Category: पालघर

palghar news

विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

डोंबिवली : उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत…

१० नोव्हेंबरची शिक्षक पात्रता परिक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न- डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवारी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी आढावा घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा पनवेल तालुक्यातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकुर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

‘उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय’

शिंदेंनी तिकीट कापलं म्हणून आमदार ढसाढसा रडला पालघर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. पालघर विधानसभेची जागा महाराष्ट्रातील 288 जागांपैकी एक आहे आणि शिवसेनेसाठी ती…

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्या सोडवणार- डॉ हेमंत सवरा

  योगेश चांदेकर पालघरः मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर पडलेले खड्डे, काँक्रीटीकरणाचे निकृष्ट काम, उड्डाणपुलाची अपूर्ण कामे यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. वाहतुक कोंडी तर रोजची असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सवरा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करून त्यांना कामासंबंधी सूचना केल्या. लोकांना दिवाळीला तरी व्यवस्थित घरी जाता यावे, यासाठी काय नियोजन करायचे ते करा, असे त्यांनी बजावले. मुंबई-अहामदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. नांदगाव, जव्हार फाटा आणि सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे नांदगाव फाटा ते सातिवली दरम्यानच्या सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गुजरात मार्गिकेवर ढेकाळे वाघोबा खिंड, तर मुंबई मार्गीकेवर चिल्हार फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट मस्तान नाका,जव्हार, टेन नाका, वरई फाटा आदी वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला बसतो. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामात महामार्ग वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि मनोर पोलिस यांच्याशी याबाबत सवरा यांनी चर्चा केली. ठेकेदाराचे दुर्लक्ष नांदगाव फाटा आणि जव्हार फाटा उड्डाणपुलांचे काम करणाऱ्या आर. सी. पटेल या ठेकेदारांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी ट्राफिक वार्डन नेमले जात नाहीत तसेच सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे.त्यामुळे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासाला तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे. अंतर्गत रस्त्यांचा श्वासही कोंडलेला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर-विक्रमगड रस्ता, वाडा-मनोर रस्ता, मनोर-पालघर रस्ता आणि वरई-पारगाव रस्त्यासह वरई फाट्यावरून पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या तसेच दहिसर-बहाडोली दरम्यानच्या अरुंद पुलावर वाहतूक मोठी कोंडी होत आहे. पुलाच्या दहिसर बाजूला वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात. सिग्नल यंत्रणा कोलमडून पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या वाहन चालकांवर स्वतः वाहतूक नियंत्रणाची वेळ येते. पुलाला भगदाड मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कायम वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या पूलाच्या दुरुस्तीची होत होती; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.   कोट ‘खानिवडे पथकर नाका येथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार तसेच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन  जनतेला दिलासा देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. -डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर

 ‘उत्पादन शुल्क’च्या स्वयंघोषित कर्मचाऱ्याकडून लाखोंची वसुली

 अधिकाऱ्यांचे अभय असल्याने शिरजोर योगेश चांदेकर पालघर : उत्पादन शुल्क विभागात कोणत्याही पदावर अधिकृत नियुक्ती नसताना दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात कर्मचारी असल्याचे भासवून लाखो रुपयांची वसुली एक खासगी व्यक्ती करत आहे. अशा प्रकारच्या वसुलीमुळे अवैध मद्य वाहतूक, तस्करी आणि साठा याला चालना मिळत असून उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणालाच हा हरताळ फासण्याचा प्रकार आहे. पालघर जिल्ह्याच्या काही तालुक्यातील सीमेवर दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि गुजरात असल्याने या भागातून दीव-दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात येत असते. बनावट, अवैध मद्य कर चुकवून आणले जाते. उत्पादन शुल्क विभाग बनावट, अवैध मद्य वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असताना त्यांच्याच विभागातला  स्वयंघोषित चालक दत्ता लोखंडे उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगून अवैध बनावट मद्याच्या तस्करीला आणि साठवणुकीला वरकमाईतून प्रोत्साहन देत आहे. अवैध धंद्यांना ‘वरकमाई’तून संरक्षण दत्ता लोखंडे हा अवैध दारू विक्रते यांच्याकडून लाखोंची वसुली करत असून. त्यासाठी संबंधितांना फोन पे आणि गुगल पेद्वारे त्याच्या पत्नीच्या खात्यात पैसे वर्ग करायला सांगतो. काही वर्षे लोखंडे हा एका अधिकाऱ्याच्या हाताखाली खासगी चालक म्हणून काम करत होता. वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर काही काळ त्याचा विभागाशी संबंध नव्हता; परंतु आता दापचारी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात तो विभागाचा स्वयंघोषित चालक म्हणून काम करतो. वास्तविक त्याच्या नियुक्तीचा कुठलाही प्रशासकीय आदेश किंवा परवानगी नाही, तरीही तो उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवून संबंधितांकडून अवैध आणि बनावट दारू विक्री प्रकरणी वसुली करून संबंधितांच्या अवैध धंद्यांना पैशाच्या बदल्यात संरक्षण देत आहे. वसुलीकडे डोळेझाक, की लागेबांधे? एक खासगी कथित कर्मचारी वर्षानुवर्षे उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना त्याचा पगार कोण करतो, त्याची नियुक्ती कोणी केली आणि नियुक्ती केली नसेल तर तो तेथे काम का करतो असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सरकारी कर्मचारी नसताना तो अन्य राज्यातून येणाऱ्या अवैध आणि बनावट मद्यप्रकरणी परस्पर वसुली करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय करतात, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. लोखंडेच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे लोखंडे याच्याशी असलेले संबंध लक्षात घेता अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच तो वसुली करत असावा आणि त्याचा वाटा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. दरम्यान, दत्ता लोखंडे याच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती आले असून त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पोलिस कारवाईत पुढे, उत्पादनशुल्क ‘वसुली’त! पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वारंवार बनावट मद्यतस्करी प्रकरणी कारवाई करत आहेत. गेल्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने २७ लाखांचे अवैध मद्य आणि मालमत्ता जप्त केली. कारवाई करण्याची ज्या विभागाची खरी जबाबदारी आहे, तो उत्पादन शुल्क विभाग मात्र थातूरमातूर कारवाई करून अवैध मद्याच्या तस्करीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे. ज्यांच्या हाताखाली दत्ता लोखंडे काम करतो, ते उत्पादन शुल्क विभागाचे दापचरी सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संभाजी फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून दत्ता लोखंडे हा फडतरे यांच्या हाताखाली काम करत असून त्यांच्या आशीर्वादाने त्याची वसुली सुरू होतीका, अशी चर्चा आता सर्वत्र आहे. लोखंडेच्या टीपमुळे मद्यतस्करीला आळा घालण्यात मर्यादा विशेष म्हणजे अवैध मद्य तस्करी, बनावट मद्य वाहतूक प्रकरणी भरारी पथके कुठे कुठे आहेत आणि ते काय काय कारवाई करतात याची टीप हा दत्ता लोखंडे संबंधित अवैध धंदे करणाऱ्यांना देत असल्याचा संशय असून त्यामुळे अवैध बनावट मद्याची तस्करी पकडण्याचे प्रयत्न फोल ठरतात. पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा येते. शासकीय यंत्रणेचे हात धरून एखादी खासगी व्यक्ती कशी वसुली करते, याचा हा उत्कृष्ट नमुना असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही का, असा प्रश्नही आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कोट ‘दत्ता लोखंडे आमच्याकडे चालक म्हणून कामाला नाही. खासगी पंच म्हणून त्याला आम्ही अनेकदा मदतीला घेतले. त्याने परस्पर वसुली केली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही. गेल्या आठ दिवसांपासून त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. -संभाजी फडतरे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग दापचरी सीमा तपासणी भरारी पथक

डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा

विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी   डोंबिवली : येथील एमआयडीसीतील कावेरी चौकातील पदपथ, रस्ते अडवून उभारण्यात आलेल्या टपऱ्या, या चौकातील फेरीवाले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुचाकी, चारचाकी…

अवैध मद्यासह १५ लाखांचा ऐवज जप्त

  डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात उत्पादन शुल्क विभाग सतर्क योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि साठा यावर उत्पादन शुल्क…

 दिग्गज नेत्यांना ठाकरे यांच्या नव्या चेहऱ्यांचे आव्हान

पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जाहीर सामाजिक कामाची पार्श्वभूमी असलेल्या दुबळा, वळवी यांना उमेदवारी योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातून दोघांची नावे जाहीर केली आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे, तर बोईसर विधानसभा मतदारसंघातूनही अपेक्षेप्रमाणे डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा होती. बारा उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत होते; परंतु महाविकास आघाडीने पालघर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला असून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवारासोबत थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी उमेदवारीच्या स्पर्धेत होते; परंतु हा मतदारसंघच शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेल्यामुळे चौधरी यांची उमेदवारी आपोआप निकालात निघाली आहे. ॲड. चौधरी यांनी पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांनी दुबळा यांच्या विजयासाठी सामूहिक पद्धतीने प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पालघर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत सवरा यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यापेक्षा तीस हजार मते जास्त मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुबळा हे महायुतीचा उमेदवार जो ठरेल  यांच्याशी कशी लढत देतात, हे पाहावे लागेल. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित पालघर हा मतदारसंघ भाजपने स्वतःला मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असून माजी खासदार राजेंद्र गावित यांचे तेथे पुनर्वसन करण्याचे घाटत होते; परंतु महायुतीतील तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीकडून नेमका उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात जयेंद्र दुबळा यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. सामाजिकतेचा वसा घेऊन त्यांनी अनेक कामे केली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात डहाणू तालुक्यात झालेले प्रचंड नुकसान  अशावेळी दुबळा हे त्यांच्या मदतीला धावून आले. तसेच एखादा शब्द देणे सोपे असते; परंतु दिलेला शब्द पाळणे हे आव्हानात्मक असते, हे आव्हान त्यांनी पेलले. त्यासाठी अनेक आव्हानांवर त्यांना मात करावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन अनेकांनी दिले होते; परंतु वाणगाव परिसरातील नुकसानीच्या वेळी दुबळा हेच धावून आले होते आणि अनेक नागरिकांना त्यांनी आर्थिक मदत केली. आचारसंहितेच्या काळात अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘विश्वास’चा अनेकांना आधार शिवसेनेच्या शिंदे गटातून गेल्या काही दिवसापूर्वी डॉ. विश्वास वळवी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. राजकारणातून समाजकारण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर डॉ. वळवी यांचा विश्वास असून त्यांनी त्यांच्या ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील गाव, पाड्यात मोठे सामाजिक काम केले आहे. जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात. नवरात्रोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो. ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची मोठी सेवा केली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा मोठा लाभ शहरी व ग्रामीण आदिवासी बांधवांना झाला होता. वंचित घटक, आदिवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विश्वास फाउंडेशन मोठा आधार ठरले आहे. दहा वर्षांनंतर उमेदवारी गेल्या दहा वर्षांपासून डॉ. वळवी हे बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत होते; परंतु प्रत्येक वेळी अन्य कोणाला तरी उमेदवारी मिळत असल्याने त्यांना थांबावे लागत होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या पालघर, बोईसर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीला कामडी बॅकफुटवर गेल्याने विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या मजबूत उमेदवार देण्याची तयारी ठाकरे यांनी केली होती. कामडी यांना  ३२ हजार मते कमी होती. डॉ. वळवी यांच्या रूपाने आता चांगल्या उमेदवाराचा शोध संपला आहे. दुबळा आणि डॉ. वळवी या दोघांनाही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने तसेच ते सातत्याने रस्त्यावर संघर्ष करीत असल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार ठाकरे यांनी केला. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असले, तर पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. या वेळी पालघर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढती होण्याची शक्यता असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हे दोन उमेदवार निवडणुकीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सी जमीनदोस्त

डोंबिवली : येथील पूर्वेतील आयरे भागातील सद्गुरू नाना धर्माधिकारी उद्यानाजवळील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभाग अधिकाऱ्यांनी टप्प्याने नियोजनबध्दरितीने तेवीस दिवसांच्या कालावधीत भुईसपाट…

दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस…