Category: होम

 आजपासून बारामतीमध्ये रंगणार

 खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धा   बारामती : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, क्रीडाजागृती आणि बारामती येथील एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून खेलो इंडीया वुमेन्स लीग स्पर्धेचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होत असलेल्या या स्पर्धा सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत. क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केवळ मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमीत्ताने बारामती तालुक्यामधील मुलींच्या क्रीडागुणांना वाव मिळवा म्हणून युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती तालुका स्तरावर शालेय मुलींसाठी तीन वयोगटात सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे २०० हुन अधिक मुलींनी सहभाग घेतला आहे. वुमेन्स लीग सायकल स्पर्धा सबज्युनीअर (१२ ते १६ वर्ष वयोगट), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) आणि १९ वर्ष व त्यावरील अशा तीन वयोगटात होईल. टाईम ट्रायल आणि रोड रेस (मास स्टार्ट) या दोन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आज, शुक्रवारी सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते होत आहे. याप्रसंगी बारामती शहराचा आणि तालुक्याचा क्रीडाक्षेत्रात नावलौकीक जगभर पसरवणा-या युवा खेळाडूंना सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सकाळी १०:०० वाजता खासदार सौ. सुनेत्रावहिणी पवार यांच्या शुभहस्ते स्पर्धेठिकाणी होणार असून यावेळी मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, बित्तमबातमिचे संपादक आणि सलग सहा वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना हजर राहुन वार्तांकन करणारे  संदीप चव्हाण, मराठीमधील पहिल्या महिला क्रीडा पत्रकार  स्वाती घोसाळकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, संयोजन समिती आणि बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास वायकर आदी मान्यवर हजर राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पंच मा. धरमेंदर लांबा यांची या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून नेमणूक झाली असून सुदाम रोकडे, दिपाली पाटील, मिनाक्षी शिंदे, प्रा. साईनाथ थोरात, भिकन अंबे, बिरु भोजने, संजय दराडे स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पार पाडणार आहेत. केंद्र सरकारतर्फे साईचे निरीक्षक म्हणून सार्थक गंगावणे आणि कुस्ती प्रशिक्षक अमरसिंग निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे. 0000

कर्जत नवनिर्वाचित तहसीलदार धनंजय जाधव यांचे उप अधीक्षक भूमि अभिलेख कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

आज ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या…

‘ब्रो ठाणे बदलतंय!’ गणेश-विसर्जन मिरवणुक उत्साहात

ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने…

माजी ज्येष्ठ नगरसेवक विक्रम मोरे यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले नियुक्त केलेले विभागप्रमुख असलेले विक्रम गणपत मोरे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय…

शनिवारपासून भारतात प्रथमच जागतिक फिटनेस फेस्टीवल

ठाणे –  शनिवार आणि रविवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे जागतिक फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक एक्टवफिट…

 धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ,

आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा   ठाणे : धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही, असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू, असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असतानाच, त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपाडे, दिपक पेंदाम, हंसराज खेवरा, ॲड शशिकांत नागभिडकर, सुनील झळके यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती धनगर आणि धनगड एकच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल, असा निर्णय महायुतीने घेतला आहे. परंतु धनगर ही जात असून ती जमात नाही. ते आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत. राज्याच्या अनुसुचित जमाती यादीत क्रमांक ३६ वर ओरॉन, धांगड आहेत. राज्यात ओरॉन, धांगड, धनगड या जमाती अस्तित्वात नाहीत. परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत. धनगर या जातीचा धांगड, धनगड या जमातीशी तिळमात्रही संबंध नाहीत, असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले. उत्तरप्रदेशातील अलाहाबाद न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण नाकारले आहे. असे असतानाही राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देत असेल तर ते घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असण्याबरोबरच घटनाबाह्य असेल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू. याशिवाय, राज्यातील विधानसभेच्या २५ जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेतच, असा इशारा देत आता राज्य सरकारने ठरवायचे आहे की अध्यादेश काढायचा की नाही, असे त्यांनी सांगितले.

राडोने दोन नवीन घड्याळे सादर केली

मुंबई : अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि…

कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्त्यावर, इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या वाहन चोरींमुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे…

 मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी

 जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार   मुंबई : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला तब्बल १३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने १३० कोटींची ही देणगी प्रतिज्ञाद्वारे दिली आहे. ‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या १० टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल १ लाख १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे आणि शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात आणखी सक्षम बनविण्यास सक्षण करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करते. दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर हे जागतिक उत्कृष्टतेच्या आणि एक नवे ध्येय गाठण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वापूर्ण निर्णय ठरेल. ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक शिक्षणात संस्थेचा दर्जा वाढवेल, असे नाही तर आर्थिक बाजारपेठेतील पुढच्या पिढीचे पालनपोषण करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून तिचे स्थान मजबूत करेल. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.” ०००००