Category: मुंबई

Mumbai news

छगन भुजबळांची ‘ईडी’पीडा संपली

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीनेही दिली क्लीनचीट मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही क्लीनचीट दिली आहे. सक्तवसुली संचालनालय (भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा…

लढत आहोत आणि लढणार आहोत !

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात उद्धव आणि राज ठाकरेंचा एल्गार मुंबई : हिंदृहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, आपण जगायचं हे कसं विसरुन गेलो तर दोन व्यापाऱ्याचे गुलाम म्हणून जगणं आपल्या…

बाळासाहेबांसारखी प्रतिभा पुन्हा होणे नाही राज ठाकरे

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील…

मुंबईतील कंपन्यांशी दावोसला जाऊन करार कशाला- राऊत

मुंबईतील कंपन्यांशी दावोसला जाऊन करार कशाला- राऊत मुंबई: ज्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, त्यांच्याशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरजच काय ? असा सवाल करीत संजय राऊत यांनी जीएसडब्ल्यू (JSW) ज्याचे मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये आहे, लोढा ज्यांचे हेडक्वार्टर मुंबईत आहे आणि संगमनेरच्या पंचशील सारख्या कंपन्यांशी दावोसला जाऊन करार केले गेले आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.   भारतातल्याच कंपन्यांशी दावोसला जाऊन करार करणे आणि त्याचे फोटो सर्वत्र झळकवणे, यामुळे जगामध्ये भारताचे हसे होते असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी नमूद केले. राज्यांच्या या मोठ्या शिष्टमंडळांवर पंतप्रधानांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण हे सर्व जनतेच्या कराच्या पैशावर सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली. संजय राऊत म्हणाले की, सरकारने सांगितलेले आकडे सुखावणारे असले तरी ते फुगवून सांगितले जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. एका दिवसात १४ लाख कोटींचे करार आणि १४ लाख रोजगार मिळणार असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गेल्या पाच वर्षांतील दावोस दौऱ्यांचे आकडे एकत्र केले तर ते ७५ लाख कोटींवर जातात. इतकी गुंतवणूक खरंच आली असेल तर ती कुठे आहे, हे सरकारने दाखवावे. जे काम मुंबईत बसून होऊ शकते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून ‘पंचतारांकित पिकनिक’ करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला असून, या दौऱ्यांवर किती खर्च होतोय हे राज्याला कळावे अशी मागणी त्यांनी केली.

ठाकरेंची मुंबई नगरसेविका डॉ. म्हस्के नॉट रिचेबल

ठाकरेंची मुंबई नगरसेविका डॉ. म्हस्के नॉट रिचेबल मुंबई : निवडणूकीच्या आधी उमेदवार पळपवापळवी नंतर आता थेट निवडूण आलेले नगरसेवकच पळवण्याच प्रकार मुंबईतही सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नगसरेविका डॉ सरिता…

रायगड-पेणमध्ये ‘ग्रोथ सेंटर’ !

रायगड–पेणमध्ये ‘ग्रोथ सेंटर’ ! दावोस : स्वित्झर्लंडमधिल दावोसच्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केलीय. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करतो आहोत. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाल्या आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरितील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिल्याचे चित्र होते. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, दावोस दौऱ्यावर आलेल्या भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

बचेंगे तो और लढेंगे….

बचेंगे तो और लढेंगे…. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फोडले. या घटनेनंतर उरलेल्या ७ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. बचेंगे…

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. गटनेतेपदासाठी महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

मुंबईत पाणी बाणी

मुंबईत पाणी बाणी तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे  मुंबईकरांना  पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट  ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज…