंबहुना गहाळ झालेले मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने दसऱ्याच्या दिवशी परत केल्याची घटना ताजी असतानाच,…

खो-खो प्रेमी सरस्वती मंदिरमध्ये दसरा संमेलन संपन्न

मुंबई : माहीम मध्ये खो-खो म्हटल कि सरस्वती मंदिर हायस्कूलच नाव लगेच झळाळून समोर येत. या शाळेने खो-खो ला जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले. त्यात रंजन कोळी,…

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार

कुडाळ : आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही…