Category: मुंबई

Mumbai news

 ३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’

३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत रंगली मुंबई:  बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘अर्घ्य २०२६’ ही भव्य आणि ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल अत्यंत उत्साहात आणि रसिकांच्या दादेत पार पडली. संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० कलाकारांनी एकत्रित सादरीकरण करत एक अद्वितीय सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना दिला. या विशेष स्वर मैफिलीत सतारवादक पं. रवी चारी, प्रख्यात गायक पं. राम देशपांडे, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, तबलावादक पं. योगेश साम्सी आणि पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके या पाच दिग्गज कलाकारांनी आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करत गुरु-शिष्य परंपरेचा भव्य आविष्कार साकारला. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी राग आणि ताल यांच्या शाश्वत संगमातून एक सुरेल, समन्वयपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी ‘सिम्फनी’ साकारली. या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती ही मैफलीची विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि आध्यात्मिक अधोरेखित अर्थ प्राप्त झाला. आजच्या काळात फ्युजन संगीताचा प्रभाव वाढत असताना ‘अर्घ्य २०२६’ने शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताचा एक भव्य आणि सखोल पर्याय रसिकांसमोर यशस्वीपणे मांडला. अनेक वाद्ये आणि स्वर एकत्र आणत तयार झालेल्या या संगीतमय संवादाने श्रोत्यांना भावनिक आणि ध्यानमग्न अनुभव दिला. ही केवळ एक मैफल नसून भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत उत्सव ठरला. ‘अर्घ्य २०२६’ने परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचा संगम घडवत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक

 दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली…

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ?

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ? मुंबई : अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २० टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. कोकणातील…

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी राजन चव्हाण सावंतवाडी:  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक बनली असून  सेनेच्या वतीने शहरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. अशोक खरात प्रकरणी आमदार दीपक…

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’ स्लग- निरोप समारंभात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी स्वाती घोसाळकर मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत त्यांच्यासह इतर एकुण ९…

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ?

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ? आमदार विलास तरे यांचा विधानसभेत थेट सवाल  मूळ जमीन मालकांना न्याय मिळणार; सीआयडी चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नायगाव मौजे टिवरी येथे…

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील राजकीय समीकरणे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी आणि राज्य केरळ येथे घडणाऱ्या राजकीय घडामोडी भाजपसाठी संधी आणि…

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान

  पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील राजकीय समीकरणे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी आणि राज्य केरळ येथे घडणाऱ्या राजकीय घडामोडी भाजपसाठी संधी आणि आव्हान यांचे अनोखे मिश्रण…

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर मुंबई :: युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि नॉकआउट स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या निवड चाचण्या २७ मार्चला सायं. ४ते  ६ वाजेपर्यंत, युनियन क्रिकेट अकॅडमी, कल्याण येथे पार पडतील. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी नॉकआउट स्पर्धेत अकॅडमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. पात्रता: – सर्व वयोगटातील मुलींसाठी खुले क्रिकेटची आवड असणे आवश्यक, सोबत आणावयाच्या वस्तू,  संपूर्ण क्रिकेट किट, स्पोर्ट्स शूज, पाण्याची बाटली निवड निकष: – खेळातील कामगिरी- फिटनेस- शिस्त – खेळाची समज अकॅडमीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य संधी देणे हा आमचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.” अधिक माहितीसाठी ९९६८८५६७८८ या क्रमांकावर संपर्क साधा