Category: मुंबई

Mumbai news

ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते

सब जुनियर कॅरम स्पर्धा ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथील महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये संपन्न झालेल्या ५९ व्या सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील सब जुनियर गटात अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राष्ट्रीय कॅरमपटू ओंकार वडारने मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेवार १९-१३, १६-६ असा एकतर्फी विजय मिळवला. तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबई उपनगरच्या उमेर पठाणने ठाण्याच्या नील म्हात्रेला ११-२१, २१-०, २१-९ असे नमवले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या वेदिका पोमेंडकरने प्रतिस्पर्धी मुंबईच्या गौरी सावंतवर ११-४, १६-४ अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या सारा देवनने धुळयाच्या कल्याणी मराठेवर २१-०, २१-१ असा सहज विनय मिळवला. १२ वर्षाखालील ( कॅडेट ) मुलांच्या गटात अंतिम सामन्यात ठाण्याच्या शिवांश मोरेने ठाण्याच्या आपल्या सहकारी समर्थ खंडेलवलवार तीन सेटमधील रंगतदार लढतीत २१-५, १-१६ व ९-८ असा उत्कंटावर्ध विजय मिळवून जेतेपद पटकावले. या गटात तिसरा क्रमांक मिळवताना पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्र इंगळेवर २१-०, १९-२ असा विजय मिळवला. मुलींच्या १२ वर्षाखालील ( कॅडेट ) गटात राष्ट्रीय कॅरमपटू रत्नागिरीच्या निधी सप्रेने बाजी मारली. तिने ठाण्याच्या देविका जोशींचा २१-१, १९-४ असा सहज धुव्वा उडवत आपल्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले. तर तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या सिंधुदुर्गच्या दिव्या राणेने पुण्याच्या आरवी शेलारवर ६-१८, १३-७ व १३-११ असा निसटता विजय मिळवला. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले यांच्या हस्ते व उपस्थितीत आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव रमेश औताडे मुंबई : धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्था बिघडत आहे. पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कर्करोग सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अशी माहिती मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेड च्या एका सर्वेक्षण अहवालात समोर आली आहे. अनियमित शौच, ऑसिडिट, शौचावाटे रक्त येणं यासारख्या लक्षणावर लोक कशी प्रतिक्रिया देतान, तसेच डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब व त्यामुळे निदान करण्यास होणारा विलंब आणि जागरुकतेचा अभाव यामागील त्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला. या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी, एस. एन. रहेजा हॉस्पिटल, मुंबई चेबीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोसे, मर एच. एन. रिलायन्स हॉस्पीटल, मुंबई येथीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते.

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले मुंबई / रमेश औताडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग रमेश औताडे मुंबई: हवामान बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील जनतेच्या बेरोजगारीवर झाला आहे. यावर उपाय म्हणून समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. पर्यावरण बिघडले असले तरी माणसाला नवीन संधी मिळत असून उदरनिर्वाह करण्याची नवनवीन प्रयत्न यशस्वी होत आहेत. डीपी वर्ल्डचा सागरी सेवा व्यवसाय असलेल्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयएनईसीसी) आणि क्लाइमाक्रू यांच्या भागीदारीत राबवला जात आहे. डीपी वर्ल्डच्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए-मरीन सर्व्हिसेसचे प्रादेशिक संचालक-भारत सी. एम. मुरलीधरन म्हणालेः “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सागरी शैवाल शेती किनारपट्टीवरील समुदायांना लवचिक उपजीविका देते. उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून समुद्री शैवाल लागवडीला जागतिक स्तरावर वाढत्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूलन आणि परिसंस्थेचे पुनरुत्पादन या दोहोंना आधार देणारी कमी परिणाम करणारी सागरी उपजीविका उपलब्ध होते.

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’ राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ…

महाराष्ट्रात चाललंय काय ?

महाराष्ट्रात चाललंय काय ? झिरवळ हे वागणं बरं नव्हं माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड ० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि ‘दारू’बाजी ० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड ०…

भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक

केतन खेडेकर मुंबई : अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई अग्निशमन केंद्र मुख्यालय, भायखळा, येथे नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील २२ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५-०७, १६-१४ असा पराभव केला. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने दुसऱ्या सेट मध्ये आघाडी घेतली होती, तरीही इस्तियाक याने त्याचे आव्हान परतवून विजय संपादन केला. उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५-०६, १५-०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५-११, १५-०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हर पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली. उपउपांत्य फेरीचे निकाल : अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१-१४ इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१-१० आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१-६ सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१-१६ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले., तंत्री सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी पाटील साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत; केंद्र अधिकारी बोरुले, के किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ; गजानन आंगणे, श्री भराडी देवस्थान आंगणेवाडी, मालवण यांनीही स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी घोष साहेब व भोर सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे साहेब व भगत साहेब वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि प्रमुख अतिथी सुरज चव्हाण सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले. ००००००००

 लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाचा ७ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लीलावती हॉस्पिटलचा राहुल जांभळे व केडीए हॉस्पिटलचा अॅलन गावद्या यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रीडाप्रेमी अरुण माने, रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. शिवाजी पार्कमधील बीएमसी खेळपट्टीवर लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा), अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा), सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५८ धावांचा टप्पा गाठला. स्वकीत पांचाळने २५ धावांत ३ बळी व जगदीश कोठारेने ३६ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्य गाठताना धावगती जलद करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये भरवंशाचा सलामीवीर मनोहर पाटेकरला (१३ चेंडूत १३ धावा) केडीएच्या दक्ष क्षेत्ररक्षकांनी धावचीतद्वारे टिपले. परंतु त्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा), संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा), संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून लीलावती हॉस्पिटलचा विजय १८.१ षटकात ३ बाद १५९ धावा फटकावून साकारला. दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलला ३५ धावांनी पराभूत करतांना प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) व दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांची फलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) व निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सायन हॉस्पिटलला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा शिवसेनेची मागणी मुंबई: देवीपाडा व जय महाराष्ट्र नगर, टाटा विद्युत संग्राही केंद्र, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील  नागरिकांसाठी असलेली मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) बस क्र.२९९ व बस क्र. २९3 या बेस्टची बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत  सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२ व १४ च्या वतीने करण्यात आली. ही बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मागाठाणे डेपो प्रमुख जितेंद्र सामंत यांना भेटून लोकांच्या समस्या सविस्तर सांगितल्या व मागण्यांचे निवेदन दिले.  यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मागाठाणे विधानसभाप्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, उपविभागसंघटक सिमीतिनी नारकर, वैभवी तावडे, शाखाप्रमुख सचिन मोरे, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, प्रतीक चव्हाण, दिनेश विचारे, मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर, विजया गायकवाड, सीमा सानप, मंगल करडे, कौस्तुभ खानविलकर उपस्थित होते.  

जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश?

 जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश? पदोन्नतीसाठी ‘५० लाखांचा दर’ चर्चेत; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी लांबणीवर मुंबई : राज्यात जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यांना…