Category: मुंबई

Mumbai news

हिंदुस्थान ‘कंपोजिटस’ च्या कामगारांना थकीत डिए मिळणार

मुंबई : घाटकोपर पश्चिममधील हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांना थकीत महागाई भत्ता- डिए मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला.गेली ३० वर्षे न्यायालयात चाललेल्या लढाईपुढे कामगार हतबल झाले.शेवटी कामगारांनीच कंपनी व्यवस्थापनाशी आऊट ऑफ कोर्ट…

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा

रमेश औताडे मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी…

सानपाड्यात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहा यांचा केला जाहीर निषेध

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी १७ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमान जनक द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील…

सीएसएमटी-कल्याण लोकलमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ

कल्याण : मुंबई सीएसएमटी ते कल्याण लोकलमध्ये मंगळवारी दुपारी स्वयंचलित दर्शक यंत्रणेतून रेल्वे स्थानकांच्या चुकीच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. लोकल धावत होती कल्याणच्या दिशेने आणि…

कल्याणमध्ये सॅटीसच्या रॅम्पमुळे वाहतुकीत अडथळा

आठ दिवसांत अडथळे दूर करून रस्ता सुरु करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांचा पालिका प्रशासनाला इशारा कल्याण : कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी अंतर्गत…

नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा

आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा हरिभाऊ लाखे नाशिक : समाधानकारक पावसामुळे यंदा जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरणांमध्ये डिसेंबरच्या अखेरीस तब्बल ६२ हजार ५०३ दशलक्ष घनफूट म्हणजे ९५ टक्के जलसाठा आहे. मागील दुष्काळी वर्षाचा विचार…

तर मुंबई पोर्टमधील कंत्राटी कामगारांचा पगार पोर्ट प्राधिकरणाने द्यावा – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर मुंबई : पोर्ट प्राधिकरणाच्या वडाळा येथील पोर्ट प्राधिकरणाच्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या सफाई कंत्राटी कामगारांना सप्टेंबर २०२४ पासून गेले तीन महिने कंत्राटदाराने पगार न दिल्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.…

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

अशोक गायकवाड मुंबई : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी…

धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या आदिवासी योजनेची अंमलबजावणी करा –डॉ.नवलजीत कपूर

अशोक गायकवाड रायगड : धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त सचिव,आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार डॉ.नवलजीत कपूर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आत्माराम धाबे, उपजिल्हाकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सचिव, डॉ.नवल जीत कपूर म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन योजना या नावाने १५ नोव्हेंबर २०२३ सुरु झालेल्या योजनेचे २ ऑक्टोबरच्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजना नावाने नामांतर करण्यात आले आहे.आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी ही एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा आदिवासी बांधवांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस या योजनेसाठी द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेसाठी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास योजना अधिकाधिक गतिमान होईल व त्याचा लाभ आदिवासी बांधवांना मिळेल. ज्या आदिवासी बांधवांचे बँक खात्याशी आधार संलग्न नसेल तर त्यांचा सर्व्हे करुन ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आदिवासीच्या विविध योजनांसाठी असलेले अनुदान वाढवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या योजनेविषयी काही अडचणी असतील तर अधिकारी वर्गाने माझ्याकडे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपिस्थित अधिकाऱ्यांना केले. यावेळी उपस्थितांना दूरदृष्य प्रणालीद्वारे धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची माहिती देण्यात आली. 00000

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन मुंबई:-मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील मुले – मुली, द्वितीय श्रेणी (ब) आणि तृतीय श्रेणी (क) गट स्थानिक पुरुष, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक-अ, व्यावसायिक-ब, व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.  भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे या स्पर्धा खेळविण्यात येथील. ज्या संलग्न संघाना उपरोक्त स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज व खेळाडूंची नोंदणी ऑलाईन पूर्ण करून आपला सहभाग नोंदवावा. त्याच बरोबर आपल्या विभागातील सहकारी संघांनही याची कल्पना द्यावी. हि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून असो. ला सहकार्य करावे असे आवाहन या परिपत्रकाद्वारे सचिव विश्वास मोरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे.