Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार-एकनाथ शिंदे

अशोक गायकवाड     छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले…

महायुतीने शंभर जागा जिंकल्यास माझे नाव बदला- जयंत पाटील

पुणे : “विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडून येणार आहेत, यापेक्षा आधिक जागा आल्या तर माझे नाव बदला”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिलं आहे. पुण्यातील मंचरमध्ये राष्ट्रवादीची…

उध्दव सेना राजना भिडली

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या मराठा आंदोलकही आक्रमक बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता उध्दव ठाकरेंचे शिवसैनिक आरक्षणावरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच भिडले आहेत. राज ठाकरे यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. हाच धागा…

प्रकाश आंबेडकर पत्रकारावर भडकले

नांदेड :  मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होते, यावर नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर प्रकाश आंबडेकर भडकले. तुझं जेवढं वय नाही, तेवढी माझी पत्रकारीतेत हयात गेलीय, असेही त्यांनी पत्रकाराला…

आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

नाशिक : माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी…

मी फक्त मराठा समाजाचा – जरांगे

सोलापूर: मी कुणाचा माणूस आहे यावर कुणाला कुणाचा मेळ लागेना, मी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा माणूस आहे आणि माझा मालक मराठा समाज आहे असं ठणाकावून सांगत मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांना चोख प्रत्युत्तर…

लाडक्या बहीणी १७ ऑगस्टला 3 हजार रुपयांनी श्रीमंत होणार!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी  एक कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. या योजनेला मिळालेला वाढता प्रतिसाद पहाता राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. पण ज्यांनी अर्ज…

जरांगेच्या ‘सगे सोयरे’ला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

अकोला : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील  यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केले आहे. कुणबी हा ओबीसीत आहे. त्यामुळे त्यांनी…

21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड     रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ७ ऑगस्ट, 1 वाजल्यापासून ते २१ ऑगस्ट रात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. असे आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ठिकठिकाणी आंदोलनात्मक काय्रक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हे कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. या बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी .तसेच प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ नुसार कारवाई करण्यात येईल.

भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार…