Category: मुंबई

Mumbai news

कामगार,शेतकरी विरोधी मोदी सरकारला पराभूत करा! 

संघटना संयुक्त कृती समितीच्या परिषदेत एकमुखी ठराव! मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, किसान,जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सम्मत करण्यात आला.  राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले.त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.इंटक,आयटक, एसएमएस,सिटू,एआयसीसीटीयू,बीकेएस एम,राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या.व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते,डॉ.कैलास कदम ,डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदारा चे हित जोपासत आहे.भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनां नी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी चार श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार! अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डि. एन.कराड ठरावावर म्हणा ले,आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबीय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य मोठाच या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असेही कराड आपल्या भाषणात म्हणाले.महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले,येणारा एक मे कामगार दिन मोदी सरकार विरोधी कामगार निषेधदिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले,अंगणवाडी,आशा कामगार पासून  गिरणी कामगारां पर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे मिलिंद रानडे, कॉ.उदय भट,कॉ. विवेक मोंटेरो, कॉ.उदय चौधरी, निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात मोदीं सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात मोदी सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. ०००००

जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा !

मुंबई : नर्मदा परिक्रमा ही देवस्थान तीर्थक्षेत्र पेक्षाही श्रेष्ठ आहे. अनमोल अशी नर्मदा परिक्रमा जीवनात एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करावी असे आवाहन ‘रामकृष्ण विनामूल्य वाचनालयाच्या ग्रंथपाल व साहित्य संपादिका,तसेच अखिल सक्षम महिला मंच समुपदेशक नंदिनी मनोहर सोनवणे यांनी केले. जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदोबा गावातील श्री व सौ.नंदिनी मनोहर सोनवणे यांनी स्व: वाहनाने 16 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली. त्या निमित्ताने बोलताना त्यांनी परिक्रमाविषयी आपले काही अनुभव सांगितले. ९ जानेवारी रोजी नर्मदा परिक्रमाला आरंभ केला. प्रथम ओंकारेश्वर दक्षिण तटावर संकल्प पूर्ती करून रेवा संगम ते अमरकंटक हा दक्षिण तटाचा प्रवास पूर्ण झाला. उत्तर तटाचा प्रवास अमरकंट ते ओंकारेश्वर हा प्रवास पूर्ण झाला. हे संपूर्ण अंतर ४२०० किलोमीटर प्रवास आहे. दक्षिण तटावरील प्रवास करताना जागोजागी अन्नकुठाची व्यवस्था व ऋषीमुनी व सेवाभावी का या परिक्रमावासहित भेटत होत्या. परिक्रमा करताना दुसरे सहचारी क्रमा करणारे चांदवड देवीच्या येथे राहणारे सौ मंदा अशोक महाले यांची योगायोगाने भेट झाली. हा योगायोग परतीच्या प्रवासात चांदवड देवीचे दर्शन घेतले. मार्कंड ऋषी यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा केल्याचे शास्त्र पुराण सांगते. परिक्रमा करताना मार्कंड ऋषींच्या आश्रमात गेलं असता गुरु मिळाल्याचा आनंद झाला. 22 जानेवारीला रोजी आयोध्या मध्ये राम लल्ला यांच्या स्थापनेचा दिवस व त्याच दिवशी आम्ही अमरकंटक पोहोचलो. अमरकंटक मध्ये नर्मदा मातेचे उगम स्थान आहे. राम लल्लनच्या स्थापने च्या रथयात्रेत कलश घेऊन त्या रथयात्रेत सामील झाले. धारवड असं क्षेत्र आहे की महा नर्मदेच्या पात्रातून स्वयंभू बाणलिंग मिळतात. आम्हाला असंख्य लहान ते महान शिवलिंग बघण्यास मिळाले. नंदिनी सोनवणे बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी शिव मंदिर व त्यातील स्वयंभू साक्षात्कार मिळत गेला हा महिमा शिवकृपेचा रूपाने साकारत गेला. प्रत्येक क्षणी नर्मदा तीरावरून जात असताना जशी महा नर्मदा हातात वीणा घेऊन झंकारित केल्याचा आवाज येत होता 16 दिवसांत मा नर्मदा स्तोत्र आरती व हर हर नर्मदे घोष अजूनही मनात कोरले गेले आहे हर हर नर्मदे.. नंदिनीताई यांनी आपले काही काही अनुभव आम्हास सांगितले. ओंकारेश्वर मध्ये प्रथम गजानन महाराजांच्या आश्रम मुक्काम व तोच परतीच्या प्रवासामध्ये मुक्काम तेथेच घडला.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा

अखेर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहितीसुद्धा सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना प्रदान

भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४ मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी…

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…

कामा रुग्णालयात नऊ नवे विभाग सुरू होणार

मुंबईनजीकच्या रुग्णांना दिलासा मिळणार मुंबई : जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा रुग्णालय संलग्नित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये लवकरच नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

नवणीत राणांवर बंडाचा प्रहार !

अमरावती : अमरावतीतून नवणीत राणांना स्व‍कीयांचा विरोध डावलून भारतीय जनता पार्टीने दिलेली लोकसभेती उमेदवारी चांगलिच वादात सापडली आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात आला. याचाच पुढचा टप्पा म्हणून…

आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीत बहुजन संग्रामचा पाठिंबा

मुंबई : रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहे. त्यांच्या या निर्णयाचे…

गुड फ्रायडेची सुट्टी असूनही केजरीवाल समर्थकांची निदर्शनास पाठ

आझाद मैदानात पोलिस व प्रसिद्धी माध्यमांची गर्दी रमेश औताडे मुंबई : आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. गुड फ्रायडे ची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

रमजान निमित्त घेतली सदिच्छा भेट मुंबई: मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांवर झाली चर्चा रमजान या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाचे नेते सय्यदना अली कदर…