Category: मुंबई

Mumbai news

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.  मुंबईतील दादर मार्केटमध्ये गौरीचे मुखवटे तसेच  गौरीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी  गर्दी उसळली होती…   मुंबई:  गणरायाच्या आगमनानंतर अडीच दिवसातच म्हणजे भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला…

माऊंट मेरी जत्रेनिमित्त बेस्टच्या १२१ जादा बस

मुंबई : वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत असून त्या निमित्त १५ सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टकडून संपूर्ण आठवडाभर १२१ अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या., ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील. माऊंट मेरी चर्च, फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 २. ५ लाख मुंबईकरांना ‘एसटी’नं पोचवलं कोकणात

 गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की कोकणात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि कोकण हे एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं. आता गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमानी कोकणात जात-येत असतात. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजे एसटीला प्राधान्य दिलं आहे. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह आदी शहरातून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या ५ दिवसांत पोहोचले आहेत. तब्बल ५००० पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली. या बद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, आता १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या

गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जात आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागात एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये. वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये. तसेच जलप्रदुषण होऊ नये, नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ रहावेत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. विसर्जन आपल्या दारी या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांमध्ये एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांंसाठी वापरण्यात येते. गेल्या काही वर्षापासून गणेश भक्त घराजवळील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत. भाविक शाडूच्या मूर्तींचा अधिक प्रमाणात वापर करत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. गणपती विसर्जन काळात कोळी बांधवांकडून पालिकेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ. जाखड यांनी कोळी बांधवांचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांचा कोळी बांधवांची टोपी आणि शाल देऊन कोळी बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे – मास्टर कृशांग हरीहरन, स्वरांग दाबके, विहंग मुळ्ये, केशव खटावकर. मोठ्या गटातील विजेते अनुक्रमे – निरज कुमार वैष्णव, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के, प्रथमेश दाते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

लाडक्या बहि‍णींमुळे होमगार्ड ‘नावडते’

मुंबई : राज्यात धुमधडाक्यात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीणी’ योजनेचा फटका राज्यातील होमगार्डना बसल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहीणी योजनेला पैसै वळवल्यामुळे निधीअभावी राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल…

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या  माउंट मेरीच्या जत्रेला आज मुंबईतील वांद्रे येथे सुरूवात झाली . येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ही जत्रा सुरु राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबईत त्यांच्या  स्वागताला करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.