Category: पालघर

palghar news

 कल्याण ग्रामीणमध्ये उभे राहणार संशोधन केंद्र

 खिडकाळी येथे केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला मंजूरी   डोंबिवली: मुंबई महानगरांचा विकास करताना येथे शैक्षणिक संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण भागातील खिडकाळी येथे संशोधन केंद्राची उभारणी केली जाणार आहे. शैक्षणिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळ येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यास मान्यता दिली आहे. यामुळे उपनगर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी मोठे दालन खुले होणार आहे. मुंबई पल्याडची ठाणे, कल्याण ही शहर शैक्षणिक हब म्हणून उदयाला येत आहेत. संशोधन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी मात्र आजही येथील विद्यार्थ्यांना मुंबई येथील विद्यापीठ, महाविद्यालयांकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा शैक्षणिक प्रवास आणखीनच खडतर होऊन जातो. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना शैक्षणिक संशोधन संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठेवला आहे. त्यादृष्टीने, अतिशय मोक्याच्या असलेल्या खिडकाळी परिसरात संशोधन केंद्र व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी मान्यता देण्यात आली असून खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील राज्य शासनाच्या मालकीचा हा भूखंड उच्च व तंत्र शिक्षण विभागास रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेच्या रुपांतरीत संशोधन केंद्र या शैक्षणिक उपक्रमासाठी विनामूल्य हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही संस्था रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT) यांच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. तर, या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्थेला ‘एलिट इन्स्टिट्यूशन’ हा दर्जा दिलेला आहे. या संस्थेची गणना देशातील आयआयटी, आयएससी, आयआयएसइआरएस या निष्णात संस्था बरोबरीने केली जाते. 000000

उमेदवारांनी माथेरानला विधानसभेचा निवडणूक फंड द्या, पण सांभाळून ?

माथेरान : लोकसभेच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवारांकडून आपला कार्यभाग साधून एकाच उमेदवाराच्या पारड्यात काहीशी मते टाकून आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा अविर्भाव आणताना काही पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने अग्रेसिव्ह होते.दिलेल्या फंडाचा स्वतःच्या फायद्यासाठी…

रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबार – गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर:पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नागरिकांना केले आहे. सोमवार ३० सप्टेंबरला दुपारी १२:३० वाजता अपर जिल्हाधिकारी यांचे दालन क्र. १०९, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट

डोंबिवली : येथील पूर्व भागातील नांदिवली पंचानंद भागातील डाॅन बाॅस्को शाळेमागील राधाई काॅम्पलेक्स बेकायदा इमारत पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या…

 डेब्रिजचे भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली

डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, माणकोली उड्डाण पूल भागात खाडी किनारी शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. रात्रीच्या वेळेत हा मलबा गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला जात असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. रात्रीच्या वेळेत हे भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटीचे थोडेफार जंगल असलेला मोठागाव, कोपर, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव पट्टा डोंबिवलीत शिल्लक आहे. या भागातील खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून पर्यावरणप्रेमींचा एक गट या भागात सक्रिय आहे. त्यांनाही खाडी बुजून टाकण्यात आलेले भराव पाहून धक्का बसला आहे. एकीकडे वाळू तस्करांकडून वाळू उपशासाठी खारफुटीची बेसमुर कत्तल मुंब्रा ते डोंबिवली परिसरात करण्यात आली आहे. आता खाडीमध्ये भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. मोठागाव भागात खाडीवर माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतचे काम सुरू आहे. रेल्वे मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. पालिकेचा टिटवाळा ते काटई वळण रस्ता या भागातून जाणारआहे. या भागातील जमिनींचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे या भागातील सरकारी, कांदळवन नियंत्रणाखालील सरकारी जागा हडप करण्यासाठी. या जागांवर बेकायदा गाळे, इमारती, चाळी बांधण्यासाठी भूमाफियांनी मोठागाव खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरू केले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. माणकोली पुलाच्या भागात खासगी, सरकारी अशा दोनच प्रकारच्या जमिनी आहेत. या भागात येत्या काळात पेट्रोलपंप, व्यापारी गाळे, वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा अधिक संख्येने चालतील या विचारातून माफियांनी मोठागाव खाडी किनारच्या जागा हडप करण्याचे षडयंत्र रचले आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात. योग्य नियोजन करून मोठागाव भागातील खाडीकिनारा, खारफुटी नष्ट करून बुजविण्याचे काम सुरू असल्याने पालिका, कांदळवन, महसूल अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करावी. हे कृत्य करणाऱ्या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या वर्षी मोठागाव जवळील देवीचापाडा येथील खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांविरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळाच्या तक्रारीवरून चौकशीनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून भूमाफिया दिवसा भराव टाकण्याऐवजी आता रात्रीच्या वेळेत खाडी किनारी भागात मलबा किंवा भराव टाकण्याची कामे करत आहेत, अशा तक्रारी आहेत. कोट मोठागाव खाडी किनारी खारफुटी नष्ट करून, खाडी किनारा बुजवून कोणी भराव टाकत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल. याप्रकरणी महसूल, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून संंबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील. अतुल पाटील उपायुक्त,घनकचरा विभाग. 0000

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 ई- रिक्षाचा प्रवास होणार सुकर !

 रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात   माथेरान : ई रिक्षामुळे माथेरान मध्ये पर्यटन क्रांती घडत आहे. परंतु या रिक्षाच्या मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास करताना रिक्षाला खर्चिक बाब होत आहे तर काही भागात खाचखळग्यातून जाताना त्रासदायक बनत होते. येथील वखारी नाक्यापासून ते पांडे रोडच्या पुढील भागापर्यंत पावसाळी पाण्याच्या प्रचंड ओघाने खूपच रस्ता खराब झाला होता. याकामी अनेकदा लोकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.याकामी कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले त्यानुसार या रस्त्याची कामे सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहेत यामुळे पायी चालत जाणाऱ्या त्याचप्रमाणे ई रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे ते रस्ते सुध्दा जलदगतीने दुरुस्त करावेत अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. 0000

मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची…

डोंबिवलीत निळजे लोढा हेवनमधील फेरीवाल्यांना नागरिकांनी हटवले

डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे, लोढा हेवन येथील शिवाजी चौकात शनिवारी एका फळविक्रेता फेरीवाल्याने फळ विक्री हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका केली. ही पिशवी कोणालाही कळणार नाही…