Category: मुंबई

Mumbai news

 ठाणे व मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – प्रताप सरनाईक

 प्रताप सरनाईक हे १ लाख ९ हजार ११६ मताधिक्यांनी विजयी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो वॅन, मेट्रो प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय, कोविड-१९ च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मतदारांसमोर विकासकामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे.” आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.

मंगल प्रभात लोढा यांना पडलेल्या मतांची टक्केवारी मुंबईत सर्वाधिक!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा दणदणीत माताधिक्य घेऊन विजय झाला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्रात एकूण १३७९११ इतके एकूण मतदान झाले असून,…

देवेंद्र फडणवीस यांना मोहित कंबोज यांनी उचलून साजरा केला विजयाचा आनंद,

मुंबई : महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मोहीत कंबोज यांनी उचलून घेतलं होतं. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून…

आचारसंहिता संपताच मुंबई महापालिका उगारणार कारवाईचा बडगा

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मुंबईत बानरवाजीला उत येण्याची शक्यता आहे.…

 प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली

 चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी   मुंबई: मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तुकाराम काते विजयी झाले आणि त्यांना आव्हान देणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली. तुकाराम काते यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्येकर्त्यांनी चेंबूर परिसरात मोठा जल्लोष केला. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर विजयी झाले होते. यावेळी पक्षाने त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिले. त्यांच्यासमोर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली. यापूर्वी तुकाराम काते अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. चेंबूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र भाजपचे बळ मिळाल्यामुळे तुकाराम काते यांना मोठी मदत झाली. मतमोजणी दरम्यान काते आणि फातर्पेकर यांच्यात मोठी चुरस सुरू होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये तुकाराम काते पिछाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर काते यांनी आघाडी घेत फातर्पेकर यांना मागे टाकले. अखेर २१ व्या फेरीअंती काते यांचा १० हजार ८२२ मतांनी विजय झाला. काते यांना एकूण ६२ हजार ९९१ मते मिळाली, तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२ हजार १६९ मते मिळाली. ०००००

मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची सरशी, वरुण सरदेसाई ११३६५ मतांनी विजयी

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी आणि अतितटीच्या लढाईत अखेर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवाराने वरुण सरदेसाई यांनी अखेर बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी…

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

 मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार   मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क  च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील. लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील “लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी” या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे. लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत. शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही. लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे. विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

अल्पवयीन मुलाने केला अपघात,

आरोपी मुलासहित वडिलांवर गुन्हा दाखल  सुनिल इंगळे उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलाने भरघाव वेगाने स्कूटर चालवून वृद्ध इसमाला धडक दिल्याने सदर वृद्ध गंभीरित्या जखमी झाला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या वडिलांनी स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी आरोपी मुलासहित त्याच्या वडिलांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर _1 परिसरातील सी ब्लॉक या परिसरात असलेल्या कोणार्क रेसिडेन्सी या ठिकाणी  बुधवारी रात्री 10  वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. कोणार्क रेसिडेन्सी मध्ये राहणारे निरंजन हरेशलाल ठाकूर ( 62) हे रस्ता ओलांडून घराकडे जात असतांना सुझुकी बर्गमन या स्कूटरने भरघाव वेगाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार्तिक याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व स्कूटरने निरंजन यांना धडक दिली,या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी निरंजन यांचा मुलगा नितेश ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी कार्तिक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात कार्तिक हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच मुलगा अल्पवयीन असून देखील तिच्या वडिलांनी त्याला स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुद्धा या अपघातात सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील हे करीत आहेत.  

महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर मालवाहू वाहनाला आग

वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांगा पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे (महालक्ष्मी ) येथील उड्डाण पुलावर एका वाहनाला आग लागली लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वा. गुजरात वरून मुंबई दिशेला नवीन चारचाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये आंतरिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. गुजरात कडून मुंबई दिशेला नवीन चार चाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे. वाहनात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असून आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन बाजूला करून स्वतःचा जीव वाचवला आहे. अगदी काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून अग्निशामक दल पोहोचण्यासाठी वेळ झाल्यामुळे ट्रक आणि आतील नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरील महामार्ग पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ढिसाळ नियोजन अभावी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या जवळपास पाच किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्याही मार्गावर वाहने विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे सहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी असल्याने संध्याकाळच्या वेळी जाणाऱ्या कामगारांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

झोपुचे संकेतस्थळ अद्ययावत

– आतापर्यंत १७३६ योजनांना मंजुरी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे संकेतस्थळ अद्ययावत व सहजगत्या हाताळण्याजोगे असून आता झोपडीवासीयांना सदनिका हस्तांतरण वा भाडेविषयक तक्रारींसाठी प्राधिकरणात हेलपाटे घालावे लागणार नाहीत. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रणालीद्वारे घरबसल्या हस्तांतरण तसेच तक्रारी करता येणार आहेत. आतापर्यंत १७३६ योजनांना परवानगी देण्यात आली असून या प्रत्येक योजनेचा सविस्तर तपशीलही संकेतस्थळावर नव्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शिवाय प्राधिकरणाच्या मुख्यालयात अंतर्गत बदल करून झोपडीवासीयांंसाठी सुलभ व्यवस्था निर्माण करून देण्यात आली आहे. झोपु योजनांसाठी पात्रता यादी वेळेत मंजूर होणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठा कालावधी तसेच भ्रष्टाचार होत होता. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी या प्रक्रियेत सुधारणा करूत सर्व सक्षम प्राधिकरणांना एकाच छत्राखाली आणले. त्यामुळे पात्रता यादीसाठी लागणारा विलंब कमी झाला. त्यासाठी कालमर्यादाही आखून देण्यात आली. याशिवाय रखडलेल्या भाड्याच्या वसुलीसाठी २१० क्रमांकाचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार दोन वर्षांचे आगावू भाडे आणि पुढील वर्षासाठी धनादेश दिल्याशिवाय झोपु योजनेचे काम सुरु करण्यावर निर्बध आणले गेले. त्याचा परिणाम होऊन झोपडीवासीयांचे रखडलेले भाड्याची वसुली मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत भाड्यापोटी ७०० कोटी रुपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. प्राधिकरणाकडून संबंधित झोपडीवासीयांना भाड्याचे परस्पर वितरण केले जात आहे. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संकेतस्थळावरच भाडे न मिळाल्याबाबत तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे झोपडीवासीयाला संकेतस्थळाद्वारे भाड्याच्या तक्रारी करता येऊ लागल्या. या तक्रारींचा दररोज मुख्य कार्यकारी अधिकारी वा सचिवांमार्फत आढावा घेतला जात असल्यामुळे उपनिबंधक विभागाला या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करून त्याबाबतचा अहवाला संकेतस्थळावरच उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे. याचा परिणाम म्हणजे भाडेविषयक तक्रारी कमी होऊ लागल्या आहेत. आता नवी योजना सुरु करण्यापूर्वीच विकासकाला दोन वर्षांचे आगावू भाडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय सदनिका हस्तांतरणही आता ऑनलाईन करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून आवश्यक ते शुल्क अदा केल्यानंतर ऑनलाईनच हस्तांतरण करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे हस्तांतरणासाठी दलालांकडून सहन करावा लागणारा त्रास कमी झाला आहे. ही सर्व प्रक्रिया ज्यांना ऑनलाईन करता येत नाही त्यांच्यासाठी प्राधिकरणातच मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे संबंधितांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय २२८ योजना विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊन त्याद्वारे येत्या तीन वर्षांत दोन लाख झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यापैकी घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय म्हाडा व पालिकेमार्फतही काही योजना कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे.