Category: मुंबई

Mumbai news

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक मुंबई : बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, भारत २0४ 7 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल, आणि एसटी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध आहे.” सध्या एसटीच्या सुमारे ९० टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या, तरी टप्प्याटप्प्याने त्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई-बसेसना प्राधान्य दिले जाणार आहे.याच दृष्टीने, एसटीच्या जागेवर सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून (PPP) उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजीसह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात एसटीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच “ एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास, भविष्यातील वाहनव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही केवळ सुविधा नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.या निर्णयामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण 

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण  रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, मुंबई : आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या धर्मेंद्र यांना मरणोत्तर भारतातील मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून यंदाच्या २०२६ सालचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वोच्च अशा पद्मविभुषण पुरस्कारासाठी देशभरातून धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांची निवड केली, तर  १३ जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.…

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें…

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई विभागीय केंद्रांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे!!! माननीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार ८ फेब्रुवारीला श्री बापूसाहेब विसपुते बी.एड. कॉलेज, पनवेल येथेयुवा शक्ती फाउंडेशन आणि श्री डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर आपली नोंदणी करून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उत्कृष्ट रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.सर्व केंद्रप्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, कृपया ही माहिती सर्वत्र पोहोचवावी. या रोजगार मेळाव्यास केवळ मुक्त विद्यापीठाचेच नव्हे, तर इतर विद्यापीठांतील विद्यार्थीही नोंदणी करू शकतात.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यास नोंदणी करावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक(YCMOU) तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७०७९६५७४२,८८७९33८८33

 ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन

‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद मुंबई, दि. (प्रतिनिधी) “स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक  मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक  विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते  महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली.  ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम…

 बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा                                         

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राट यांना मानवंदना बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार सादरीकरणाने अतीशय कमाल केली. रंगमंचावरील कुणी प्रज्ञा चक्षु तर कुणाचे हात, कुणाचे पाय नाहीत परंतु केवळ जगण्याची जिद्द नाही तर सूर, स्वर, संगीत, वाद्य अशा कशातही आम्ही कमी नाही किंबहुना धडधाकट कलाकारांपेक्षा आम्ही काकणभर सरस ठरु, अशा प्रकारे सभागृहात आपापल्या अदाकारीने दाखवून दिले. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होत असतांना बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे बंधूराज ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि केवळ श्रीकांतजींसाठीच मराठी गाणी गाणाऱ्या महंमद रफी यांच्या आवाजाची जादू दिव्यांग गायकांनी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आणि एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंखचा अनोखा नजराणा पेश केला. बिपिन वर्तक, मकरंद भोसले, विनोद गावंडे, सुधीर पालांडे, सारिका शिंदे, श्रद्धा घुगे या गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट गीतांचा नजराणा पेश केला. नृत्यांगना ज्योती मस्तेकर यांनी  ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा लावण्यांच्या नृत्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. संतोष मोहिते, नागेश कांबळे, दीपक कांबळे, हर्षवर्धन वर्तक, डोनाल्ड कोळी, महेश नाईक, शिवाजी बनसोडे या वादक कलाकारांनी स्वरपंखच्या कार्यक्रमास उत्साहाचे, भरारीचे पंख लावल्याने कार्यक्रमाची नजाकत वाखाणण्याजोगी होती. स्वतः प्रज्ञा चक्षु असलेल्या बिपीन वर्तक यांनी केलेले सूत्रसंचालन व्यावसायिक मराठी वाद्यवृंदातील प्रख्यात निवेदकांची आठवण करून देत होती. स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग कलाकारांच्या अनोख्या वाद्यवृंदाची संकल्पना आणि निर्मिती कनक क्रिएशनचे अतुल साटम यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरीवली नाट्य परिषदेचे झुंजार पदाधिकारी विजय तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाजनको, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, घारे ज्वेलर्स, गिरगांव कट्टा, लायन्स क्लब ऑफ मुंबई प्लॅटिनम, फार्मा प्रोफेशनल संदीप मानकामे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सामाजिक,  शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने सदैव पाठीशी उभे राहणारे गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा प्रदीप मालंडकर, आयोजक संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार मुंबई : मुंबई येथे आयोजित ‘ग्लोऱ्या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात नामवंत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक लीना र. प्रभू…

 ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’तर्फे ‘आयटीआय मुंबई १’ येथे ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन मुंबई : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ (आरसीबी) तर्फे शनिवारी, २४ जानेवारीला ‘आयटीआय मुंबई १’ येथे इंडस्ट्री ४.० सुसज्ज…