दादर युनियन म्हणजे शिस्त – वेंगसरकर
दादर युनियन म्हणजे शिस्त – वेंगसरकर मुंबई : “दादर युनियन म्हणजे शिस्त हे समीकरणच आहे. तुम्ही क्रिकेट खेळात असाल किंवा नसाल ; पण तुमच्या अंगात शिस्त भिनलेली असेल तर तुम्ही…
Mumbai news
दादर युनियन म्हणजे शिस्त – वेंगसरकर मुंबई : “दादर युनियन म्हणजे शिस्त हे समीकरणच आहे. तुम्ही क्रिकेट खेळात असाल किंवा नसाल ; पण तुमच्या अंगात शिस्त भिनलेली असेल तर तुम्ही…
राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा भोंदूगिरी भोवली पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता ० पुणे : भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागलेल्या रुपाली चाकणकरांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा…
धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळिमा संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या दोन्ही पोलिसांना अटक दहा हजार डॉलर लुटण्यासाठी केले किडनॅपिंग सिद्धेश शिगवण मुंबई…
खुशखबर ! २५०० घरांसाठी म्हाडाची लॉटरी ३१ मार्चला मुंबई : मुंबईत स्वतःचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) लवकरच मुंबईतील २५०० घरांच्या विक्रीसाठी ३१ मार्च २०२६ रोजी लॉटरी जाहीर होणार आहे. सोडतीत यंदा ३२ लाख ते ८ कोटींपर्यंत घरांच्या किंमती असणार आहे. मात्र,…
सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस मुंबई, दि. — महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे आज मुंबईत उत्साहात पार पडले. कन्नमवार नगर, विक्रोळी येथे मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण…
वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…
धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहिती मुंबई,दि.२७ — धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी ५०० चौ.फू. चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजुनही देत नाही, धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन,एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’ या संघटने तर्फे येत्या ५ एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली.या बैठकीस २०० कार्यकर्ते उपस्थित होते. आता आगामी धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी एक बैठक ५ एप्रिल रोजी धारावीत होणार आहे.या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे. हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका धारावी झोपडपट्टीवासियांना ५०० चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे.तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे.तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत.यात १०० झोपड्यांमागे १५/२० झोपड्या पात्र बाकीच्या ८०\८५ झोपड्या अपात्र… हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे.सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे.लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत ५ एप्रिल नंतर धरणे, मोर्चे,निदर्शने करण्यात येणार आहेत असेही बाबुराव माने यांनी सांगितले. दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून ते ही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे.याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई,खासदार वर्षा गायकवाड,आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलन ने म्हटले आहे. धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत.त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे.खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी ५०० चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा,धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत.या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी – राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.
संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका स्पष्ट रमेश औताडे मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही; मात्र कोणत्याही व्यक्तीवर आरोप करताना पुरावे आणि तपास यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. संमती आणि जबरदस्ती यामध्ये स्पष्ट फरक आहे. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांमध्येही परस्पर संमतीने घडलेल्या संबंधांना वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सर्व बाजू ऐकून, पुराव्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने हेही स्पष्ट केले की, महिलांवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे आणि अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर, कोणत्याही व्यक्तीवर खोटे आरोप होणार नाहीत याची काळजी घेणेही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. समाजात दोन्ही बाजूंचा विश्वास टिकून राहण्यासाठी समतोल दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे असे आयोगाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी सांगितले.
मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मुंबई : अव्वल मानांकित पूर्वा बर्वे आणि दुसऱ्या मानांकित आर्या कोरगावकरने माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पादूकोण अकादमीद्वारे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. राऊंड ऑफ ३२ फेरीत पूर्वाने आक्रमक शैली आणि उत्तम डावपेचांच्या जोरावर अनन्या राणेवर १५-०, १५-८ असा विजय मिळवला. आर्याला टियान कॅस्टेलिनोकडून थोडा प्रतिकाराचा सामना करावा लागला. पण तिने १५-५, १५-८ असा विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, शिवंजली कार्डिलेने टिया उग्रानकरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत १७-१९, १५-६, १५-१३ अशी बाजी मारताना अव्वल दोन मानांकित खेळाडूंसोबत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसरी मानांकित श्रेया भोसले आणि चौथी मानांकित श्रेया शेलार यांनीही राऊंड ऑफ १६ फेरीत स्थान मिळवले. ज्युनियर गटांमध्ये, १५ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक अंबरकर आणि आदेश एकाडेने राऊंड ऑफ ३२ फेरीतील आपापले सामने जिंकले. श्लोकने पुनरागमन करत आराध्य पवारला १२-१५, २०-१८, १५-९ असे हरवले तर आदेशने आदित्य सरवदेवर ११-१५, १५-७, १५-१० अशी मात केली. निकाल – महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२ फेरी): १- पूर्वा बर्वे विजयी वि. अनन्या राणे १५-०, १५-८; २-आर्या कोरगावकर विजयी वि. टियान कॅस्टेलिनो १५-५, १५-८; शिवांजली कर्डिले विजयी वि. टिया उग्रंकर १७-१९, १५-६, १५-१३; ३-श्रेया भोसले विजयी वि. रुची राणे १५-५, १५-१; ४-श्रेया शेलार विजयी वि. ऋषिका पाल १५-४, १५-४. १५ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अन्विषा घोरपडे विजयी वि. पहल तन्ना १५-३, १५-४; मनस्वी राऊत विजयी वि. मीरा दीक्षित १५-८, १५-१३; अनुश्री मोडलिंबकर १५-५, १५-७; आराध्या शुक्ला विजयी मेहा शाह १५-७, १५-५;
आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा हॉस्पिटल अंतिम फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्धशतकवीर सुभाष शिवगण, सलामीवीर जगदीश वाघेला, अष्टपैलू प्रकाश सोळंकी यांच्या दमदार खेळामुळे जेजे हॉस्पिटलने बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचा ९ विकेटने पराभव केला. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने अर्धशतक ठोकूनही रहेजा हॉस्पिटलला उपांत्य उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलामीवीर सुभाष शिवगण व सचिंद्र ठाकूर यांना सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊन मुंबई क्रिकेट संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले, प्रतिष्ठानचे सेक्रेटरी विराज मोरे व वैभव मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात जेजे हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून रहेजा हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने ४८ चेंडूत ५९ धावांची आक्रमक फलंदाजी केल्यामुळे रहेजा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १२९ धावांचा टप्पा गाठला. सलामीवीर जगदीश वाघेला (३३ चेंडूत ४२ धावा) व सुभाष शिवगण (४१ चेंडूत ५३ धावा) यांनी ११ व्या षटकाला पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे जेजे हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १ बाद १३२ धावा साकारून सहज साध्य केले. शिवतीर्थावर विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानाने घडवले. त्याच मैदानावर ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृतीप्रीत्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी आंतर रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे सातत्य त्यांचे सुपुत्र अश्विनीकुमार मोरे यांनी कायम राखणे, भूषणावह असल्याचे मनोगत एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले यांनी व्यक्त केले.