Category: मुंबई

Mumbai news

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही – प्रफुल्ल पटेल 

 मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला दिला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे  सांगितले. २५ मतदारसंघ असे आहेत…

चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा ‘मिस्टर इंडिया !

सहा गाड्या उडवूनही एफआयआरमधून गायब मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह सहा वाहनांना धडक दिलीय. अपघातावेळी संकेत ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता…

महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व

नवी मुंबई : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन असून कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक आहे हे लक्षात घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन  चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलैला या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम उत्साहाने राबविला जात आहे. याकरिता इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या यांची निवड करून वाचन करीत आहेत व त्यावर विचार करून पुस्तकाचा सारांश लिहीत आहेत. हा सारांश महावाचन पोर्टलवर अपलोड केला जात आहे. या वाचन चळवळीचा एक भाग म्हणून ‘महावाचन उत्सव 2024’ अंतर्गत श्रीगणेशोत्सवाची सुट्टी लागण्यापूर्वी कोपरखैरणे गाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 36 येथे वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथालय प्रदर्शनामध्ये कोपरखैरणे परिसरातील 22 शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनाप्रसंगी 97 मुख्याध्यापक, 71 पालक, 136 शिक्षक, 5143 विद्यार्थी अशा एकूण 5447 उपस्थितांनी या प्रदर्शनाला भेट देत ग्रंथसंपदेचा अनुभव घेतला. या ग्रंथालय प्रदर्शनाचे शुभारंभ शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महानगरपालिका सचिव तथा कवयित्री श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, कवी मोहन काळे उपस्थित होते. यावेळी श्रीम. चित्रा बाविस्कर व श्री. मोहन काळे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर कविता ऐकवत वाचनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी कविता गायन केले. वाचन संस्कृती जपणुकीच्यसा दृष्टीने महत्वाच्या असणा-या या अभिनव उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा उत्स्फुर्तपणे सहभाग लाभला. काही पालकांनीही याप्रसंगी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्व सांगितले. या महावाचन उत्सव उपक्रमाच्या माध्यमातून लहानथोरांनी एकत्रित येऊन पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले.

आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून वादंग

स्वाती घोसाळकर मुंबई- मालवणमधिल शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून उठलेला वादंग शमतो न शमतो तोच आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सरसंघचालक…

आरएसएस, भाजपाकडून इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे- जितेंद्र आव्हाड

 मुंबई :  शिवाजी महाराजांची झाडाझुडपात लपलेली समाधी  ही महात्मा जोतिबा फुले यांनीच शोधली आहे. तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करत आहात, अशी संतप्त प्रतिक्रीया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शिवाजी महाराजांची समाधी…

मुंबईकर रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. या विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लाखोंची गर्दी उसळली होती… सायनच्या कलाकार जानवी राहुल रोकडे  यांनी त्यांच्या…

 दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती

 ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून, त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडुपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील पाच ठिकाणे, देवनार परिसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत. ९,६०० झोपड्यांचे होणार स्थलांतर मुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे.

 दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

     इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन  पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत 2766 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10672 श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था केली होती. आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व  स्वयंसेवक तत्पर होते. ठिकठिकाणच्या नागरिकांनी उत्तम विसर्जन व्यवस्था ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली. त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती तसेच 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10656 घरगुती व 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10672 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 2174 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2035 घरगुतीव 04 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 374 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1119 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 372 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्नझाले. वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 745 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 433 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 472 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 443 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले. कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 901 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 419 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1343 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 208 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1220 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 59 घरगुती तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 129 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.…

मुख्यमंत्री शिंदेनीच केला ‘दादां’चा करेक्ट कार्यक्रम !

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चक्क मुख्यमंत्र्यांनाच बगल देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीरातीमुळे दादा आणि भाईंचे (एकनाथ शिंदे) नेते आणि कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याय नेत्यांनीही याबाबत जोरदार आक्षेप नोंदवूनही…

जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.), काळाचौकी, मुंबई वर्ष-७२ वे सुशील मनोज साळसकर – अध्यक्ष मंगेश घेगडे – सरचिटणीस संदिप मेंगडे – खजिनदार 0000