Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मुंढवा जमीन गैरव्यवहार पार्थ पवारांना ‘क्लीनचीट’?

मुंढवा जमीन गैरव्यवहार पार्थ पवारांना ‘क्लीनचीट’?  पोलिसांची चार्जशीट सादर फक्त शीतल तेजवानी आरोपी पार्थ पवारांचे नाव वगळले पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशीतच पार्थ पवारला क्लीन चीट दिली असल्याचा आरोप…

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’ हरिभाऊ लाखे नाशिक: मनपाच्या सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उतावीळपणाला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ब्रेक लावला आहे. महायुती म्हणून निवडणूक लढलो तेथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले. नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली असून, ७२ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे सत्तेत कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्यास त्यांनी नकार दिला आहे. नाशिक येथे रविवारी भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या महापौर तसेच सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. आम्ही स्वबळावर ७२ जागा निवडून आणल्या. विरोधकांचे पाच ते सहा नगरसेवक संपर्कात आहेत. आम्ही बहुमतात असल्याने कोणाच्याही कुबड्यांची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्याचा कोणताही प्रस्ताव मित्रपक्षांना दिला नसल्याचे सांगत, महाजन यांनी केदार यांच्या दाव्याची हवा काढून घेतली. जळगावमध्ये महायुती म्हणून लढल्याने या ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळे शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. इच्छुकांचे लॉबिंग सुरू मंत्री महाजन हे भाजप कार्यालयात आले असता महापौरपदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले. महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने इच्छुक महिलांची गर्दी झाली होती. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांनी भाऊ, आम्हाला स्वीकृतसाठी तरी संधी द्या, अशी गळ महाजन यांना घातली. वरिष्ठांच्या चर्चेनंतर महापौरांची घोषणा महापौरपदी कोणास संधी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरच ६ फेब्रुवारीस महापौरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. अद्याप या प्रक्रियेला वेळ आहे. मी मुंबईला जात असून, कोणाला संधी द्यायची याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी चर्चा करणार आहे. त्यानंतर ज्या नावावर एकमत होईल त्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंना टोला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर महाजन यांनी टीकास्त्र सोडले. दुसऱ्यांच्या पक्षात काय चालल आहे, हे बघण्यापेक्षा ठाकरेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला महाजन यांनी लगावला. मनसेचे आमदार निवडून येत नाही. नगरसेवक निवडून आले तरी ते दुसऱ्या पक्षात जातात यावर ठाकरे यांनी चिंतन करावे. नाशिकमध्ये मनसेचा निवडून आलेल्या एकमेव महिला नगरसेविका आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा महाजन यांनी केला.

प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान जळगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव येथील क्रीडा संचालक प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (सन २०२५–२६)”   प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित विशेष समारंभात पालकमंत्री  गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक (एस. पी.) महेश्वर रेड्डी व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रा. खुशाल देशमुख यांना प्रदान करण्यात आला. प्रा. खुशाल देशमुख यांच्या या सन्मानामुळे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचा तसेच चाळीसगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  प्रा.खुशाल देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय बॅडमिंटन पंच प्राचार्य चित्ते सर यांचे निधन

राष्ट्रीय बॅडमिंटन पंच प्राचार्य चित्ते सर यांचे निधन पुणे – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर वामन चित्ते यांचे वयाच्या ८9 व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले.  महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनचे  कॉमर्स विषयाचे प्राध्यापक  आणि महाविद्यालयाचे  १९७३ पासून ते १९९७ पर्यंत प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. कुशल प्रशासक, हाडाचे कर्तव्य तत्पर शिक्षक, खिलाडू वृत्तीचा शिस्तप्रिय खेळाडू, बुद्धिमान अर्थतज्ञ,  राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनचे पंच, तसेच चाळीसगाव सारख्या ग्रामिण भागातील तालुक्यातून आपल्या परिसस्पर्शातून ४५/५० वर्षा पुर्वी  त्यांनी  सुजाता देव, मिलींद घाटे, विवेक जोशी व मिलींद पूर्णपात्रे या सोन्यासारखे आतंरराष्टीय खेलाडू घडविले जे अजूनही खेळत आहेत व चालीसगावच नाव खेलाडू जगातात चमकावण्यात सराचा फार मोठा वाटा आहे.चित्ते सर वयाच्या ८३ वयापर्यंत पुणे येथे  ५० च्या आसपास मुलामुलींना बॅडमिंटन चे  प्रशिक्षण देत असत.    एक सहृदय पालक, आदर्श पिता, आदर्श शिक्षक, आदर्श मित्र, आदर्श खेळाडू असं बहुगुणी, बहूआयामी व्यक्तिमत्व आज हरवलं. चित्ते आणि कोतकर कुटुंबीय दुःख सागरात बुडाले ,त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात झालेली पोकळी कधी भरून निघणार नाही असे आदर्श बहुगुणी माणसं आज दुर्मिळ ! सरांच्या जाण्याने चित्ते कुटुंबीयांवर झालेला आघात सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी ही चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी-माजी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून दुःखद सहवेदना.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१…

टी.डी.के च्या कामगारांची वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता

टी.डी.के च्या कामगारांची वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता अनिल ठाणेकर नाशिक, नाशिक मधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील टी डी के प्रा. लि. या कंपनीतील कामगारांना अनेक सेवा आणि सुविधांसह होणाऱ्या वेतन वाढीच्या…

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द बोर्डाचा ‘कडक’ इशारा हरिभाऊ लाखे नाशिक: फेब्रुवारी-/मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळतील, त्यांची मान्यता रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण मंडळाने दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांची संयुक्त बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व केंद्रांवरील खोल्यांमध्ये आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले होते, त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत कठोर भूमिका मांडण्यात आली. राज्यातील अतिवृष्टी व आपत्तीमुळे बाधित झालेल्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परीक्षक आणि नियामकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करण्यासाठी, एका परीक्षकास जास्तीत जास्त २०० तर नियामकास १००० उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याबाबत चर्चा झाली. सातत्याने परीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांऐवजी आतापर्यंत हे काम न केलेल्या नवीन शिक्षकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय झाला. केंद्र संचालक, कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. ५३ वर्षांवरील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना परीक्षक आणि नियामक कामातून सवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्याध्यापक संघाचे एस. बी. देशमुख यांनी, परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापक आणि मंडळ यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मांडलेल्या मागण्यांवर मंडळ सकारात्मक विचार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफी आणि मानधन वाढ या विषयांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष वेधले असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बोरसे यांनी, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य असून यासाठी स्थानिक खासदार, आमदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना केली. कंपनी उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावेत तसेच वेतनेतर अनुदानात सीसीटीव्हीसाठी तरतूद करण्यात यावी, अशी सूचना डॉ. बोरसे यांनी केली. मुख्याध्यापक संघाकडून मांडलेल्या मागण्यांबाबत मंडळ सकारात्मक असून याविषयी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अशोक गायकवाड रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २ मिनिटे मौन पाळून आज आदरांजली वाहण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौन सुरु होण्यापूर्वी सकाळी ठीक १०.५९ ते ११ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्या संबंधिताचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.

 आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात

आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने अशोक गायकवाड रत्नागिरी: रुग्णांची सेवा करताना दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीला पार पडला.जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग, कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जोपासली कला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत असतानाच जोपासलेली कला यावेळी सादर केली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लोकनृत्य आणि बॉलीवूड गाण्यांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांना खळखळून हसवणारी मिमिक्री (नक्कल) आणि सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात आरोग्य विभागाने सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही मारलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह दुमदुमून गेले होते.

‘रिफार्म, परफॉर्म आणि  ट्रान्सफॉर्म’वर फोकस

 पंतप्रधान मोदींचा रोडमॅप नवी दिल्ली : देशाची आर्थिक दिशा ठरवणारे संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली असून ‘रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस हा आपला रोडमॅम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.  या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि आज संसदेत मांडला जाणारा आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे मतही त्यांनी मांडले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.