Category: मुंबई

Mumbai news

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती शिवसेना उबाठाची मागणी मान्य मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले. नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अमोघ शर्मा टायब्रेकवर विजेता

प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकवर विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत चार खेळाडूंचे समसमान गुण झाले होते. अखेर अमोघ…

 लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती

लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी स्मारक रुग्णालयासाठी ऐतिहासिक निर्णय मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील कामगारांच्या दिर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच लाड पागे अंतर्गत नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, लाड पागे वारसाहक्काने ६ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जाहीर झाला. लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सन २०१५ पासून सुरू होता. अथक पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील एकूण ७८ रिक्त पदांवर सफाई कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय, श्रमिक उत्कर्ष सभा आणि महात्मा गांधी स्मारक कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला आहे. या विषयावर आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला होता. त्याच प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून, २०१५ पासून प्रलंबित असलेल्या ६ पात्र वारसांना प्रजासत्ताक दिनी अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट आश्वासन दिले की, येत्या एका महिन्यात उर्वरित ७८ पैकी सर्व रिक्त पदांवर लाड-पागे समिती अंतर्गत पात्र वारसांची नियुक्ती केली जाईल. या निर्णयामुळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांच्या जागी आता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त होणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षित भविष्य मिळणार आहे. महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियन (मान्यताप्राप्त) च्या कामगार बांधवांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद असून, सेवा, संवेदना व सामाजिक न्यायाचा आदर्श या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमदार लाड यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर रिवणकर, डॉ. शिवकुमार भाले, डॉ. संजय असुर्लेकर, डॉ. जितेंद्र पाटील तसेच संघटनेचे सचिव दिपक गोडे उपस्थित होते. या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी शासन व प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली २०१५ साली अंतिम झालेल्या लाड पागे वारसांची यादी प्रथम अंमलात आणावी. व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या वारसांवर अन्याय होऊ नये. वयाची अट शिथिल करून पात्र वारसांना नियुक्ती द्यावी. सामाजिक जबाबदारी (आईवर अवलंबित्व, कौटुंबिक परिस्थिती) लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोन ठेवावा. अनुकंपा वारसांपैकी सफाई कामगार व जातीचे प्रमाणपत्र असलेल्यांना लाड पागे समिती अंतर्गत समाविष्ट करून तातडीने न्याय द्यावा. अनुकंपा वारसांची २०१५ ची ज्येष्ठता कायम ठेवून नियुक्तीचा विचार करावा.

 निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले

योनेक्स सनराईज मल्टी डिस्ट्रिक्ट मास्टर्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले मुंबई उपनगरातील ५९ वर्षीय आनंद विठ्ठलकर यांनी ठाणे जिल्ह्यातील निरंजन शहाणे यांच्यासोबत जोडी करून, ज्यांच्यासोबत ते ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नियमितपणे सराव करतात, ४५+ पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित जोडी जस्टिन जोसेफ आणि प्रेम रोहेरा यांचा १५-६; १५-७ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत जोसेफ अँथनी कुजूर आणि सुधीर कंधारी यांच्या जोडीला १५-५; १५-७ असे आणि उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित महेश छाब्रिया आणि सुमित कौल यांच्या जोडीला १६-१४; १५-८ असे पराभूत केले. ३५+ पुरुष दुहेरी गटात, मुंबई उपनगरातील अव्वल मानांकित आदित्य स्वामी आणि हितेश दुआ यांच्या जोडीने अजय मसंद आणि अंशु सिंग यांच्याविरुद्ध तीन अटीतटीच्या गेममध्ये १५-१०, १३-१५, १५-१३ असा रोमांचक विजय मिळवला. इतर निकाल :- महिला दुहेरी 3५+ नेहा काकडे आणि स्मिता साळगावकर यांनी नम्रता घोले आणि सोनाली सरकार यांचा १५-9, १६-१4 असा पराभव केला. मिश्र दुहेरी 3५+ आदित्य स्वामी आणि स्मिता साळगावकर यांनी अंशू सिंग आणि सरला कोटक यांचा १५-७, १५-१३ असा पराभव केला. महिला दुहेरी 4५+ रोशनी ठाकूर आणि सरला कोटक यांनी दृष्टी कुकरेजा आणि जान्हवी मेहरानी यांचा १५-१३, १५-९ असा पराभव केला. मिश्र दुहेरी 4५+ प्रेम रोहेरा आणि जानवी मेरानी यांनी जस्टिन जोसेफ आणि चेरिल गॅब्रिएल यांचा १५-७, १५-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरी ५५+ अजय विग आणि अविनाश गोडे यांनी प्रशांत मुखर्जी आणि योगेश अरोरा यांचा १५-११, १५-७ असा पराभव केला. महिला दुहेरी ५५+ नीना बाजपेयी आणि रितू अरोरा यांनी कविता जैन आणि माधवी कुरुंभती यांचा १५-१3, १५-१७, १५-१० असा पराभव केला. मिश्र दुहेरी ५५+अविनाश गोडे व कविता जैन यांनी आनंद विठ्ठलकर व प्रेरणा साधनकर यांचा १५-८, १५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि TCDBA यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे क्लब येथे ही स्पर्धा पार पडली.

 सागर वाघमारेला प्रथम मानांकन

३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी सागर वाघमारेला प्रथम मानांकन मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ गुरुवार २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री हालारी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, दादर येथे सुरु होत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री निलेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत  स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यानंतर सामन्यांना सुरुवात होणार आहे. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या स्पर्धेचे गोल्ड प्रायोजक असून सिस्का कॅरम कंपनी साहित्य पार्टनर आहे. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा प्रथमच या स्पर्धेत वापर करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एकावेळी ४८ बोर्डांवरती एकंदर १० सत्रे खेळवली जाणार आहेत. सामने वेळेवर सुरु व्हावेत यासाठी ५० बोर्ड पंच व सामना निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय स्पर्धेचा ड्रॉ व खेळाडूच्या सामन्याची माहिती हॉलमधील स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्यामुळे कमीत कमी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. स्पर्धेच्या हॉलमध्ये प्रवेश देण्यासाठी पासेसची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दिवसासाठी मर्यादित पास वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आंतर राष्ट्रीय खेळाडूंसाठी वी आय पी भोजन कक्ष उभारण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टरची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी खेळाडूंना गणवेश / टी शर्ट देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून एकाच वेळी ६ सामने लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत. तर प्रसन्ना संत, एस किशोर व मंदार बर्डे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून सामन्याचे धावते समालोचन करणार आहेत. मागील चॅलेंजर्स ट्रॉफी विजेत्या महाराष्ट्राच्या सागर वाघमारेला या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर मागील स्पर्धेतील उपविजेत्या महाराष्ट्राच्या महम्मद घुफ्रानला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला आणि पुरुष एकत्रित खेळत असल्याने महिला पुरुषांना कशाप्रकारे आव्हान देणार हि उत्सुकता आहे. यासाठी प्रत्येक सामना जिंकणाऱ्या महिलेला विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे. खुली एकेरी : १) सागर वाघमारे ( महाराष्ट्र ), २) महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ), 3) झेद अहमद ( महाराष्ट्र ), 4) रहिम खान ( महाराष्ट्र ), ५) शाहिद हिलमी ( श्रीलंका ), ६) अभिषेक भारती ( महाराष्ट्र ), ७) संदीप देवरुखकर ( महाराष्ट्र ), ८) संजय मांडे ( महाराष्ट्र )

 ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ

‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ मुंबई-हमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मास्ट्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रगती भारताच्या…

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सहदेव सदैव कराओके अभिनव स्पर्धा कलाश्रमच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात  सव्वाशे कलाकार एकत्र येणार मुंबई –‘कलाश्रम’ ही स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो. गेल्या आठ…

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर राजेंद्र साळसकर मुंबई-एक काळ असा होता,स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सुई देखील बनत नव्हती, पण सत्तेवर आलेल्या प्रत्येक नेतृत्वाने आपापल्या परीने योगदा‌न दिले आणि देशाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले‌.पण अलीकडे सत्तेवर आलेल्या सरकारने हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.इतिहास आमच्याच काळात २०१४ नंतर घडलाय, अशी खोटी हाकाठी पिटण्यास सुरुवात केली आहे.परंतु इतिहासामधील सत्य कदापि पुसता येणार नाही.हे सांगण्यासाठी आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहन प्रसंगी बोलताना केलेआहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यार्षीही मजदूर मंझील समोरील प्रांगणात,देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन समारोह आयोजित करण्यात आला होता.अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी, तसेच कामगार,आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांना अभिवादन करून अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले,आज राज्यसरकार परदेशातून गुंतवणूक आणली,असे मोठ्या तोऱ्यात म्हणत असले तरी,राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न चिंताग्रस्त होऊन बसला आहे,ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली आहे!गेल्या पाच वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील बंद एसटीसी गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्याचे सत्र सुरू करण्यात येईल,अशी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी ग्वाही दिली आहे गिरणी कामगार घराच्या रखडलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, कामगारांना जाचक ठरणारे १७ वे कलम राज्यसरकारने रद्द केले, हे १४ कामगार संघटना एकत्र येऊन  उभारण्यात आलेल्या लढ्याचे यश आहे! परंतु सरकारने जे सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी,यासाठी लवकरच होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठविला जाईल. ध्वजारोहण सोहळा सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांच्या संयोजनाखाली पार पडला. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांचे याकामी महत्व पूर्ण सहकार्य लाभले.

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा रमेश औताडे मुंबई : क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, कुमार सोहोनी, अजित भुरे, ईशा डे ठरले मानकरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण रविवार, १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही कै. ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०, ७७००९९४४९५.