Category: मुंबई

Mumbai news

 बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न “भविष्यासाठी शाश्वत प्रगती” या संकल्पनेवर दोन दिवसीय शास्त्रीय मंथन मुंबई : विद्या प्रसारक मंडळ संचलित बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथील…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारीला अजितदादा पवार यांची शोकसभा मुंबई:-महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने कबड्डीचे आधारवड संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई, दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क)…

 महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत

७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – तेलंगणा, २०२६. महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत मुंबई:- महाराष्ट्राच्या महिला संघाने “७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उप उपांत्य फेरी गाठली. तेलंगणा येथील गच्ची बोवली बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपउपांत्यापूर्व सामन्यात महाराष्ट्राने आज गोवा संघाला ४२-३६ असे नमविले. सुरुवातीला थोडी झटपट पहावयास मिळाली. पण पहिला लोण देत महाराष्ट्राने १९-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीला महाराष्ट्राकडे २५-१४ अशी आघाडी होती. विश्रांती नंतर आणखी एक लोण देत महाराष्ट्राने आपली आघाडी ३२-१५ अशी वाढविली. या नंतर गोव्याने गतीमान खेळ करीत महाराष्ट्रावर लोण देत ३०-४० अशी आघाडी कमी केली. शेवटी महाराष्ट्राने ६ गुणांनी बाजी मारली. आम्रपाली गलांडे, याशिका पुजारी, निकिता पडवळ याच्या दमदार चढाया त्यांना समृद्धी मोहिते, समरीन बुरोंडकर, ज्यूली मिस्कीटा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला. महाराष्ट्राचा या स्पर्धेत ई गटात समावेश होता. त्या गटात छत्तीसगड, विदर्भ व केरळ हे अन्य संघ होते. महाराष्ट्राने प्रथम विदर्भला ५७-२० असे, त्या नंतर छत्तीसगडला ४२-१९ असे, तर शेवटी केरळला ५७-११ असे पराभूत करीत या गटात अव्वल स्थान मिळविले होते.

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ  

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी आज सुरु झाली. महाराष्ट्राचे लाडके क्रीडा प्रेमी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे कोणताही गाजावाजा न करता अजित पवार यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सर्व खेळाडूंनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व स्पर्धा सुरु करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळ दादर शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी व सिस्का कॅरम कंपनीचे अतुल मेहरा यांनी कॅरम बोर्डवर एक डाव खेळून औपचारिक उदघाटन केले. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन यांचे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेला सकाळी ९ वाजता सुरवात झाली. पहिल्या फेरीतच प्रेक्षकांना चुरस बघायला मिळाली. महाराष्ट्रच्या डॉ अनिल तायशेटेने पहिल्या सत्रात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू व राष्ट्रीय विजेत्या कर्नाटकच्या झहीर पाशाला पहिला सेट १७-११ असे हरवून खळबळ .माजवली. परंतु आक्रमक खेळाच्या जोरावर झहिरने दुसरा व तिसरा सेट २५-०, २५-५ असा सहज हरवून आपले आव्हान कायम ठेवले. खुली एकेरी पहिल्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे ओमकार टिळक ( महाराष्ट्र ) वि वि रघुनाथ वाघपंजे ( महाराष्ट्र ) १३-२७, १७-१३, १५-५ आर अरोक्यराज ( तामिळनाडू ) वि वि इरफान खान ( महाराष्ट्र ) १८-१०, १९-६ रिंकी कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि जगन्नाथ मैत्रानी ( महाराष्ट्र ) २५-०, २२-० प्राजक्ता नारायणकर ( महाराष्ट्र ) वि वि सूर्यकांत मोरे ( महाराष्ट्र ) २०-४, २३-१० रीतिकेश वाल्मिकी ( महाराष्ट्र ) वि वि अजगर शेख ( महाराष्ट्र ) ४-२२, १६-१४, १७-१५ खातीम खलील ( मालदीव ) वि वि रियाझुद्दिन शेख ( महाराष्ट्र ) २५-१-२५-० के श्रीनिवास ( तेलंगाना ) वि वि जितेंद्र राठोड ( महाराष्ट्र ) २०-५, २५-५ संगीर अहमद ( उत्तर प्रदेश ) वि वि अब्दुल कयूम खान ( महाराष्ट्र ) २५-०, २५-० काजल कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि सतीश खरात ( महाराष्ट्र ) १४-१०, १८-२ इब्राहिम हुजान अली ( मालदीव ) वि वि उदय घाडीगावकर ( महाराष्ट्र ) २४-९, १६-२ विशाल परमार ( महाराष्ट्र ) वि वि शेख युसूफ ( तेलंगना ) १६-११, १९-० यु नरेश ( तेलंगाना ) वि वि आकाश मुरल ( महाराष्ट्र ) २१-०, २५-० वी आकाश ( ओरिसा ) वि वि हर्ष बारिया ( महाराष्ट्र ) २५-०, २३-९

नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे

मुंबईत कुस्तीचा महासंग्राम नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे मुंबई: अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन  नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी झेंडा फडकावला. विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे झालेल्या या एकदिवसीय कुस्ती लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण २८ कुस्तीपटूंनी आपली ताकद आजमावली. स्पर्धेची सुरुवात हरियाणा व पंजाब यांच्यातील चुरशीच्या सामन्याने झाली. या लढतीत हरियाणाच्या ५ कुस्तीपटूंनी विजय मिळवला, तर पंजाबच्या २ कुस्तीपटूंनी बाजी मारली. परिणामी पहिला सामना हरियाणा संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना झाला. महाराष्ट्राच्या ४ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, तर उत्तर प्रदेशच्या ३ कुस्तीपटूंनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्र संघ विजयी ठरला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा आमनेसामने आले. महाराष्ट्रच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक या पाच कुस्तीपटूंनी शानदार विजय मिळवला, तर हरियाणाच्या अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी आपापले सामने जिंकले. अंतिम फेरीत महाराष्ट्रने ५–२ असा विजय मिळवत नरसिंह यादव दंगल लीगचे चॅम्पियन पद पटकावले. या स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, दुबईतील उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी प्रेक्षकांशी साधलेल्या संवादामुळे मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना आयोजक नरसिंह यादव म्हणाले, “देशातील कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा लीग स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कुस्तीपटू घडतील. मुंबई व परिसरातील प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.” स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. विजेत्या महाराष्ट्र संघाला आयोजक नरसिंह यादव आणि डॉ. शिल्पी शेरॉन-यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि ‘नरसिंह यादव दंगल लीग’ ची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक ठरली. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संघबळाच्या जोरावर महाराष्ट्राने चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २0२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दु:खद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना नि:शब्द करुन टाकणारी ही दुर्दैवी घटना प्रत्येकाला सुन्न करुन टाकणारी होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सर्व विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत नागरिक यांच्या उपस्थितीत स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान असणा-या अजितदादा पवार यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाच्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राची व प्रशासनाची फार मोठी हानी झाली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली. आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या पायाभरणीपासून उभारणीपर्यंत तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांना गती देण्यात व अनेक प्रसंगी त्यांचे योगदान लाभले जे कधीही विसरता येणार नाही असे आयुक्त म्हणाले. मंत्रालय सेवेत असतांना त्यांच्या कामाची पध्दत जवळून पाहता आली. साता-यामध्ये काम करताना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कोव्हीड काळात पालघरचा जिल्हाधिकारी असतांना मोठया प्रमाणावर कामगार आपल्या गावी स्थलांतर करीत होते अशा वेळी आवश्यक प्रसंगी रात्री २ वाजताही त्यांच्याशी बोलणे झाले व त्यांनी लगेच मदतही केली. सिडकोत असतांनाही त्यांचे विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन मिळाले अशा विविध ठिकाणच्या आठवणी आयुक्तांनी कथन केल्या. दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधन झालेले त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट कॅ. सुमित कपूर, कॅ. शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करत सर्वांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक ‘सलामी ‘ मुंबई -प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत…

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष रमेश औताडे मुंबई : रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळखले जात नाहीत. परिणामी कोट्यवधी विवाहित महिलांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. काळा घोडा कला महोत्सवात या अनंत साडीचे प्रदर्शन एल्फिन्स्टन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.

 राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी लागू केलेले नवीन नियम म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर लादलेला कायदा योग्य नसून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशनने केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रयोग थांबवावेत, असेही संघटनेने स्पष्ट केले. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अ‍ॅड. राहुल उपाध्याय आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनजी यांनी संयुक्त निवेदन जारी करून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी नियमांना जे माध्यमांमध्ये यूजीसी समानता / भेदभाव विरोधी नियम म्हणून ओळखले जात आहेत) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचा अर्थ असा की हे नवे नियम सध्या अंमलात आणता येणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार नाहीत. विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद न साधता घेतलेले निर्णय अस्वीकार्य असून त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला. संविधानाने दिलेले समान संधीचे अधिकार अबाधित ठेवावेत आणि उच्च शिक्षण क्षेत्राला राजकारणापासून पूर्णतः मुक्त ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यूजीसी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून त्यावर कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही ब्राह्मण सेवा फाउंडेशनने दिला आहे.