Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याचा गप्पा सांगू नका’

थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार छायाचित्र ओळ-जरंडी येथील महायुतीच्या सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार दुसऱ्या छायाचित्रात उमेदवार रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना तिसऱ्या छायाचित्रात जनसमुदाय…. सोयगाव : अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे … जालना लोकसभाचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे— महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतारा फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारनात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपा च्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता… यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवने,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदनताई पाटील,धृपाताबाई सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा बाई काळे यांनी आभार मानले.

दादांना ‘सोसायटीत’ जायची वेळ आली- पवार

कोल्हापूर : आताचे अजितदादा हे भाजपाचे दादा आहेत. आमच्या सोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार सभा घ्यायचे, पण आता कुठं बसले आहेत, तर बारामतीत सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत?. अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवारांवर…

मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही?- पवार

नगर : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत.  सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची…

‘काँग्रेसची विचारसरणी मुघलांची, त्यांना  औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत’

मोदींचा कर्नाटकात काँग्रेसवर हल्लाबोल कर्नाटक : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेस पोहचला आहे. भाजपाने यंदा दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जोरदार प्रचार करत आहेत. कर्नाटकमधिल सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जबरदस्त…

मनोज जरांगेचे मिशन विधानसभा ?

बीड: अवघ्या देशात लोकसभेची धुम सुरु असतानाच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले मिशन विधानसभा जाहिर केले. सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा मराठा आंदोलक लढवती आणि…

गद्दारांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये- आदित्य ठाकरे

कोल्हापूर : “आमच्यावर जे खोटे आरोप करतात त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. खोटारड्यांकडे लक्ष देऊ नका. एका प्रश्नाचं उत्तर मला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं, आमच्याकडून फुटून गेल्यानंतर गद्दार गँगमध्ये एकजण गेला.…

रोहयो मजुरांना दुष्काळात आधार; सोयगाव तालुक्यात रोहयो मजुरांच्या खात्यावर ८६ ,लाख रु निधी जमा

सोयगाव : अती गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावरील एक हजार आठशे ६४ मजुरांच्या खात्यात गुरुवारी ८६ लक्ष रु जमा झाले आहे त्यामुळे चार महिन्यातून पहिल्यादाच रोहयो मजुरांच्या मोबाईल वर रक्कम जमा झाल्याचे संदेश  गुरुवारी दुपारी एक वाजेपासून प्राप्त झाले होते. सोयगाव तालुक्यात पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेची आठशे दहा कामे मंजूर आहेत या कामांवरील मजुरांच्या हातांना मजुरी तर मिळाली होती परंतु  डिसेंबर ते मार्च या चार महिन्यापासून मजुरीच्या पोटी एक रुपयाही मिळाला नव्हता परंतु सोयगाव तालुक्यातील रोहयो च्या कामावरील एक हजार ८६४ मजुरांच्या खात्यावर थकीत मजुरी गुरुवारी दुपारपासून सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ लाख रक्कम रोहयो मजुरांच्या खात्यात वर्ग झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रोहयो मजुरांना दुष्काळात आधार मिळाला आहे वाढीव दरा नुसार रक्कम शासनाने रोहयो मजुरांना एक एप्रिल २०२४ पासून प्रति दिवस २७३ ऐवजी २९७ रु याप्रमाणे मजुरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करत गुरुवारी जमा झालेल्या रक्कम मध्ये एक एप्रिल पासून रोहयो च्या कामावर असलेल्या मजूरांना प्रति दिवस २४ रु वाढीव दरा ने मजुरी अदा केली आहे त्यामुळे एक एप्रिल पासून रोहयो कामावर असलेल्या मजूरांना २९७ रु प्रति दिवस मजुरी मिळाली आहे सोयगाव चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, रोहयो कार्यक्रम अधिकारी दत्ता कटके गणेश गवळी,गजानन फरकांडे,प्रकाश मोकसरे,संगणक परिचालक सुरेंद्र निकम,आदींनी पुढाकार घेतला आहे.

दामोदर पांडुरंग काळे यांचे निधन

सोयगाव : सोयगाव येथील जेष्ठ नागरिक दामोदर पांडुरंग काळे उर्फ  अण्णा (वय ७६) यांचे शनिवारी (दि.२७) दुपारी २.३० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चयात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजाता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पत्रकार सुनील अण्णा काळे यांचे वडील होते.

सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट

सोयगाव ते बनोटी मार्गावर शुकशुकाट तापमान ४३ अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण, रस्ते झाले सुनसान सोयगाव :दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.सोयगावचा पारा शनिवारी  ४३ अंशावर   पोहोचला आहे.त्यामुळे सोयगावात तापमानाने उच्चांक गाठल्याने दुपारी अकरा  ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंगाला उन्हाचे चटके बसत असत आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट दिसत आहे. उन्हाचा तीव्र झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्यांसह पशुपक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोयगाव परिसरात दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, प्रवासी वाहतूकदार, माल वाहतूकदांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे. दहा वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत.सोयगाव परिसरात तीव्र उष्णता जाणवत असल्याने सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट होता.त्यामुळे घरात आणि कार्यालयात दिवसभर पंखे लावून उन्हाच्या झळांपासून बचाव केला जात आहे, तर घराबाहेर जाताना टोपी, स्कार्प, गॉगल,सनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्तेही निर्मनुष्य होवून तुरळक वाहने ये-जा करतांना दिसत आहेत. लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैरान झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक मागील वर्षी पेक्षा यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून ऐन लग्न सराईत रस्ते निर्मनुष्य झाले आहेत सोयगावचे तापमान गुरुवार ते शुक्रवार ४१ अंशावर असताना शनिवारी अचानक तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे.

निवडून दिले तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार-राणे

रत्नागिरी : कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार, मला जर निवडून दिलात तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार अशा शब्द भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकणवासीयांना दिला. नरेंद्र मोदींना…