Category: मुंबई

Mumbai news

ठाण्यातील पदपथ फेरीवाल्यांना आंदण

 सायंकाळच्या वेळी पदपथावरून चालणे अवघड   ठाणे : शहर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानका बाहेरील परिसरात सायंकाळच्यावेळी पदपथांवर फेरीवाल्यांचा बाजार भरत आहे. पदपथावर विक्री साहित्यासह ठाण मांडून बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे पदपथ अडविला जात आहे. हे फेरीवाले रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विक्री करतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली सकाळच्या वेळेत फेरीवाले फारसे दिसून येत नाहीत. परंतू, सायंकाळ होताच या ठिकाणी फेरीवाले येण्यास सुरुवात होते. सायंकाळी घरी परतणारे अनेक नागरिक निवांत असतात, त्यामुळे ते काही तरी खरेदी करतील या उद्देशाने फेरीवाले वेगवेगळे साहित्य विक्रीसाठी घेऊन याठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. खरंतर हा बाजार सायंकाळच्या वेळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु लागला आहे. स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली, गावदेवी परिसर, नौपाडा, नितीन कंपनी तसेच स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरातही फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवीत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरुन येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाचे या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत का असा सवाल काही नागरिकांकडून विचारला जात आहे. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असून स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिक प्रतिक्रिया मी दररोज गावदेवी परिसरातून लोकमान्य नगरला जाण्यासाठी रिक्षा पकडतो. अनेकदा सायंकाळच्यावेळी याठिकाणी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसतात. त्यामुळे रिक्षा येईपर्यंत थांबावे लागते. या रिक्षा थांब्याला लागूनच पदपथ असूनही फेरीवाल्यांमुळे रस्तावरच उभे राहावे लागत आहे अशी प्रतिक्रिया राज चव्हाण यांनी दिली. महापालिका प्रतिक्रिया स्थानक परिसर ते गावदेवी मंदिरापर्यंतचा सर्व परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. फेरीवाल्यांसदर्भात नुकतीच आमची बैठक झाली. स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी आम्ही पूर्णपणे बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पथक नेमण्यात आले असून हे पथक दोन सत्रात काम करणार आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखाली, पादचारी पुल, स्थानक परिसर, गावदेवी परिसर या ठिकाणी येत्या दिवसात एकही फेरीवाला दिसणार नाही. स्थानक परिसर ते गावदेवी मंदिर या १५० मीटर च्या क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरी, या क्षेत्रात फेरीवाले दिसले तर, ताटकळ त्यांच्यावर कारवाई केली जाते. १५० मीटरच्या पुढील जे क्षेत्र आहे तसेच इतर परिसरातही अतिक्रमण विभागाची कर्मचारी नेमण्यात आली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई नियमित सुरु आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी  बोलताना दिली.

लाडक्या बहिणी, सुना,लेकीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत-राहुल हंडोरे

कल्याण : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना सामानतेचा अधिकार देऊन संविधानात तशी तरतूद करून समस्त महिला वर्गावर, लाडक्या बहिणीवर, लाडक्या सुना लेकीवर उपकार…

 शौचालय उद्घाटनाने साजरा झाला जागतिक शौचालय दिन

 घोलाईनगरमध्ये १०० शौचालयांचे लक्ष्य पूर्ण, ठामपा आणि शेल्टर असोसिएट्स यांचा संयुक्त उपक्रम   अनिल ठाणेकर अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एक घर एक शौचालय’ हा प्रकल्प राबवला जात आहे. घोलाई नगर, कळवा येथे या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन (१९ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकलपाची अमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात १०० शौचालये बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने, सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडित खेळही घेण्यात आले. त्यावेळी, कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते. 0000

बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर दोघांनाही ९०, ९३५ एवढीच मते – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण,  हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 000

 ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

 रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर…

पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी भाजपाचा उमेदवार नक्की झाल्याने सुरवातीला उपमुख्यमंत्रीपदाला नाकार देणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे सुत्रांचे…

निवडणूक आयोगाचा रात्रीस ‘खेळ’ चाले नाना पटोलें, परकला प्रभाकरांच्या आरोपाने खळबळ

स्वाती घोसाळकर मुंबई  : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भारताच्या निवडणूक आयोगाने मतांवर दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या रात्रीस चाललेल्या या खेळाचा नाना पटोले यांनी तर पर्दापाश…

संभाजी मैदानाची दुर्दशा, पालिका अधिका-यांचे दुर्लक्ष

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) – मुलुंड पूर्वेला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाची दुर्दशा झाली असून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी बाहेरून माती आणून धावपट्टी तयार केल्याने मैदानाची दुर्दशा झाली आहे. शिवाय धावपट्टी…

मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च

मुंबई : पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य, विधि, विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनासाठी किती रुपये खर्च करण्यात आले, यासंदर्भातील सत्र आणि वर्षनिहाय सांख्यिकी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देयक विभागाकडून संबंधित खर्चाची एकत्रित सांख्यिकी माहिती उपलब्ध करण्यात आली. या माहितीनुसार पुनर्मूल्यांकनासाठी २०२१ मध्ये १ लाख १५ हजार १२५ रुपये खर्च करण्यात आले. करोनाकाळामुळे इतर वर्षांच्या तुलनेत २०२१ या वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी कमी पैसे खर्च करण्यात आले. त्यानंतर २०२२ या वर्षात ३ लाख ३१ हजार ४७५, २०२३ या वर्षात ३ लाख ६१ हजार ८५५ रुपये खर्च करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातर्फे एका विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क घेण्यात येते. तर, एका विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५ रुपये मोजून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र एका उत्तरपत्रिकेची पुर्नतपासणी करण्यासाठी शिक्षकाला अवघे २५ रुपये दिले जातात आणि गरज असल्यास काही शिक्षकांना प्रवासी भत्ताही दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून एवढे पैसे का घेतले जातात ? पुनर्मूल्यांकनानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील, तर ही विद्यापीठाच्या मूल्यमापनातील चूक असून विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड का ? असे प्रश्नही विहार दुर्वे यांनी उपस्थित केले आहेत. ‘बहुसंख्य विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होतात, परिणामी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी शिक्षकांना कमी मानधन दिले जाते. पण त्याच वेळी विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी जास्त पैसे घेतले जातात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांकडून कमी पैसे घ्यावेत. तसेच जेव्हा विद्यार्थी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना निम्मे पैसे परत द्यावेत’, असे मत विहार दुर्वे यांनी व्यक्त केले. एका विषयासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क आहे. उत्तरपत्रिका छायाप्रतींसाठी ५० रुपये शुल्क आहे. ‘अत्यंत काळजीपूर्वक तपासणी’ पुनर्मूल्यांकनानंतर संबंधित विद्यार्थ्याची निकाल प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागते. तसेच सदर विद्यार्थ्याची गुणपत्रिका ही नव्याने तयार करून त्याला देण्यात येते. निकाल प्रक्रिया करणारा विभाग हा विनाअनुदानित स्वरूपातील असून कर्मचाऱ्यांच्या मानधनासह इतर खर्चही असतो. पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेत केवळ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचे मानधन नसते. तर एकूण प्रशासकीय व संपूर्ण प्रक्रियेचा खर्च पाहून ती रक्कम आकारली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची अत्यंत व्यवस्थितपणे तपासणी केली जाते. त्यामध्ये त्रुटी राहू नयेत, याची विशेष काळजी घेतली जाते, असे विद्यापीठ प्रशासनानाने स्पष्ट केले.