Category: मुंबई

Mumbai news

५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे-  रोहन घुगे

ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २ जानेवारी…

सानपाड्यामध्ये आगरी कोळी समाजाला दिशा देणारा एक दिवसीय मोफत लग्न सोहळा संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर पट्टीतील सानपाडा येथील आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यात होणारा खर्च टाळण्यासाठी  सानपाडा येथील ग्रामस्थांनी समाजात जागृती व्हावी म्हणून एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचे आवाहन…

 मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार

करोनाबाधितांसाठी घेतलेले ईएसआयसीचे रुग्ण कक्ष तब्बल तीन वर्षांनी केले परत   मुंबई : मुंबई महानगरपालिकेने करोनाबाधातांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कांदिवलीमधील रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी मुंबई महानगरपालिकेने हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिला नव्हता. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण कक्ष परत मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला तीन वर्षांनी यश आले असून, सात दिवसांत हा रुग्ण कक्ष रुग्णालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी २०२०-२१ दरम्यान ईएसआयसीच्या कांदिवली रुग्णालयातील रुग्ण कक्ष ताब्यात घेतला होता. या रुग्ण कक्षात ६३ खाटा आहेत. या रुग्ण कक्षांमध्ये अनेक रुग्णांवर उपचारही करण्यात आले. मात्र करोना संपुष्टात आल्यानंतर हा रुग्ण कक्ष व त्यातील ६३ खाटा पुन्हा ईएसआयसीच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने बंद केलेल्या करोना केंद्रातील साहित्य या रुग्ण कक्षांमध्ये ठेवले. त्यामुळे ईएसआयसी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या कक्षात दाखल करताना रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जागेअभावी अनेक रुग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला नकार द्यावा लागत होता. त्यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात होता. रुग्ण कक्ष परत मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत तातडीने कार्यवाही करून हा रुग्ण कक्ष ईएसआयसी रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या सूचना पीयूष गोयल यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. करोना महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित रुग्ण कक्षाचा वापर करू शकता. रुग्ण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले साहित्य पुढील सात दिवसांत तातडीने हलविण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी केंद्रीय मंत्र्यांची सूचना मिळताच ईएसआयसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर कांदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयाला त्यांचा रुग्ण कक्ष परत मिळणार आहे. कोट दोन दिवसात मुंबई महानगरपालिका त्यांची साधनसामग्री घेऊन जाणार आहे. रुग्ण कक्ष ताब्यात आल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होणार आहे. डॉ. केतन छेडा, रुग्णालय प्रमुख, कांदिवली ईएसआयसी रुग्णालय कांदिवली ईएसआयसी रुग्णालयातील रूग्ण कक्षामध्ये ठेवलेले सामान हलविण्यात येईल. -संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका

सहभाग आणि सहकार्य हाच नैनाच्या यशस्वीतेचा मंत्र

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाची वेळ जवळ येत असताना, त्याच्या आसपासचे  नैना क्षेत्र, गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी आकर्षणाचे  केंद्र बनले आहे. या क्षेत्राच्या नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोने, विकास प्रक्रियेत जमीनमालकांशी…

माकपच्या छ.संभाजी महाराजनगर जिल्हा सचिवपदी भगवान भोजने यांची फेरनिवड

अनिल ठाणेकर ठाणे : २९  डिसेंबरला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष छत्रपती संभाजी महाराजनगरचे १३ वे जिल्हा अधिवेशन गांधी भवन जवळील मैदानात पार पडले या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी भगवान भोजने यांचे जिल्हा सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सुनील मालुसरे यांनी केले. यावेळी जेष्ठ कामगार नेते डॉक्टर कॉम्रेड डी .एल. कराड व कॉ. किसन गुजर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मागील तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला यावर आलेल्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामधे, २०२० चे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे शैक्षणिक धोरण रद्द करा, कामगारांना देशोधडीला लावणारी कामगार संहीता रद्द करा, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पक्षाने योग्य हस्तक्षेप करून जनतेचा लढा उभारावा, शेतकी मलाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये पक्षाने व्यापक संघटन उभे करावे या विविध ठराव पारित करण्यात आले. विद्यार्थी युवक कामगार शेतकरी शेतमजूर महिला एकजुटीच्या आधारावर आगामी काळात पक्ष बांधणी करून सामान्य जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करावा असा निर्धार याबद्दल अधिवेशनात करण्यात आला. ०००००

डोंबिवली, कल्याणमध्ये आदेशाविरुद्ध वृक्ष प्रदूषित रोषणाई

 पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा   कल्याण : नववर्षानिमित्त अनेक दुकानदार, खासगी आस्थापनांनी आपल्या दुकान, आस्थापनांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही काही व्यावसायिक त्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे उपायुक्त आणि उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने सजवली आहेत. ही दुकाने सजविताना दुकान समोरील झाडांवर, झाडाच्या खोडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे झाडांवर विद्युत रोषणाई केल्याने झाडांवरील जैवविविधतेला धोका पोहचतो. या झाडांवर अधिवास करणाऱ्या पक्षी, इतर जीवांच्या निवाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणाशी निगडित एका जनहित याचिकेवर निर्णय देताना झाडांना विद्युत रोषणाई करण्यास प्रतिबंध केला आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या आठ महिन्याच्या काळात एक हजारहून अधिक दुकानांसमोरील झाडांना केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली आहे. ज्या दुकानदार, आस्थापनांना न्यायालयाच्या निर्णयाची माहिती नाही ते अनभिज्ञपणे झाडांना रोषणाई करत आहेत. याविषयी पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उद्यान विभागाकडून संबंधित व्यावसायिकाला ती रोषणाई काढून टाकण्याची तंबी दिली जाते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक हाॅटेल्स, ढाबा मालक, मद्यविक्री दुकाने, कपडे विक्री दुकाने, केशकर्तनालय, शोभेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांनी दुकानसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. याविषयी पर्यावरणप्रेमींनी काही व्यावसायिकांना ही कृती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेला कोणीही दाद दिली नाही. व्यावसायिकांनी दुकानाला विद्युत रोषणाई केली की ती वर्षभर झाडावरून काढली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नववर्षानिमित्त पालिका हद्दीत अनेक व्यावसायिकांनी झाडांना विद्युत रोषणाई करून वृक्ष प्रदूषित केले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने मोहीम हाती घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये यासाठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ज्या व्यावसायिकांना या आदेशाची माहिती आहे ते अशाप्रकारची विद्युत रोषणाई करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र ज्यांना माहिती नाही ते अशाप्रकारची रोषणाई करतात. त्यांची तक्रार आली तर तात्काळ त्यांना रोषणाई काढण्यास सांगितले जाते. जे हेतुपुरस्सर रोषणाई करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे झाडांवर कोणी विद्युत रोषणाई केली असेल त्यांनी ती तात्काळ काढून टाकावी. – संजय जाधव उपायुक्त, उद्यान विभाग. 00000

 ‘नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या’

बाळासाहेब थोरातांची खरमरीत टीका  मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं…

वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून…

अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस…

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची ‘पॉवरफुल’ कामगिरी 

केंद्राकडून मिळाली २६० कोटींची प्रोत्साहनपर रक्कम मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम…