Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली

रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान…

भाजपाच्या गुंडांवर कारवाई करा – प्रा. वर्षाताई गायकवाड

रमेश औताडे मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांनी आगरी, कोळी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिनांक २१ एप्रिल रोजी मुंबई शहर व उपनगरात गोयल यांच्याविरोधात आंदोलन…

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झालेल्या 135 तक्रारींचा निवडणूक आयोगाकडून निपटारा

रमेश औताडे मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने सी विजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू…

सावलीसाठी सारेकाही…

(छाया-संतोष नागवेकर) अवघा महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघत आहे. अशावेळी मुक्या जनावरांचे हाल पुसायला मायानगरी मुंबईत वेळ तो कुणाला असणार ? पण या गाईला दादरच्या पुलावर चारापाणी देताना त्याच्या मालकाने अशी…

आज कोकण रेल्वेवर ब्लॉक

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. एकीकडे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, त्यांना वेगात आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त…

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या, मंगळवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर कि.मी १९.१०० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी…

औरंगाबादच्या बैजू पाटीलांची जागतिक भरारी

पॅरिसमधिल जागतिक छायाचित्र स्पर्धेत पहिला क्रमांक मुंबई- औरंगाबादच्या बैजू पाटील यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपला ठसा उमठविला आहे. पॅरिसमधिल ३३ व्या जागतिक पक्षी आणि निर्सग छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील…

अजून खूप सत्य उघड व्हायचयं – एकनाथ शिंदे

मुंबई :  मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव आहे, अजून खूप सत्य उघड व्हायचयं असा…

आरटीईमधून खाजगी शाळा गायब

नवी मुंबई : राज्य सरकारने आरटीई प्रवेश नियमावलीत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे प्रवेशप्रक्रिया करताना पालकवर्गात मोठा गोंधळ उडाला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असल्यास इतर खासगी अथवा अनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे स्वप्न भंगले आहे. सध्या आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना पालकांना इतर खासगी शाळांच्या जागा दिसत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत अनुदानित खासगी, विनाअनुदानित आणि महापालिका अशा सुमारे दीड हजार शाळा आहेत. नवी मुंबई शहर हे सिडकोने नियोजन करून वसवल्यामुळे प्रत्येक प्रभागात महापालिकेची शाळा आहे. ज्या भागात महापालिकेची शाळा आहे, त्याच परिसरात इतर संस्थांच्या खासगी आणि अनुदानित शाळाही आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ते उच्चवर्गीय गटांतील प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी ही चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घ्यावे, अशीच धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, तो वंचित राहू नये, याकरिता सरकारने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबले. याच धोरणातून आरटीईचा जन्म झाला. सरकारी शाळा अनुदानित आहेत, अशा स्वायत्त संस्थांमधून आरटीईद्वारे शिक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. त्यामुळे खासगी शाळांमध्ये पालकांना शिशू वर्गापासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देता येत होते; मात्र आता सरकारने आरटीई धोरणात बदल केल्यामुळे आरटीईच्या पोर्टलमधून खासगी शाळांची नावे गायब झाली आहेत. ज्या भागात सरकारी अथवा महापालिकेची शाळा आहे, अशा परिसरात इंग्रजी खासगी शाळांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पालकांना खासगीऐवजी सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवावे लागणार आहे. पोर्टलहून महापालिकेच्या शाळा गायब नवी मुंबई शहरात सीवूड्स, सारसोळे, कोपरखैरणे या ठिकाणी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा ज्या परिसरात आहेत, त्या ठिकाणच्या पालकांना आरटीई पोर्टलवर इतर खासगी शाळा दिसत नाही; मात्र महापालिकेच्या शाळाही पोर्टलवर दिसत नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा नवा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी महापालिकेचे नवीन पोर्टल सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता महापालिकेतर्फे वेगळे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरून पालकांना पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. हे पोर्टल अद्याप तयार न झाल्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवली असल्याचे समजते आहे. शाळांना मान्यता नाही नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना अद्याप दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळ मान्यता मिळवण्यात नवी मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरटीई पोर्टलवर नवी मुंबईच्या शाळा मान्यता नसल्याने दिसत नाही. मात्र, एकीकडे शाळांना परवानगी आणण्याचे आणि दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेकरिता पोर्टल तयार करण्याचे दोन्ही समांतर काम सुरू असल्याचे समजले. महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांना मान्यता घेणे आणि प्रवेशप्रक्रिया राबवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शहरातील पालकांकरिता स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ट्रॉमा केअर सेंटरअभावी रूग्णांची हेळसांड

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात आहे. येथील म्हामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमीच घडतात. त्यात अनेकांना तत्काळ उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले आहेत; परंतु शहापूर तालुक्यात अपघातग्रस्तांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो; परंतु येथे उपचारास मर्यादा आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारांसाठी अपघातग्रस्तांना ठाणे, कल्याण व मुंबई यांसारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते. मागील वर्षी समृद्धी मार्गावर अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने ते मृतदेह उघड्यावर ठेवले होते. रस्ते अपघात झाल्यास जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे; मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. पाच एकर जागा मंजूर ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्गालगतच मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे जखमींना तत्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात; तर या रुग्णालयालगत पाच एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे