Category: पालघर

palghar news

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 ई- रिक्षाचा प्रवास होणार सुकर !

 रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात   माथेरान : ई रिक्षामुळे माथेरान मध्ये पर्यटन क्रांती घडत आहे. परंतु या रिक्षाच्या मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास करताना रिक्षाला खर्चिक बाब होत आहे तर काही भागात खाचखळग्यातून जाताना त्रासदायक बनत होते. येथील वखारी नाक्यापासून ते पांडे रोडच्या पुढील भागापर्यंत पावसाळी पाण्याच्या प्रचंड ओघाने खूपच रस्ता खराब झाला होता. याकामी अनेकदा लोकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.याकामी कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले त्यानुसार या रस्त्याची कामे सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहेत यामुळे पायी चालत जाणाऱ्या त्याचप्रमाणे ई रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे ते रस्ते सुध्दा जलदगतीने दुरुस्त करावेत अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. 0000

मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची…

डोंबिवलीत निळजे लोढा हेवनमधील फेरीवाल्यांना नागरिकांनी हटवले

डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे, लोढा हेवन येथील शिवाजी चौकात शनिवारी एका फळविक्रेता फेरीवाल्याने फळ विक्री हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका केली. ही पिशवी कोणालाही कळणार नाही…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ,…

भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

भाजपचे स्थानिक आमदार कुमार ऐलानी यांच्या दबावाखाली पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा संजय गुप्ता यांचा आरोप   उल्हासनगर : मुंबई खार येथील रहिवासी आणि उल्हासनगरचे व्यापारी मुकेश वाधवा यांच्या…

 विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून ५५ कोटीचा निधी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न   डोंबिवली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली शहर परिसरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडून डोंबिवली शहरासाठी विशेष मुलभूत सोयी सुविधांतर्गत ५५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील एकूण २१५ कामे या निधीतून केली जाणार आहेत. या विकास कामांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, नाला बंदिस्ती, गटार, पायवाटा, बगिचा, उद्यान विकसित करणे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, विरंगुळा केंद्र, भटक्या मृत प्राण्यांसाठी विद्युत दाहिनी उभारणे, मुख्य चौक सुशोभिकरण अशी अनेक प्रकारची कामे केली जाणार आहेत. डोंबिवली शहरातील काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले असले तरी शहरांतर्गत काही रस्ते हे डांबरीचे आहेत. वाढत्या वस्तीचा विचार करून हेही रस्ते काँक्रिटचे होणे गरजेचे आहे. याशिवाय शहरातील वाढत्या वस्तीचा विचार करून नागरिकांना मनोरजंनाची ठिकाणी विकसित करण्याची आवश्यकता आहे. माणकोली पूल, टिटवाळा ते काटई बाह्य वळण रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर शहरांतर्गत पोहच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. हे मुद्दे मंत्री चव्हाण यांनी शासनाकडे मांडले. दूरगामी विचार करून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे डोंबिवली शहरासाठी मूलभुत सोयी सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. डोंबिवली शहर विकासाचा विचार करून शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. नगरविकास विभागाने डोंबिवली शहरासाठी ५५ कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला. दोन टप्प्यांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. २५ कोटीच्या निधीतून १०० विकास कामे आणि २५ कोटीच्या निधीतून ११५ विकास कामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कल्याण डोंबिवली पालिकेने निवीदा प्रक्रिया राबवून ही कामे करायचे आदेश आहेत. या कामांमुळे डोंबिवली शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मागील काही वर्षापासून पावसाळा आला की डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा होते. काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या नियंत्रणाखाली आहेत. हे रस्ते या यंत्रणाकडून वेळीच सुस्थितीत केले जात नसल्याने त्याचा त्रास डोंबिवलीतील प्रवाशांना होतो. हे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पक्षीय भेद न ठेवता डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागात ही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी मंत्री चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी शहरासाठी दिलेली ही भेट मानली जात आहे. कोट कल्याण डोंबिवली पालिकेतील विकास कामांसाठी निधीची उपलब्धता पाहता डोंबिवलीतील महत्वाची विकास कामे पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यामळे डोंबिवलीतील विकास कामांसाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी नगरविकास विभागाने तात्काळ मान्य केली. शहरासाठी आपल्या प्रयत्नातून ५५ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठीची निवीदा प्रक्रिया पार पडली की तात्काळ ही कामे सुरू केली जातील. – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली

उल्हासनगर: उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली झाली आहे. उल्हासनगर शहरासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना शहरातून मोठ्या सन्मानाने निरोप देण्यात आला. उल्हासनगर कॅम्प ३ येथील…

 मृत्यूपूर्वी 7 व्या वेतनाची एकत्रित रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृतांचे आंदोलन

2 हजार रुपयांची भीक नकोचे पालिकेला दिले पत्र   उल्हासनगर – सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रसंगी मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय? अशी हाक शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला दिली होती. मात्र पालिकेने या हाकेला प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या सेवनिवृत्तांनी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आंदोलन पुकारले आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील अनुदेय ठरणारी थकबाकी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचा शासन निर्णय असताना उल्हासनगर महानगर पालिकेने पाच वर्षानंतर फेब्रुवारी 2023 पासून दर महा दोन हजार रुपये याप्रमाणे ती प्रदान करणे सुरू केले आहे. सेवनिवृत्तांची फरकाची थकबाकी, निवृत्ती उपदान व निवृत्ती वेतन या सर्वांच्या फरकाची एकत्रित 5 ते 10 लाख रुपये होते.पण ती एकरकमी देण्याऐवजी 2 हजार रुपये प्रतिमाह देण्यात येत आहे. आता या तुटपुंज्या रकमेची आम्हाला भीक नको असे पत्रच सेवनिवृत्तांनी महानगरपालिकेला दिले आहे. हे सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आणि राज असरोंकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, नंदलाल समतानी, उमेश ठाकूर, अरुण जाधव, विलास सावळे, रतन दंडगव्हाळ, राकेश रॉय, सुंदर गजवानी, भगवान कुमावत, डी. एल. मगर, मनोहर पानसरे, भागवत पाटील, वामन सोनोने आदी बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करणार आहेत.