Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मोदींकडून शेतकऱ्यांचे हाल होतायेत-शरद पवार

नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी  सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले. सुप्रिया सुळे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली.  इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच भाजपचा प्रचार करा’

महाजनांनी पुन्हा खडसेंना डिवचले नगर : मनाने भाजपात पुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना त्यांचे राजकीय विरोधक भाजपाच्याच गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. खडेसे यांनी एन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. महायुती जागावाटपाबाबत विचाले असता गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असे त्यांनी म्हटलंय.

ठाकरे कधीही भाजपासोबत जातील- प्रकाश आंबेडकर

पाचोरा :  भाजपासारकेच महाविकास आघाडीतील नेतेही जातीयवादी आहेत.  ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील म्हणूनच मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित…

पवार अस्वस्थ असते तर 84 वर्षे जगले नसते

नारायण राणेंचा तोल सुटला मुंबई :  लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही…

नारायण राणे सत्तेसाठी लाचार- विनायक राऊत

सिंधुदुर्ग : नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, नारायण राणे कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा, अशी परखड टीका रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे…

मोदींची विकासाची गाडी सुसाट – फडणवीस

कोल्हापूर : सबका साथ सबका विकासचा नारा देत पंतप्रधान नरेद्र मोदींची विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्या विकासाला वेग देण्यासाठी यंदाची ही निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या…

धर्मआधारीत आरक्षण दिल्यास मोदींना विरोध करू  – शरद पवार 

कोल्हापूर : सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर आधारित आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत.  देशात धर्मावर आधारीत आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध…

विजया राम शेवाळकर  यांचे दुःखद निधन 

नागपूर : वक्ता दशसहतस्रेषु  प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सहधर्मचारिणी व चि.आशुतोष ची आई श्रीमती विजयाताई यांचे आज गुरूवारी २ मे २०२४ रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी,नागपूर येथील डॉक्टर माहूरकर…

महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही – ठाकरे

पुणे : मोदींची रेसकोर्सवर सभा झाली. ठिकाण योग्य होते. कारण त्यांना घोडेबाजाराचीच सवय आहे; मात्र तुमच्याकडे आले ते घोडे नाहीत तर गाढवे आहेत, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भटकता आत्मा असतो तसाच वखवखलेला आत्माही असतो आणि तो सगळीकडे फिरत…

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले

कोकणात मानापमान सुरु… रत्नागिरी :  लोकसभेच्या निवडणूकीच्या कोकणात एकीकडे धुळवड सुरु असतानाच दुसरीकडे मानापमानाचे नाट्यही रंगले आहे. लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याचा वादा पुर्ण न करु शकणाऱ्या उदय सामंत यांचे पोस्टर त्यांचाच भाऊ…