Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मावळ मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान – दीपक सिंगला

अशोक गायकवाड पुणे :वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी ५२.३० टक्के मतदान झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले. मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड पिंपरी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदानाचे प्रमाण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात साधारणपणे तिपटीने वाढ होऊन ते १४. ८७ टक्के इतके झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २७.१४ टक्के इतके झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३६.५४ टक्के मतदान पार पडले. ५ वाजेपर्यंत सरासरी ४६.०३ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते. सकाळी मतदानापुर्वी झालेल्या मॉक पोलवेळी २५ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. यामध्ये पनवेल (१ बीयु, ३ व्हीव्हीपॅट), कर्जत (३ बीयु, २ व्हीव्हीपॅट), उरण (६ बीयु, २ व्हीव्हीपॅट), मावळ (३ बीयु, १ सीयु, ४ व्हीव्हीपॅट), चिंचवड (९ बीयु, ३ सीयु, २ व्हीव्हीपॅट), पिंपरी (३ बीयु, २ सीयु, १ व्हीव्हीपॅट) मतदान यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात १२ बीयु, ४ सीयु आणि ७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर पनवेलमध्ये ४ व्हीव्हीपॅट, कर्जतमध्ये ६ व्हीव्हीपॅट, उरणमध्ये २ व्हीव्हीपॅट, मावळ ६ व्हीव्हीपॅट आणि पिंपरी २ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांच्याद्वारे मतदान केंद्रावर लक्ष ठेवले जात होते. तसेच समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित राहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधत होते. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी भर उन्हात देखील मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रे विशेष स्वरूपात सजविण्यात आली होती. त्यामध्ये महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रेही साकारण्यात आली होती. तर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळाच्या संकल्पना साकारण्यात आली होती. तसेच आदर्श मतदान केंद्रावर मतदानाच्या अनुषंगाने सर्व सेवासुविधा आणि आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसह संस्कृती दर्शवणारी रचना करण्यात आली होती. अशी सर्व मिळून १४ महिला संचलित मतदान केंद्रे, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि ६ संस्कृती जोपासणारे व ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एन सी आर डी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली होती. या हरित मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना विविध जातीच्या वनस्पती तसेच वृक्षांच्या प्रजातींबद्दल माहिती जाणून घेतली. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून पुष्प देऊन स्वागत केल्याचा क्षण मतदारांसाठी उत्साह वाढविणारा ठरला. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मतदान केंद्रावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सुरक्षितपणे नेमून दिलेल्या स्थळी घेऊन येण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली. मतदान यंत्रे निश्चित केलेल्या ठिकाणी संकलित करून बालेवाडी येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्रॉन्ग रूम) येथे सुरक्षित जमा केले जाणार आहेत.

राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्यात  ११ लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची जी टक्केवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक सरासरी ६०.६० टक्के मतदान झाले आहे. आज नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड…

…तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते

मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका धुळे : पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली. शेतकऱ्यांच्या सगळ्याच वस्तू मोदींनी महाग केल्या. मोदी है तो मुमकिन है लेकिन…

निवडणूक निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज-दीपक सिंगला

अशोक गायकवाड पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत कराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, माध्यम समन्वयक शिवप्रसाद बागडी, किरण गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. मतदान साहित्य वितरण, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मावळ मतदारसंघात येणाऱ्या मतदारांची आकडेवारी, दिव्यांग तसेच तृतीयपंथी मतदारांची आकडेवारी, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, मतदान साहित्य वाटप प्रक्रिया, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतुक आराखडा, मतदान यंत्रांची आकडेवारी तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे देखील ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना सत्य साई कार्तिक म्हणाले, भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे पोलीस गस्त, पोलीस पथ संचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे, असे सत्य साई कार्तिक यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सुमारे २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २९१ सेक्टर अधिकारी देखील नेमण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय रविवार १२ मे रोजी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण केले जाणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी दिली. मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्येकी १ असे एकूण ७ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष समन्वयासाठी २ उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवून माहिती संकलन आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी ३ तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी एका कार्यकारी अभियंत्याची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्षाची रचना करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले.मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात ४४ भरारी पथक, १९ तपासणी पथक, ३८ स्थिर सर्वेक्षण पथक, १२ व्हिडीओ सर्वेक्षण पथक, ६ कृती दलासह ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटी ४९ लाख रुपये रोख, ६९ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मद्य, ६२ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, १ कोटी ९८ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान वस्तू, २० वाहनांमधून ३९ लाख १२ हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर विविध कलमांच्या आधारे एकूण २७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक सिंगला यांनी दिली. *चौकट* १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ रोजी , बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलातील वेट लिफ्टींग हॉलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे २४, १४, १४, १६, २४ आणि १६ असे एकूण १०८ मत मोजणीचे टेबल असणार आहेत. पिंपरीसाठी २३ फेऱ्या, कर्जतसाठी २४ फेऱ्या, उरणसाठी २४ फेऱ्य़ा, मावळसाठी २५ फेऱ्या, चिंचवडसाठी २३ फेऱ्या तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या अशा एकूण १४४ मतमोजणीच्या फेऱ्या होतील. त्याचबरोबर टपाली मतदानासाठी ४ टेबल, ईटीपीबीएससाठी १ टेबल असे एकूण ५ टेबल असतील. एकूण ११३ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

छत्तीसगडमध्ये ६ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या  चकमकीत आतापर्यंत 6 नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला यांना या जंगलात घेरल्याची माहिती आहे. बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात सहभागी आहे. गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत. माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.

मला जिवंत गाडण्याचा नकली शिवसेनेचा प्लान !

पंतप्रधान मोदींचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल नंदुरबार : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र असल्याची टीका केल्यामुळे महाराष्ट्रात रान उठलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी नंदुरबार येथे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. ठाकरेंची ही नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा बोलत आहेत, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे. असे वक्तव्य मोदीं यांनी…

शरद पवार, ठाकरेंना मोदींची खुली ‘ऑफर’

नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभे नंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले होते. हाच धागा पकडत काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत एनडीएत यावे त्यांचे स्वागत होईल अशी खुली…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी अंदुरे, कळसकरला जन्मठेप

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र  दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेशी जवळीक असणाऱ्या सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना दोषी ठरवून त्यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि सनातनचे वकील असणाऱ्या  संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान निर्दोष सुटेलेल्या या तीघांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळक यांनी…

पदवीधर निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली प्रशासनाची बैठक

अशोक गायकवाड रत्नागिरी :पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होत असल्याने, त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी प्रशासकीय अधिकार्‍यांची बैंठक घेवून सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक…

शिंदेंचे आमदार सुहास कांदेनी मागितला भुजबळांचा राजीनामा

नाशिक:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत.  त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा करीत…