Category: मुंबई

Mumbai news

मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे  – रामदास फुटाणे

मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व…

वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

    मुंबईः आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर…

 खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक कायम

४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सळुग- दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, :- उत्तरप्रदेशमधील अलिगड येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी दुहेरी विजय मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे. खो-खो स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे या खेळातील महाराष्ट्राचा दबदबा-लौकिक कायम राखला गेला असून त्यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळेल आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील अभिमानास्पद कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उत्तरप्रदेशमधील अलिगडच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियम येथे पार पडलेल्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील विजयामुळे महाराष्ट्राच्या कुमार गटाचे सलग १९वे तर मुलींचे सलग १०वे अजिंक्यपद ठरले आहे, याचा सर्वच महाराष्ट्रीयन जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुमारांनी एकूण ३५ तर मुलींनी एकूण २६ वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले आहे, यातून खो-खो खेळातील महाराष्ट्राचा दबदबा, मेहनत, प्रावीण्य याची प्रचिती येते. या स्पर्धेत धाराशिवच्या जितेंद्र वसावे याला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रे हिला जानकी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. सर्वच विजयी खेळाडूंना, प्रशिक्षकांना उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 0000000

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सहा वर्षे अडगळीत,

रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे अनावरणात अडसर मुंबई : रेल्वे मंडळाच्या धोरणांमुळे गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अडगळीत पडून आहे. पुतळा निर्मितीसाठी १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.…

शनिवारपासून थंडी कमी होणार?

गालच्या उपसागरातील वादळाचा थंडीवरील परिणाम मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (३० नोव्हेंबर) राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारीही…

विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाईचा बडगा

मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर २ वर्षांत १०७ कोटींचा दंड मुंबई : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व…

 वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

प्रशासनाची धडक कारवाई   मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ असलेली ४५ अनधिकृत बांधकामे गुरुवारी रेल्वेने आरपीएफ, शहर पोलिस आणि जीआरपीच्या मदतीने जमीनदोस्त केली.  ही सर्व अनधिकृत बांधकामे वांद्रे पूर्व बाजूच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळच्या रेल्वेच्या हद्दीत उभारली होती. या कारवाईसाठी जीआरपीचे ५६, आरपीएफचे ३४, शहर पोलिसांचे १७ अधिकारी आणि शिपाई असा फौजफाटा तैनात केला होता.  बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी २५ कामगार, २ जेसीबी आणि १ ट्रक वापरण्यात आला होता, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. …यामुळे उगारला बडगा पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृत उभारलेल्या बांधकामांमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने ही कारवाई केली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या हद्दीत बांधलेली अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर असून ती तत्काळ हटवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भायखळ्यातील उर्दू भवनचा मूळ शिवसेनेचा प्रस्ताव रद्द करा, भाजपची मागणी

मुंबई : भायखळ्यातील चांदोरकर मार्गावर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या उर्दू भाषा भवनचा प्रस्ताव रद्द करावा आणि तेथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यास नियमांची पूर्तता करून मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपने पालिका…

लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष मोबाइलचा बेसुमार वापर

मैदानी खेळांचा कंटाळा   मुंबई : मोबाइलचा बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रूची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टिदोष (मायोपिया) निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे. शिवाय यावर उपाययोजना न…

 केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित

वेदनांपासून सुटका होण्यास होणार मदत   मुंबई : गुडघा, खांदा आणि कंबरदुखीसारखे आजार व्यक्तीला नेहमीच हैराण करतात. मात्र आता योग्य व्यवस्थापन करून वेदनांमधून रुग्णांची सुटका करण्यासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. यामुळे वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, बोट ट्रिगर, नागीण, मायग्रेन, ट्रायजेमिनल, इंटरस्टिशियल सिस्टिटिस किंवा कर्करोग उपचारामध्ये रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. विविध प्रकरणांमध्ये आजार बरा झालेला असतो, परंतु वेदना कायम असतात. अशा रुग्णांना वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी केईएम रुग्णालयात २०११ मध्ये भूल विभागाच्या माध्यमातून वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. हा विभाग भूल विभागाच्या प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या विभागाला १४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये ४५ ते ७० या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यात गुडघा दुखणे, पाठीचे आजार, खांदा दुखणे, पायाची नस खेचणे, पायाला मुंग्या येणे यांसारख्या आजाराने त्रस्त नागरिकांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात दरआठवड्याला साधारणपणे २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी १५ ते १६ रुग्णांना शस्त्रक्रियागृहामध्ये उपचार करण्याची आवश्यकता भासते. मात्र या विभागाचे स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याने डॉक्टरांना अन्य विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचा वापर करावा लागत होता. मात्र यासाठी त्यांना अन्य विभागाचे शस्त्रक्रियागृह रिक्त होण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या प्रयत्नाने वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करण्यात आले. अत्याधुनिक, संसर्गविरहित असलेल्या या शस्त्रक्रियागृहामध्ये फक्त वेदनांपासून मुक्त होण्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या शस्त्रक्रियगृहामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. या शस्त्रक्रियागृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याची माहिती भूल तज्ज्ञ आणि पेन फिजिशियन्स डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली. वेदनांमुळे तरुण त्रस्त सध्या घरातून कार्यालयीन काम करण्याचे प्रमाण वाढले असून ३० ते ४० वयोगटातील नागरिकांमध्ये स्नायू दुखण्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. हा त्रास बराच काळ राहिल्यास त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. या वेदनांमुळे तरुणांमध्ये ताण निर्माण होऊन त्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. शस्त्रक्रियागृहात कसे होणार उपचार शस्त्रक्रियागृहामध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या विभागांतर्गत शस्त्रक्रियागृहात उपचारासाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णांची सोनोग्राफी आणि क्ष किरणाद्वारे कोणती नस किंवा स्नायू दुखत आहे, याची तपासणी करून त्या भागामध्ये इंजेक्शन दिले जाते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली. कोट वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागाचा विशेष फायदा महिलांना होणार असून सांधेदुखी, गुडघेदुखी, मानटुखी यासारख्या अनेक समस्यांनी महिला त्रस्त असतात. या वेदनांपासून सुटका करण्यासाठी वेदनाशामक गोळी घेतली जाते. पण त्याने फारसा फरक पडत नाही. केईएम रुग्णालयात वेदना व्यवस्थापन उपचार मोफत होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भूल तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. – डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय