Category: होम

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात कल्याण: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि त्यामुळे पक्षी व इतर व जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे माझा रूपया  निसर्गासाठी’ या लोकसहभाग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त एक रुपया योगदान देऊन निसर्ग संवर्धनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी मोठ्या देणग्यांपेक्षा सामूहिक सहभाग अधिक प्रभावी ठरतो या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकासाठी सहज शक्य असलेले एक रुपये  योगदान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य असून, कोणताही आर्थिक बोजा न पडता प्रत्येक नागरिकाला निसर्गासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. या उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या योगदानातून पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणे, वृक्षरोपण करणे, पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे, तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याअभावी होणारे पक्ष्यांचे हाल कमी करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे. योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी सांगितले की, “₹1 ही केवळ रक्कम नसून निसर्गासाठी दिलेला सहभाग आहे. मोठ्या योगदानाची अपेक्षा न ठेवता, सामान्य माणसालाच या चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन ही केवळ संस्था किंवा शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या लोकसहभाग उपक्रमात सहभागी होऊन *‘माझा ₹1 निसर्गासाठी’* या संकल्पनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्या हस्ते वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याण : कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याणात करण्यात आले.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वैष्णवी रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.  डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ओला-उबरचा आज संप

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाइक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियनने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.  तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.…

परीक्षा पे चर्चा… राजकारणात मुरलेल्या भल्याभल्या राजकारणांची ‘शाळा’ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणाच्या पलिकडे जात यंदाही देशातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षेचे टेन्शन दूर करण्यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची अशी शाळा घेतली.

भारताने सहाव्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला; वर्ल्डकप जिंकणारा आयुष म्हात्रे विरारचा ‘दुसरा’ छोरा

हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे.…

अँकर सहा कॉलम इस्लामाबादमध्ये मशीदीत भीषण स्फोट

स्फोटात २४ ठार, १०० हून अधिक जखमी इस्लामाबाद : पाकिस्तानातील तरलाई भागातील इमाम बारगाह परिसरात शुक्रवारी जुम्मा नमाजाच्या वेळी झालेल्या भीषण स्फोटात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी…

नक्षलवाद्यांची ‘कंपनी १०’ खतम

गडचिरोलीत सी-६० पोलिसांची मोहीम ० ७ नक्षलवादी ठार ० महाराष्ट्राचे जवान दिपक मडावी शहीद गडचिरोली : नक्षलवाद्यांमध्ये कुख्यात असणाऱ्या कंपनी १० चा गडचिरोली पोलिसांनी आज खात्मा केलाय. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अबुझमाड दुर्गम भागात आणि…