Category: मुंबई

Mumbai news

बचेंगे तो और लढेंगे….

बचेंगे तो और लढेंगे…. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फोडले. या घटनेनंतर उरलेल्या ७ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. बचेंगे…

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. गटनेतेपदासाठी महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

मुंबईत पाणी बाणी

मुंबईत पाणी बाणी तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे  मुंबईकरांना  पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट  ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज…

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही यावेळी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण…

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता     

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता मुंबई:  श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. श्री उद्यानगणेश मंदिर…

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू अद्याप थांबले नसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सातत्य आणि प्रभावी अंमलबजावणीचा अभाव दिसून येत असल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व पोषण सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसला पाहिजे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये माता व बाल आरोग्याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली. राज्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, अजूनही मोठ्या लोकसंख्येला मूलभूत पोषण, स्वच्छ पाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.  आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवणे आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू ही प्रशासनाच्या अपयशाची बाब असून, या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असा स्पष्ट इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे.

काँग्रेसची जिल्हा परिषदेसाठी ओबीसी बहुजन पक्षाशी युती

  मुंबई : प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेसाठी युती झाली आहे. ही एक वैचारिक युती असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी…

मुंबईत ‘मराठी भवन’चा पत्ता नाही, ३० मजली ‘बिहार भवन’ उभारणार

मुंबई : मुंबईत मराठी भवन उभारण्याचा अजून पत्ता नसताना दुसरीकडे बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ३० मजली ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी…

२९ महापालिकेतील महापौरपद आरक्षण सोडत २२ जानेवारीला

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास…