Category: पालघर

palghar news

पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच- अमित शाह

पालघर : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

डहाणूला अवकाळीने झोडपले

कासा : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते. सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली. उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही. तलासरीमध्ये गारांचा पाऊस तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी  झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे. मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

पालघर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आज मुंबईत दादर येथील वसंतस्मृती येथे डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

कपिल पाटील यांच्या रॅलीने वाडा तालुक्यात महायुतीचा झंझावात

वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी प्रचारासाठी वाडा तालुक्यात काढलेल्या रॅलीने महायुतीचा झंझावात पाहावयास मिळाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वाडा शहरासह…

पालघर लोकसभेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १७ उमेदवारांचे २६ नामनिर्दशनपत्र दाखल – गोविंद बोडके

पालघर : २२- पालघर  लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.* ३ मे २०२४ रोजी बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी),यांनी १ अर्ज, परेश सुकर घाटाळ (बहुजन महापार्टी आणि अपक्ष ), यांनी २ अर्ज, हेमंत विष्णू सवरा (भारतीय जनता पक्ष) यांनी ३ अर्ज, कल्पेश बाळू भावर (अपक्ष), यांनी १ अर्ज, राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), यांनी २ अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), यांनी १ अर्ज,भरत सामजी वनगा(बहुजन समाज पार्टी), यांनी १ अर्ज,अमर किसन कवळे, (अपक्ष) १ अर्ज, भावना किसन पवार (अपक्ष) १ अर्ज उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २६ नामनिर्दशनपत्र दाखल केले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

उष्णता वाढली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी जिल्हाधिकारी गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर : उष्माघात आणि त्याच्यापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहितीपत्रकाची प्रसिध्दी करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज ठेवण्याबाबत सुचित…

पाणी टंचाई मुळे फणसोली गावच्या महिला आक्रमक

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात अनेक वाडया पाड्यामधे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहॆ, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वन वन करावी लागत असून त्यामुळे महिलांमधे…

जनसेवा रुग्णवाहिचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण

राजीव चंदने मुरबाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यंच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अण्णा साळवे यांनी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी  रुग्णवाहीका देऊन, त्या जनसेवा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. यावेळी आमदार कथोरे म्हणाले कि,मी अण्णाच्या मागे नाही तर अण्णा कायम सोबत आणि बरोबर आहे. या रुग्ण वाहिकेचा सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी उपयोग झाला पहिजे असे बोलून अण्णा साळवे यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष मुकेश विशे, सरचिटणीस नितीन मोहपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे, मोहन सासे,कांतीलाल कंटे,रवींद्र चंदने,रिपई प्रदेश उपाध्यक्ष महबूब पैठणकर, मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,दीपक पवार, ऍड सचिन चौधरी, गुरुनाथ पवार, सुवर्णा देसले,दीपक खाटेघरे,कैलास देसले,शिवराम पवार, प्रकाश जाधव,नरेश देसले,नरेश मोरे, धनंजय थोरात, रवींद्र गायकवाड,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या शुभ प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समता सामाजिक फाऊंडेशनचे शंकर करडे, संजय बोरगे, लक्ष्मण पवार, दिलीप पवार, सुभाष जाधव यांच्या वतीने पेढे व पेन चे वाटप करण्यात आले.