Category: महाराष्ट्र

Maharashtra News

निरामय जीवनासाठी योग महत्वाचा – चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : योग ही जीवन प्रणाली असून, ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव, स्काऊट गाईड संघटक रमाकांत डिंगणे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन योगदिनाचा प्रारंभ करण्यात आला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केले. राजेश आहिरे यांनी सूत्रसंचलन करत, उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. ताडासन, भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मंडुकासन, सशांकासन, मकरासन, शवासन या आसनांबरोबरच कपालभाती, अनुलोम विलोम, शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांनी केले. सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते स्वस्ती पावसकर, स्वरा मांडवकर, पूर्वा साळवी, आयुषी क्षेत्री, पियुषा पाटील, सोहम बंडबे, वंश शिंदे, वरद पवार, राधिका पेडणेकर, आदिती चव्हाण, रुबीना सय्यद, श्रावणी शिवगण, प्रणिता लवटे, सांची धनावडे, रत्नेश आडविरकर, विनायक डांगे, निखिल चव्हाण, संकेत शिंदे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अ. दा. नाईक हायस्कूल, अ. के, देसाई हायस्कूल, स्काऊट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योगदिनात सहभागी झाले होते. ००००

मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही – महाजन

मुंबई : ठाकेरेंच्या शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊत यांनी मोदींवर केलेल्या ब्रँड नव्हे ब्रँडीच्या टीकेवर उद्धव ठाकरेही दाद देत होते, याचं दुःख आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकसभेत ९ जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती…

पुढचा डोस कधी द्यायचा हे लवकरच सांगेन – शरद पवार

बारामती : मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच…

ओबीसी आरक्षणासाठीच्या हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

जालना: मराठा आरक्षण देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं…

बिहारमधिल ६५ टक्केचे आरक्षण रद्द; महाराष्ट्रातील आरक्षणही अडचणीत ?

नितीश कुमारांना हायकोर्टाचा झटका पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टाने झटका दिला आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरुन ६५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. नितीश कुमारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नोकरी…

जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे

नाशिक : मनोज  जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगर :  सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127  जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे…

अजित पवार आणि शिंदेमुळेच भाजपा ७ जागा जिंकू शकला

अमोल मिटकरींचा अजब तर्क अकोला: भाजपला राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याची अजब तर्क अमोल मिटकरींनी मांडला आहे. कालच राजकीय भाष्य करण्याआधी प्रदेशाध्यक्षांची…

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सुनिल तटकरे यांनी घेतला आढावा

महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम  पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…