Category: मुंबई

Mumbai news

 मुंबई पोर्टमधील गोदी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न

मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या गोदी विभागातील नोकरीत असणारे कर्मचारी व सेवानिवृत्ती  कर्मचाऱ्यांचे  ४८ वे कौटुंबिक स्नेहसंमेलन २६ जानेवारीला शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सर्वप्रथम ७६  व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या  मुंबई बंदरात पूर्वी ४४ हजर कामगार होते,  आता २७०० कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील मुंबई बंदरातील गोदी कामगारांनी ६५ दशलक्ष टन मालाची चढ उतार केली आहे. गोदी कामगारांनी कमी कामगारांमध्ये जास्त उत्पादकता काढली आहे. बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढीचा वेतन करार झाला आहे. या वेतनकराराची प्रत्यक्षात वाढ १  फेब्रुवारी २०२५  पासूनच्या पगार व  पेन्शनमध्ये मिळणार आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, मुंबई बंदर प्राधिकरण आऊट डोअर डॉक्स स्टाफ पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट  एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष अंकुश कांबळे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन फिलोंथरोपी फाउंडेशनचे पदाधिकारी  व उत्कृष्ट निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर  यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,  सेवानिवृत्तीबद्दल बापू घाडीगावकर व दुबे यांचा सत्कार करण्यात आला. गोदी विभागातील अधिकारी व युनियन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “नियम व अटी  लागू करा” या लोकप्रिय नाटकाचा २८२ वा प्रयोग दाखविण्यात आला. स्नेहसंम्मेलनासाठी आलेल्या  गोदी कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबामुळे सभागृह भरगच्च भरले होते.

सानपाडा येथे  एसपीएल २०२५ क्रिकेट सामन्यांचा सांगता सोहळा  संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील सानपाडा तरुणाईची व क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला, अशी माहिती मारुती…

हिंदुस्थान कंपोजिटसच्या ११०० कामगारांना थकीत डिएचे धनादेश मिळणार

उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील  व आता बंद असलेल्या  हिंदुस्थान कंपोजिटस लिमिटेडमधील   (फेरोडो) ११०० कामगारांचा थकलेला महागाई भत्ता- डिएचे  वितरण धनादेश देऊन उद्या बुधवारी सकाळी ११ वा. मातोश्रीवर होणार आहे. हे वितरण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या  पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काही कामगारांना धनादेश देऊन प्रतिकात्मक करण्यात येणार आहे. नंतर या धनादेश वितरणाचा  कार्यक्रम आमदार सुनिल राऊत, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे,मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ आणि कामगारांच्या  उपस्थितीत बुधवारीच सायंकाळी ५ वा. एसएनडीटी कन्या महाविद्यालय सभागृह घाटकोपर पश्चिम येथे होणार आहे. अशी माहिती या डिएची थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रमुख कार्यकर्ते शिवसेना माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांनी दिली. या कार्यक्रमास माजी महापौर महादेव देवळे, हिंदुस्थान कंपोजिटसचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार चौधरी,माजी नगरसेवक सुनिल भालेराव हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक रवींद्र कोठावदे, शिवसेना उपविभागप्रमुख विजय पडवळ, शाखाप्रमुख निलेश पोहरकर यांनी केले आहे. हा थकीत डीए मिळावा यासाठी नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील,अप्पा चव्हाण,एल.जी.नाईक यांनीही प्रयत्न केले.या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे,सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली.या पार्श्वभूमीवर विक्रोळीत संदेश विद्यालयात हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांची एक बैठक  झाली. थकीत डीएचा लढा ३० वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होईना शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा आऊट ऑफ कोर्ट सोडवावा, कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली.त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिटसच्या मालकांशी चर्चा केली.त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले. त्यानुसार सुवर्णमध्य काढून प्रत्येक  कामगाराला,मृत कामगारांच्या वारसाला ही डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे. ३० वर्षांच्या लढ्यानंतर हे पैसे मिळत आहे,ही आम्हा सर्व कामगारांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,असे नंदू आंबोकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार सुनिल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

जिल्हा कॅरम स्पर्धेत प्रशांत – काजल – पवन विजेते

मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रिझर्व बँकेच्या प्रशांत मोरेने अंतिम विजेतेपद मिळविले. परंतु याकरिता त्याला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. पहिला सेट प्रशांतने २५-१० असा सहज जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये शिवतारा कॅरम क्लबच्या राहुल सोळंकीने २५-९ अशी मात करत सामन्यात रंगत निर्माण केली. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सातव्या बोर्ड अखेरीस प्रशांतकडे १७-९ अशी ८ गुणांची आघाडी होती. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत राहुलने हार मानली नाही. त्याने आठवा बोर्ड ७ गुणांचा घेतला. मात्र एक गुणांच्या फरकाने त्याला १६-१७ असा अंतिम सेट आणि सामना गमवावा लागला. विजेतेपद पटकावणाऱ्या प्रशांत मोरेने रोख रुपये १५,०००/= आणि चषकावर आपले नाव कोरले. महिला एकेरीच्या अंतिम सामना चुरशीचा झाला. यामध्ये इंडियन ऑईलच्या अनुभवी काजल कुमारीने पोस्टलच्या रिंकी कुमारीवर मात केली. पहिला सेट रिंकीने २०-१२ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली होती. परंतु अनुभवी काजलने दुसरा सेट २५-९ असा सहज जिंकून आपले आव्हान कायम ठेवले. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सातव्या बोर्ड अखेरीस रिंकीकडे १७ -१२ अशी पाच गुणांची आघाडी होती. मात्र आठवा ब्रेक काजलकडे असल्याने त्याचा फायदा उठवत तिने हा बोर्ड ९ गुणांचा घेत तिसरा सेट २१-१७ असा जिंकून विजेपदाचे चषक आणि रोख रुपये ७५००/= चे इनाम काबीज केले. पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात हाफकिन इंस्टीट्युटच्या पवन मेस्त्रीने विजय कॅरम क्लबच्या गणेश पाटणकरवर रंगतदार तीन सेटमध्ये २५-९, ९-२४ व २४-५ असा विजय मिळवून रोख रुपये ५,०००/= आणि चषक पटकावला. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत डी. के. सी. सी. च्या सिद्धांत वाडवलकरने शिवतारा क्लबच्या सलमान खानवर २५-८, २५-१३ अशी मात केली. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकांसाठी झालेल्या लढतीत जैन इरिगेशनच्या मिताली पाठकने पोस्टलच्या नीलम घोडकेला २१-१२, २१-९ असे नमविले. वयस्कर गटाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ए. के. फाउंडेशनच्या नूर महम्मद शेखने फ्रेंड्स कॅरम क्लबच्या बाबुलाल श्रीमलवर २४-१०, २५-५ अशी मात केली. विजेत्या खेळाडूंना एकंदर १ लाख ६० हजारांची रोख पारितोषिके, चषक, मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, केतन चिखले, मानद सचिव सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार संजय देसाई, राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, लोकमान्य मंडळ माटुंग्याचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, सुहास बेडेकर व श्रीकांत गोडसे यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा

समर चव्हाण विजेता मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले. सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकुण पाच फेऱ्यात समरने एक सामना अनिर्णित राखत साडे चार गुणांची कमाई केली होती. पण अमोघ शर्मानेही तितक्याच गुणांची कमाई केल्याने टायब्रेक झाला. यावेळी सरस गुणगतीच्या आधारे विजेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. त्यात १३.२५ विरुध्द १२.७५ अशा अवघ्या ०.५० फरकाच्या गुणांनी समर चव्हाण याने बाजी मारली. अमोघला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर चार गुणांसहीत अदिश गावडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्या समर चव्हाणला कै. सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ अडीच हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर अमोघ शर्माला कै. नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिड हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकावरील आदिश गावडे याला कै. सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडे या खेळाडूला यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजकल शरद पाठक आणि गणेश गावडे उपस्थित होते. प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू डावीकडून युवान तावडे, विजेता समर चव्हाण, प्रमुख पाहुणे राजन पिंगळे, उपविजेता अमोघ शर्मा आणि तृतिक क्रमांक विजेता आदिश गावडे.

देशाचे संविधान बदलणार ही ‌भिती व्यर्थ!तसे झाले‌‌ तर देश रस्त्यावर उतरेल!-अॅड.वालावलकर

राजेंद्र साळसकर मुंबई : देशाचे संविधान बदलणार ही भिती व्यर्थ आहे.संविधान बदलने इतके सोपे नाही आणि जर‌ तसे झाले तर त्याविरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे वकिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अमृतमहोत्सवी वर्षांची वाटचाल,यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या परळ येथील आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने रविवारी प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या‌ औचित्याने २५ वकीलांचा,परळगाव, लालओठा मैदानावरील सुसज्ज शामियान्यात गुणगौरव सोहळा पार पडला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.नरेंद्र‌ वालावलकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या वकीलांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन‌ गुणगौरव‌ करण्यात आला.सत्कारात महिला वकिलांचाही समावेश होता‌. त्यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर आपल्या भाषणात पुढेम्हणाले,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य आणि अधिकार या गोष्टी बहाल करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संकुचित होता कामा नये,त्याचे संरक्षण करण्याची शिकवण देणारा प्रजासत्ताकदिन आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कोल्हापूरे होते. मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस विजय परदेशी म्हणाले,हे डॉक्टर,वकील‌ यांचा ते‌ पेशा बजावत असले‌ तरी,ते विविध समाजाची‌ बांधिलकी निभावत असतात.त्याची सामाजिक संस्थांनी उचित अशी दखल‌ घेणे‌,ही त्यांची नैतिक जबाबदारी असते.तीच जबाबदारी जोपासण्याचे‌ काम आम्ही करीत आहोत.याप्रसंगी स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली. या प्रसंगी परळगावातील‌‌ लेखक काशिनाथ माटल यांच्या लेखणीची ओळख करून देताना विजय परदेशी म्हणाले, काशिनाथ माटल यांनी पाच वाचनीय आणि उत्कृष्ट कथासंग्रह ‌लिहून परळकरांना अभिमान संपादून दिला आहे. त्यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचा दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे,त्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात‌ आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते‌.

स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारा गिरणी कामगार मुंबईच्या हद्दपार होता कामा नये!

ध्वजारोहण प्रसंगी सचिन अहिर यांचे प्रतिपादन राजेंद्र साळसकर मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या त्यागमयी योगदानाने इतिहास रचणारा गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर मुंबई पासून हद्दपार होता कामा नये,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहण प्रसंगी गिरणी कामगारांपुढे बोलताना दिली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने‌‌ परेलच्या मजदूर मंझील मधील प्रांगणात, देशाच्या ७६ व्या‌ प्रजासत्ताकदिनी अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले‌‌.त्यावेळी गिरणी कामगारांपुढे बोलताना आमदार सचिन आहिर पुढे म्हणाले, गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या तसेच गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर आपण अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाद्वारे‌ भेट घेतली आहे. त्यांनी या प्रश्नावर लवकरच संबंधिता समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे,असे सांगून श्री अहिर म्हणाले,कोविडचे कारण पुढे करून मुंबईसह राज्यातील एनटीसीच्या गिरण्या गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.केंद्र सरकारकडून या गिरण्या पुर्ववत चालविल्या जात‌ नाहीत किंवा गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना पगारही देण्यात आलेला‌ नाही.तेव्हा स्वातंत्र्य लढ्यातील गिरणी कामगारांच्या योगदानाचा सरकारला विसर पडला समजायचा का? या प्रश्नावर खासदारां‌ समवेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेट घेण्यात येणार आहे. ‌‌स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दणा-या शूर‌ विरांच्या‌ आत्मबलीदा नातून‌,तसेच महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,मौलाना आझाद यांच्या सारख्या अनेक देशभक्तांच्या लढ्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले,हा खरा स्वतंत्र लढ्याचा जाज्वल्य इतिहास आहे.परंतु काही तथाकथित चित्रपट कलाकार,देशाला गेल्या दहा वर्षांपासून ख-या अर्थाने स्वतंत्र्य मिळाले,अशी मुक्ताफळे उधळत आहेत.स्वातंत्र्या‌नंतर ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशाने अंतराळ संशोधनात बाजी मारली,अन्न-धान्यात‌ मजल मारली,‌असे अनेक अंगाने‌‌ देशाला मिळवून देण्यात आलेले बहुआयामी यश‌ कदापि विसरता येणार नाही. स्वातंत्र्याबरोबरच थोर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिले,त्यामुळेच देश‌ आज एकसंघ राहिला आहे. तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारताचे संविधान सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल.देशाने आपल्याला काय दिले या पेक्षा,आपण देशाला काय देणार ?याची तयारी आता सर्वांना ठेवावी लागेल,असेही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.त्या प्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि अन्य पदाधिका री उपस्थित होते.संघटनेच्या सेवादल विभागाने ध्वज संचलनात महत्वाचे सहकार्य केले.

मूत्र असंयम आजारावर अपोलोचे यशस्वी उपचार

रमेश औताडे मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आग्नेय आफ्रिकेतील एक देश मोझाम्बिकहुन आलेल्या ४० वर्षे वयाच्या महिलेच्या मूत्र असंयम (लघवी लीक) आजारावर अपोलो हॉस्पिटल ने यशस्वी उपचार केले . श्रीमती ऍलिस यांना बऱ्याच वर्षांपासून मूत्र असंयमाचा त्रास  होता. या विकाराचा खूप मोठा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला होता, खोकणे किंवा शिंकणे यासारख्या सामान्य क्रिया देखील खूप आव्हानात्मक बनल्या होत्या. मूत्र असंयम ही एक सर्रास आढळून येणारी समस्या आहे पण तरीही गैरसमजुती, सामाजिक कलंक आणि त्यावरील उपचारांविषयी जागरूकतेचा अभाव त्यामुळे बहुतांश वेळा ही समस्या दुर्लक्षिली जाते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने महिलांना आवाहन केले आहे की, असे त्रास होत असतील तर गप्प राहू नका, पुढे या, बोला आणि टीओटी सर्जरीसारख्या मिनिमली इन्व्हेसिव पर्यायांची माहिती करून घ्या. हे उपचार तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देऊ शकतात. डॉ हिमानी शर्मा, सिनियर कन्सल्टन्ट-ऑब्स्टट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी उपचार करण्याचे महत्त्व समजावून सांगताना त्या म्हणाल्या,”मूत्र असंयम ही फक्त एक वैद्यकीय स्थिती नाही तर हे एक आव्हान आहे, महिलेच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो.

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच देश सुरक्षित आहे

 रमेश औताडे मुंबई : शौर्य चक्र पदक विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे यांची अतिरेक्यांबरोबर झालेली लढाईची कथा प्रेरणादायी होती. अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच आमचा देश सुरक्षित आहे. यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त…