Category: मुंबई

Mumbai news

 सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष

सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष रमेश औताडे मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांच्या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेले ‘वर्षा’ निवासस्थानावरील आंदोलन यशस्वी झाले व सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा जल्लोष आझाद मैदानात पाहायला मिळाला. म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगार आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी झालेल्या चर्चेत सरकारने सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना न्याय दिला जाईल, असे संकेत दिले. अशोक जाधव यांनी स्पष्ट केले की, “आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तूर्तास आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र सरकारने दिलेल्या शब्दाला सरकार जर जागले नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा जाधव यांनी दिला.

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा रमेश औताडे मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि महाक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई उपविभाग प्रमुख नरसिंग सोपानराव सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन टपालाने  पाठवले आहे. भारतीय लहुजी सेनेने आपल्या निवेदनात मांग समाजातील तरुणांच्या रोजगाराचा आणि लष्करी प्रशिक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः स्वतंत्र मांग बटालियनची निर्मितीः समाजाच्या शौर्याचा वारसा जपत ‘मांग बटालियन’ची स्थापना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या बटालियनमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना तातडीने सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. सर्व पोटजातींचा समावेशः मांग समाजातील एकूण १२ पोटजातींमधील तरुणांना याचा लाभ मिळावा. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिक, मादिक, दानखणी मांग, मांग मटाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, तसेच २२ मे २०१२ च्या निर्णयानुसार समाविष्ट मादगी आणि मादिगा या जातींचा उल्लेख पत्रात केला आहे. मंत्रालयाने १७ मार्च २०२६ रोजी त्याची दखल घेत त्यावर स्वाक्षरी केली आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स रमेश औताडे मुंबई : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘ मुंबई इंडियन्स ‘ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी  सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती करणे आहे.

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे ! आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानातून सवाल रमेश औताडे मुंबई : आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, “ सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे “ असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक ‘चौथी मुंबई’ योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजारांचा विकास करताना मच्छीमार महिलांना विश्वासात घ्यावे. मच्छिमारांची सर्व प्रकारची थकीत कर्जे शेतकऱ्याप्रमाणे माफ करावी. गोराई येथील प्रस्तावित निक्षारीकरण प्रकल्प रद्द करावा. घराच्या व मासळी सुकविण्याच्या, बोटी शाकारणीच्या वहिवाटी खालच्या जागा नावे करा. या मागण्या करण्यात आल्या. मोठ्या भांडवलदारांसाठी आदिवासी, भूमिहीन, मच्छीमार अशा घटकावर अन्याय तर होत आहेच, मात्र जे या प्रकल्पात सहभागी नाहीत त्यांना प्रदूषित हवेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा फटका बसणार आहे, असे किरण कोळी यांनी सांगितले. सरकारने आता अधिवेशनातील उरलेल्या दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा लढा अजून तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

 महाड क्रांती : अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

महाड क्रांती : अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर केलेल्या सामाजिक क्रांतीची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या महाड क्रांतीचा इतिहास विद्यालय, महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गाढे अभ्यासक असलेल्या तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या महाड क्रांती शताब्दी महोत्सवानिमित्त ‘ समान संधी अभियान ‘ चे अध्यक्ष सुनील कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. अभ्यासक्रमात समावेशासाठी महाड क्रांतीच्या इतिहासावर आधारित धड्यांचे स्वरूप ही तज्ज्ञांची समिती निश्चित करणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ प्रल्हाद जोगदंड हे या अभ्यासक्रम तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून प्रा. राजेश सोनावणे हे समन्वयक आहेत. या समितीमध्ये एकूण १७ अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात डॉ. मृदुल निळे, डॉ.सुंदर राजदीप, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.कृष्णा गायकवाड, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. प्रदीप वाघमारे, प्रा अतुल रणपिसे, प्रा. सुहास चव्हाण ( मुंबई ), प्रा. विजय मोहिते ( कोकण), डॉ. सुनील नरवडे (मराठवाडा ), डॉ विद्या चोरपगार,  डॉ चेतना सवाई,  डॉ . गौतम कांबळे, डॉ सुधीर जिंदे ( विदर्भ) सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी पत्रकात दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांचा महाड क्रांती शताब्दीचा प्रारंभिक समारंभ गेल्या आठवड्यात पत्रकार भवनात पार पडला होता. त्यातून महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनेक संस्था – संघटनांनी पाठींबा यापूर्वीच जाहीर केला आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस

मुंबई : राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याची…

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे चहापानाची आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभिनेत्री भूमी पेडणेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे चहापानाची आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभिनेत्री भूमी पेडणेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत आजपासून

१४ हॉस्पिटलमध्ये चुरस  मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर-उपनगर व ठाणे जिल्ह्यातील १४ नामवंत हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये २३ मार्चपासून चुरस होईल. लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई आणि बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द जे.जे. हॉस्पिटल यामधील उद्घाटनीय लढती क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे व क्रीडाप्रेमी संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्कमध्ये सोमवारी सकाळी ९.१५ वा. होणार आहेत. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटमधील संघटक हिंदुजा हॉस्पिटलचे अधिकारी जॉय चक्रबर्ती यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दिली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी गतविजेता नानावटी हॉस्पिटल, उपविजेता ब्रीच कँडी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, के.आय.एम.एस. हॉस्पिटल-ठाणे आदी रुग्णालयीन क्रिकेट संघ दावेदारीच्या रुबाबात अटीतटीच्या लढती देतील. एलआयसी सहप्रायोजित टॉप-१२ संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक असून सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यामधील दोन्ही संघातील एका उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे टी शर्ट अनावरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील खेळाडूंसाठी खास गणवेश म्हणून रंगीत टी शर्ट तयार केला असून त्याचे अनावरण आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी…