Category: मुंबई

Mumbai news

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगाव येथे आयपीपीएआय…

 ज्योती म्हापसेकर यांना ‘एकता जीवन गौरव’ पुरस्कार’

डॉ. श्यामल गरुड, जादीश भोवड यांचाही होणार सन्मान मुंबई : मुंबई एकता कल्चर संस्थेतर्फे देण्यात येणारे 2024 –  25 च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाटककार तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानाबद्दल ज्योती म्हापसेकर यांना या वर्षीचा एकता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका डॉ. शामल गरुड, कवयित्री डॉ. योगिता राजकर, नंदलाल रेळे, कवी गीतेश शिंदे, पत्रकार जगदीश भोवड तसेच दिनेश राणे, आनंद खरात यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर,  स्त्री मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, कवयित्री योगिनी राऊळ आणि पत्रकार – कवी भगवान निळे यांच्या निवड समितीने यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची एकमताने निवड केली आहे. 18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सर्व पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली. एकता कल्चर पुरस्कार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे – ‘स्त्री मुक्ती चळवळीतील’ मान्यवर नेत्या ज्योती म्हापसेकर – (एकता जीवन गौरव पुरस्कार), नंदलाल रेळे – ध्वनी संकलन- उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ नटवर्य (भालचंद्र पेंढारकर स्मृती पुरस्कार), योगिता राजकर – साहित्य- कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ (नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार कविता संग्रह – बाईपण ),  डॉ. शामल गरुड – साहित्य- (रजनी परुळेकर स्मृती विशेष पुरस्कार), नारायण गिरप – साहित्य – राजेश जाधव पुरस्कृत (काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार) ॲड. प्रियांका संदीप संगारे – विधि- मनोज संसारे स्मरणार्थ (संत जनाबाई स्मृती पुरस्कार), मनोज मस्के – नृत्य नीलांबरी उज्जय आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ (सुबल सरकार स्मृती पुरस्कार), अनुजा कासारे -शैक्षणिक – पल्लवी शिंदे माने पुरस्कृत कांचन रघुनाथ शिंदे स्मरणार्थ (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार), सुधाकर कदम – संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृति पुरस्कार), गीतेश शिंदे -प्रकाशक- रजनी संदीप बेनकर पुरस्कृत (यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार), जगदीश भोवड – पत्रकारिता – वैशाली बाळाराम कासारे स्मणार्थ (जयंत पवार स्मृती पुरस्कार), डॉ. रश्मीन केनिया-वैद्यकीय (डॉ. नितू मांडके स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री आनंद खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, दिनेश राणे -प्रकाश पाटील पुरस्कृत महात्मा (ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), विजय भगते –  रमेश गणपत जाधव स्मरणार्थ (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), विद्या दयानंद काट्रे – प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ (रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार), प्रकाश सोनावणे-नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), किसन पेडणेकर – (सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), अरुण सबनीस- गंगाधर म्हात्रे पुरस्कृत  जनार्धन म्हात्रे स्मरणार्थ (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), शरद जाधव- (भंन्ते महाथेरो स्मृती पुरस्कार), डॉ. अरुण भगत- (स्वामी विवेकानंद स्मुर्ती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. ‘एकता महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’चे सल्लागार व ‘ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवार ,१८ जानेवारी सायंकाळी ४:०० वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशीही माहिती एकताचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

रमेश औताडे मुंबई : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते. झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपयांत दिली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. २८ फेब्रुवारी १९९३ रोजी या धर्मशाळेचे भूमिपूजन झाले. सात वर्षांनी इमारतरूपी ही धर्मशाळा उभी झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याच्या सोयीवर लक्ष केंद्रित असूनही त्यांना भोजन देणे, दूध आणि फळे देणे, महाग औषधे असतील तर त्यासाठी काही दात्यांचा शोध घेणे, वैद्यकीय शिबिरे भरवणे, भुकेलेल्यांना अन्नदान करणे अशा अनेक उपक्रमांतून धर्मशाळेचा अखंड प्रवास सुरू आहे. परळ येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत दिवसाला १०० लोक राहण्याची सोय आहे. या धर्मशाळेत १६ रूम असून, वर्षाला जवळपास साडेतीन हजार रुग्णांची सोय केली जाते. कर्करोगग्रस्त लहान मुलांना अनेक महिने इथेच राहावे लागते. त्यांचे आई-वडील अनेकदा त्यांना पदपथावर झोपवतात. केईएम, वाडिया आणि टाटा या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांतील रुग्णांसाठी ही धर्मशाळा खरंच आधार बनली आहे. मुलांना मनोरंजन म्हणून टीव्हीचीदेखील सोय आहे. या वास्तूची निर्मिती गुणवंतराव चराटे यांनी केली. स्वच्छतेवर भर देत आजही पंढरपूरच्या दिंडीत जवळपास ४०० ते ५०० स्वच्छता कर्मचारी सहभागी होतात. तिथला संपूर्ण परिसर स्वच्छ करतात, असेही सामंत यांनी सांगितले. 00000

मुलुंडमधील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलुंडमध्ये नुकताच ममता दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेच्या   शाखा क्रं १०८ व  फँमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई  तर्फे महिलां पुरुषांसाठी…

कोकणी-मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही

सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’मुळे कमी होऊ लागले हवेतील धुळीचे प्रमाण

नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…

नूतन हिंदी प्राथमिक हायस्कूल येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शन संपन्न

कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक  विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

केडीएमसी क्षेत्रात बांधकाम परवाना मिळणार ऑनलाईन

 त्रासमुक्त परवानग्या मिळण्याण्यासाठी आँनलाईन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा  टिडीआर्, रिडेव्हलमेन्ट,  परवानगी शुल्क फी, आदी परवानग्या आँनलाईन माध्यमातून राबिविण्यासाठी मनपा यंत्रणा सज्ज झाली आहे. केडीएमसीच्या मते, बांधकाम आराखड्यांसाठी ही सुविधा आधीच होती, परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे लोक बांधकाम परवानगी ऑफलाइन घेत असत. अलीकडेच, बांधकाम परवानगीशी संबंधित कामात पारदर्शकता आणण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  केडीएमसीच्या नगररचना विभागाने गुरुवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांची बैठक बोलावली, जिथे त्यांना इमारत आराखड्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचे निराकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. केडीएमसी नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक नगररचना संचालक नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कोणताही विकासक देशातील कोठूनही ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आराखडा सादर करू शकतो. टेंगळे यांनी सांगितले की, या ऑनलाइन सुविधेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या योजनेशी संबंधित फाइल कोणत्या विभागात आहे हे पाहता येईल आणि जर त्या फाईलमध्ये काही प्रलंबित कागदपत्रे असतील तर ती तो ऑनलाइन पाठवू शकेल. या सर्व कामांसाठी त्याला कार्यालयात जावे लागणार नाही. केडीएमसी इमारत आराखडे ऑनलाइन सादर करण्यासाठी आणि मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रदान केलेल्या बीपीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करत आहे आणि ते सुरळीतपणे काम करत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी केडीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत विकासक विमल ठक्कर म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे काम सोपे होत आहे. अशा परिस्थितीत, बांधकाम आराखड्याची परवानगी ऑनलाइन असल्याने, आम्हाला आता अधिकाऱ्यांना वारंवार भेटण्यासाठी जावे लागणार नाही आणि आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.” या आँनलाईन परवानगी प्रक्रिया मुळे जलदगतीने तसेच पारदर्शक, परवानगी प्रक्रिया मार्ग मोकळा झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत…

आत्माराम मोरे साखळी कॅरम स्पर्धा

प्रसाद मानेला विजेतेपद   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेने विजेतेपद पटकाविले. दडपण न घेता अचूक सोंगट्या टिपणाऱ्या उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू  प्रसाद मानेने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळेचा सहाव्या निर्णायक सामन्यात १२-४ असा चुरशीचा पराभव केला आणि प्रसादने अजिंक्यपदाला गवसणी घातली. सुरुवातीचे बोर्ड हातचे निसटल्यामुळे प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व सुरेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने तृतीय तर पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला.  महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. पंचाचे कामकाज क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, ओमकार चव्हाण आदींनी केले. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने संपन्न झालेला कॅरमचा शालेय उपक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपाचा होता. खेळाडूंच्या पालकवर्गाने सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने स्तुती केली.