Category: महाराष्ट्र

Maharashtra News

स्मार्ट हरितक्षेत्र परियोजना रद्द करा मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या शेतकऱ्यांचे साकडे हरिभाऊ लाखे

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील 753 एकर क्षेत्रावर स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित हरितक्षेत्र विकास परियोजना अर्थात ग्रीनफील्ड योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील…

उत्तर भारत  थंडीने हैराण

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमालीची घटली. त्यामुळे किमान २५ रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यांत धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. जम्मू-काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ…

वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक

नवी दिल्ली : देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांमधील विधासभा निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. भाजपाचे…

मुंबई-गोवा महामार्गला आता  जूनच मुहुर्त !

नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गला आता जूनचा मुहुर्त मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मुहुर्त दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे…

ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित ७४…

एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार- प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय…

मुलांच्या बौध्दिक विकासाबरोबरच, शारीरिक व मानसिक विकासासाठीही बालमहोत्सव – न्या. एस एस गोसावी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव बाल महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला…

वैजनाथ केंद्रातील शिक्षिकेचा सत्कार

माथेरान :पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने माथेरान व्हॅली इंग्लिश स्कूल वंजारपाडा येथील मैदानावर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या मध्ये धावणे, कबड्डी, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी अशा…

शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘बळीराजा मदतवाहिनी’

हरिभाऊ लाखे नाशिक : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारी करता याव्यात, यासाठी बळीराजा ही मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आर्थिक गुन्हे शाखा यासंदर्भातील तक्रारी जमा करत यावर काम करत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीचा आकडा ४२ कोटींच्या घरात आहे. यातील एक कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा उत्पादकांची बऱ्याचदा परप्रांतीय तर, कधी स्थानिक व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाला पैसे देण्याचा वायदा होतो. परंतु, आश्वासन न पाळता संशयितांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांच्या बांधावर द्राक्ष खरेदीच्या वेळी भाव, वजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असते. शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक लक्षात घेता याआधी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर काही काळ काम थंडावले. मात्र मागील आठवड्यात कृषि मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शेतकरी फसवणुकीचा विषय चर्चेत आला. फसवणूक झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नाशिक जिल्हा पोलिसांच्या वतीने बळीराजा ही मदतवाहिनी सुरू करण्यात येत आहे. तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचे तक्रार अर्ज मागवण्यात येत आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १०० शेतकऱ्यांची पोलिसांनी प्रत्यक्ष भेट घेत काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेत प्रबोधन करण्यात येत आहे. याविषयी कृषी, पणन, द्राक्ष बागायत संघ आदींशी पत्रव्यवहार करुन आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. परप्रांतीयांना वचक नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या तक्रारी २०१४ पासूनच्या आहेत. फसवणुकीचा आकडा हा ४२ कोटींच्या घरात आहे. यात संशयितांकडून ९० लाखांहून अधिक वसूल केले आहेत. काही पैसे लवकरच परत मिळतील. परप्रांतीय व्यापारी किंवा अन्य व्यापाऱ्यांना जिल्ह्यात कृषिमालाची खरेदी करायची असेल तर त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी एखादा व्यापारी माल खरेदीसाठी आला तर त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. जेणेकरून त्याची तपासणी करुन त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मिळवली जाईल. या सक्रियतेमुळे फसविण्याच्या उद्देशाने येणारे परप्रांतीय व्यापारी सावध झाले आहेत. – रवी मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

मुंबई महानगरक्षेत्रात केबल कार प्रकल्पासाठी नितीन गडकरींना भेटणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या…