Category: मुंबई

Mumbai news

दादर दणाणलं, खो-खोचा जंगी महायुद्ध सुरू!

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धा पुरुष गटात पश्चिम रेल्वे वि बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया वि महाराष्ट्र पोष्ट; महिला गटात थरारक साखळी सामने मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार…

वडाळा येथे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा महिला व पुरुष संघ होणार सहभागी

मुंबई, दि. (प्रतिनिधी): येत्या शनिवार २१ व रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे महिला व पुरुष क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगेश गुंड,…

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन रमेश औताडे मुंबई : राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड. विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सतत तीन वर्षे नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन आयोजित करून कुलस्वामिनी साहित्य परिषद व निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक असून त्याचा वारसा जतन करून वाचनसंस्कृती जतन ठेवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले. संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या असून पुढील वर्षी साहित्य संमेलन गडकरींच्या आग्रहास्तव नागपुर येथे होणार असे जाहीर केले. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करीत असल्याचे नमुद केले. संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट मांडला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, सभापती विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जालिंदरनगर जि.प.शाळेचे दत्तात्रय वारे गुरूजी, अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी, सोनाली पवार, नीलेश घोडके, ॲड समीर गोडसे, बाळासाहेब चौधरी, विजयकुमार दाते, महेश लोखंडे, द्वारका सेवासदन व गुरुकुल व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध विषयांवरील कविता राज्यातून आलेल्या कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे यांनी मानले.

 शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार

शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार जीवनसत्व,घटकामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी अविनाश उबाळे मुंबई : शेवग्याच्या शेंगाचे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे.हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा व पानं व फुलांमध्ये प्रचंड असे…

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव रमेश औताडे मुंबई : वृक्षप्रेमींच्या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ६३ वा वार्षिक भाजीपाला, फळे आणि फुलांचा सोहळा माटुंगा येथील डी जी रूपारेल कॉलेज च्या…

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी मुंबईकर वापरत असलेले युटीएस ॲप आता बंद होणार आहे. येत्या १ मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे २८ फेब्रुवारीनंतर सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने युटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आला. मुंबई लोकलचं तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. पण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना रेलवन या ॲप RailOne कडे वळावे लागणार आहे. एक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता १ मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ची सुरुवात केली होती. 

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक मुंबई : मुलुंड येथे मेट्रोब्रिजचा भाग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने एक विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो-४ मार्गिकेची सखोल तपासणी करणार आहे.  या पथकाचे नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम करणार असून त्यांच्या सोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहे. त्यांच्या सोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन ९ आणि ५ चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे दहा ते बारा अधिकारी देखील असणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे. त्यांच्या तपासणीचे, साईट विझिटचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या पथकाचे मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आणि ज्या ठिकाणी काही चुकीचे अथवा नियमांचे उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणे आणि योग्य रित्या काम सुरू करून घेणे हे असेल. अशातच, तपासणीच्या वेळी नुकत्याच झालेल्या अपघातासारखे स्लैब, स्लैबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग या आणि अश्या इतर गोष्टी धोकादायक स्थितीत दिसून आल्यास लगेच कारवाई करणे आणि काढून टाकणे, हे देखील या पथकाचे मुख्य काम असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार, या रिपोर्ट मध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्या, त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आले, हे सर्व रिपोर्टमध्ये द्यावे लागणार आहे.

राज्यभरात एटीएसकडून छापे

राज्यभरात एटीएसकडून छापे एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २१ ठिकाणी धाडी  अनेकजणांची चौकशी मुंबई: एन महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात तब्बल २१ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने राज्यभर एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु झाले. या…

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात चिंचवली : वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र येथे ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा…

 अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धा अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक राज्य…