Category: मुंबई

Mumbai news

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले स्वतः डॉ. हेमराज शाह यांच्या अश्रूंचा फुटला बांध मुंबई, दि. (प्रतिनिधी): आई वडील यांचे छत्र गमावलेला तरुण सामखियाली, भचाऊ या कच्छच्या रणातून मुंबईत येतो काय, पदपथावर झोपून रात्री काढतो काय आणि मग संघर्षमय जीवन जगता जगता समस्त कच्छी, गुजराती बांधवांसाठी झटता झटता तब्बल सात मजली गुजराती भवन उभारुन समाज बांधवांना एका रेशमी धाग्यात गुंफून भली मोठी समाज बांधवांची माला तयार करतो काय. सारेच विलक्षण, सारेच अनाकलनीय, अकल्पनीय आणि त्यात पत्नी सौ. केसर यांचा ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू होतो तसेच एकुलती एक कन्या रेखा हिचा कर्करोगाने मृत्यू होतो. सुपुत्र उदय आणि अरविंद यांनी हेमराज शाह यांना पावलोपावली दिलेला आधार तसेच कोणतेही संवैधानिक पद नसतांना एक कादंबरी, एक डॉक्युमेंटरी आणि हेमूदादा ही दीर्घांकिका रंगमंचावर येते. अनेक देश विदेशातील संस्था डॉक्टरेट देऊन गौरव करतात. अशा या तरुणांनाही लाजवील अशा ८६ वर्षीय डॉक्टर हेमराज विरम शाह या अफलातून व्यक्तिमत्त्वाचे संघर्षमय जीवन उलगडताना चर्चगेट जवळील बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले आणि स्वतः डॉ हेमराजभाईंच्या ‘नयनां’तून अश्रूंचा बांध फुटला. बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कच्छ शक्ती वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह, चर्चगेट येथे त्यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ या वसंत मारु लिखित आणि वसंत मारु, कवन सांवला दिग्दर्शित दीर्घांकिका सादर करण्यात आली. लहान मोठ्या १६ कलाकारांनी या नाट्यप्रयोगात काम करतांना डॉ हेमराज शाह यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. जन्मभूमी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य संपादक पद्मभूषण कुंदनभाई व्यास समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गुजरातचे माजी अर्थमंत्री बाबुभाई मेघजी शाह, महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी बिपीन श्रीमाळी तसेच नवनीत प्रकाशनचे अनिल गाला आणि बिपिन गाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींनी डॉ. हेमराजभाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. नागजी रीठा यांनी सूत्रसंचालन केले.

लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ  

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर संदीप कणसे (३७ धावा) व संतोष पंधारे (३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ५ विकेटने पराभव केला आणि सनसनाटी विजयासह सलामीची लढत जिंकली. शतकवीर नितीन कांबळेने केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटल संघावर ८ विकेटने धडाकेबाज विजय मिळविला. क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे, क्रीडाप्रेमी संजय कदम व प्रभाकर गोलामडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी रुग्णालयीन क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानात उद्घाटनीय शुभेच्छा दिल्या. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. लीलावती हॉस्पिटलचा मध्यमगती गोलंदाज पराग जाधवच्या (२० धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलची दुसऱ्या षटकात ३ बाद १५ धावा अशी बिकट अवस्था झाली. परंतु नितीन कांबळेच्या (५० चेंडूत १०३ धावा) झंझावाती शतकी फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाने मर्यादित २० षटकात ६ बाद १५९ धावसंख्या उभारली. संदीप कणसे (२५ चेंडूत ३७ धावा) व संतोष पंधारे (२५ चेंडूत ३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १८.२ षटकात ५ बाद १६३ धावा फटकावून साध्य केले. दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाज प्रवीण वाघेलाच्या हॅटट्रीकमुळे जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटलचा डाव १५.४ षटकात १०७ धावांमध्ये गुंडाळला. मयुरेश पाटीलने नाबाद ४६ धावा केल्या. शैलेश वाघेलाच्या दमदार अर्धशतकामुळे जे.जे. हॉस्पिटलने दहाव्या षटकाला २ बाद १०८ धावा फटकावून बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द मोठा विजय नोंदविला.

 मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून!

मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील घटनेवर घणाघात अनिल ठाणेकर मुबंई, राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब त्यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. विधानसभेत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेचा निषेध करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

 अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी

अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी मुंबई : चंदीगड येथील पंजाब यूनिवर्सिटीमध्ये १३ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल मधील जिम्नॅस्ट इशिता रेवाले…

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा खालसाचे तायक्वांडोपटू चमकले मुंबई : जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल येथील गुरु नानक खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना तीन कास्य पदकांची कमाई केली.  या अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशभरातील २३४ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता, तर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेने‌ ६८ किलो वजनी गटात, तर ८० किलो खालील वजनी गटात निहाल भोईरने आणि ओम कदमने आपली छाप पाडताना कांस्य पदके मिळवली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये यांना निसटता पराभव पत्कारावा लागला. अन्यथा त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. या तिघांना प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे खास  अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनी देखील खेळाडूंच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य

मुंबईत ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ला प्रारंभ भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य मुंबई : प्लास्टिक अंतिम उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले पहिलेच उद्योग ते उद्योग प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता व्यासपीठ…

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले. मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव आदी उपस्थित होते.

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल रमेश औताडे मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा ‘लामितिये 2026’ सरावात भारतीय नौदलाचा पहिलाच सहभाग मुंबई : भारतीय नौदलाचे अदृष्यता-क्षम युद्धनौका आयएनएस त्रिकंदने २० मार्चला पोर्ट विक्टोरिया येथील यशस्वी बंदर भेट पूर्ण करून तेथून प्रस्थान…

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व!

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत यांचे कामगार मेळाव्यात गौरवोद्गार! मुंबई-आज राजकारणात बरीच माणसे इकडून तिकडे पळत आहेत.परंतु सचिन अहिर असे व्यक्तिमत्व आहे की,पक्षात आले ते नुसते स्थिरावलेच नाहीत तर ‌मजबूतीने‌ काम करीत आहेत. ते एक निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच. परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत मुंबई शहरातील सर्वसामा न्यांच्या विशेषतः गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुटून पडत आहेत! असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना कामगार नेते सचिन अहिर यांचा गुणगौरव करतांना काढले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ते नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय‌ कामगार संघाचा ३० वा वर्धापनदिन काल परेलच्या‌ महात्मा गांधी सभाग्रहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला,त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आमदार सचिन अहिर यांचे अभिष्टचिंतन करताना बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सचिन अहिर यांच्या कन्या ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त येथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार अरविंद सावंत,सचिन अहिर यांचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले, ते निश्चितच चाणक्य आहेत,याचे कारण विधानपरिषदेत जरा जरी चुकीचे विधान केले गेले तर त्याचा खुलासा करून घेतल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत.तेव्हा सामान्यांच्या प्रश्नावर शासकीय स्तरावर चलढकलपणा स्वीकारून जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही धडाकेबाज कामातून ते दाखवून डदेऊ,असाही निग्रह खासदार अरविंद सावंत यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात‌ बोलताना व्यक्त केला.खासदार अरविंद सावंत यांनी अहिर यांच्या कन्या ‌कुमारी ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त गुणगौरव केला आहे.  त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले ,सचिनभाऊ अहिर यांनी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून,युनियनचे‌‌ काम संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत वृद्धिंगत केले आहे. संघर्ष आणि संयम यांची अचूक सांगड घालत राज्याच्या विविध औद्योगिक क्षेत्रात त्यांनी युनियनचे कार्य विस्तारत नेले आहे. याप्रसंगी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे नेते ऍड. बबन मोरे,सत्यवान उभे, रमाकांत बने आदींनी आपल्या भाषणात अध्यक्ष सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार अजय चौधरी तसेच मुंबई पुण्याकडील अनेक लोकप्रतिनिधींनी सचिन अहिर यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी सर्वश्री राजन लाड,मिलिंद तांबडे,सुनील अहिर, उत्तम गीते,संजय कदम, विजय काळोखे,सुनील बोरकर, बजरंग चव्हाण, शिवाजी काळे,साई कुमार निकम,किशोर रहाटे,अवधेश पांड्ये,विश्वनाथ सावंत  आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. अध्यक्ष सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ‌युनियनचा वर्धापन कामगार प्रतिनिधींनी रक्तदान, वृक्षारोपण,क्रीडा सामने आदी‌ सार्वजनिक उपक्रमाने संपन्न केला.