Category: मुंबई

Mumbai news

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

  मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार…

बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला

  मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे.…

‘राष्ट्रीय समूह गान’स्पर्धेत एसपीएमच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

    मुंबई : भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या…

मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन

  मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील…

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी परिसरातील विशेष तपासणी शिबीरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

    नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस…

शैक्षणिक मागण्यांसाठी आज राज्यभर महामोर्चे

अनिल ठाणेकर   राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असून मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे…

वेतनवाढ नसतानाही कामगारांच्या चेहऱ्यावर स्माईल

रमेश औताडे   मुंबई : महाराष्ट्राची लाल परी एसटी महामंडळातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर काही काळ का होईना स्माईल दिसू लागली आहे. वेतनवाढ व भरघोस बोनस…

पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न

 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत…

माविआचा जागावाटपासाठीचा मुहुर्त ठरला

 २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे मुंबईत येणार स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात मविआने मात्र…

 पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत असून विविध ठिकाणांहून दररोज 110 पाणी नमुने तपासण्यात येत असतात. सध्याच्या पावसाळी कालावधी लक्षात घेऊन यामध्ये वाढ करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने पाणीपुरवठा विभागास देण्यात आले होते, त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम आज संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. यामध्ये नेहमीपेक्षा 10 पट अधिक म्हणजे 1000 पेक्षा अधिक पाणी नमुने महापालिका क्षेत्रातील विविध भागांतून संकलित करण्यात आले व त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासण्यात आली. या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.* केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत *‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’* हे विशेष अभियान जाहीर करण्यात आले असून त्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याचा संदेश अधोरेखित करण्यात आलेला आहे. या अभियानात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झाली असून स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम लोकसहभागावर भर देत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे *नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचा हा अभिनव उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आला असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी सांगितले.* या पाण्याच्या चाचणी मोहीमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील पीएच (pH), Turbidity, TDS (Total Disssolved Solids), Residual Cholrine इत्यादी घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहे. तसेच E-Coli ही चाचणी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे. सेक्टर 50 मलप्रक्रिया केंद्र येथील प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिेंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. वसंत पडघन, उपअभियंता श्री.सचिन शिंदे, उपअभियंता स्वप्निल देसाई, कनिष्ठ अभियंता श्री.किरण सानप व श्री.वैभव देशमुख उपस्थित होते. या मोहीमेत सर्वच विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिले. *पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पाण्याच्या नियमितपणे होणा-या गुणवत्ता चाचणी संख्येत लक्षणीय वाढ केल्याने नमुंमपा क्षेत्रातील पाणी गुणवत्तेचे प्रमाण अधिक बारकाईने लक्षात येईल व त्यानुसार आवश्यकता भासल्यास सुधारणा करणे शक्य होईल असे सांगत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमाला नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांनी पुढील काही दिवसात आणखी एकदा अशा प्रकारची पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 00000