Category: रायगड

raigad news and updates

‘गावपळण’ आचरा गाव झाले निर्मनुष्य…!

सिंधुदुर्ग : आचरे गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरातले चौघडे निनादू लागले. तोफा धडाडल्या. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला बारा पाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार,पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढल्या…

वाल्मिकी नगरात महाभंडाऱ्याचे आयोजन

माथेरान : माथेरान मधील युवा रुखी गुजराती समाजाच्या वतीने श्री अंबे मातेच्या पूजेनिमित्ताने मंगळवार दि.१७ रोजी येथील वाल्मिकी नगरात वाल्मिकी बांधवांकडून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन महाभंडाऱ्याचा लाभ घेतला. अत्यंत प्रसन्न वातावरणात वाल्मिकी बांधवांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करून उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, नरेश परदेशी, निखिल शिंदे, प्रकाश सुतार,प्रमोद नायक, मुकुंद रांजणे, जनार्दन पार्टे आदी उपस्थित होते. युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष गौरंग वाघेला त्याचप्रमाणे अंबालाल वाघेला, दीपक पुरबिया,रुपचंद वाघेला, छगन पुरबिया, राजेश वाघेला,कांती पुरबिया, माजी नगरसेवक संतोष लखन,नरेश पुरबिया यांसह अन्य समाज बांधवांनी हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 0000

चित्रकार चंद्रकला कदम यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

अलिबाग : ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. आपल्या चित्रकलेने चंद्रकला कदम यांनी अलिबागचे नाव देशात उंचावले अशा शब्दात थळे यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी मापगांवमधिल अनेक मान्यवर चंद्रकला कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होते. चंद्रकला कदम यांनी चितारलेल्या चिंत्रांना महाराष्ट्राच्या विधीमंडळासह देशाच्या संसदेतही मानाचे स्थान मिळाले आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशाच्या संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावले गेले. हे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी चितारले होते. चंद्रकला कदम यांना शुभेच्छा द्यायला यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पत्रकार चाळके आणि ज्येष्ठ पत्रकार आणि चंद्रकला कदम यांचे पती कुमार कदम उपस्थित होते. फोटोओळ ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, पत्रकार वैभव चाळके आणि मापगावचे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते.

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते. 0000

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जवळपास १९ कोटींची तडजोड रक्कम वसूल – अमोल शिंदे

अशोक गायकवाड रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे. त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ५२ हजार ९०१ वादपूर्व प्रकरणे व ९ हजार ८१४ प्रलंबित अशी एकूण ६२ हजार ७१५ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार २९० वादपूर्व प्रकरणे व २ हजार ३२७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवून निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात १० जोडप्यांचा (पाली-१, पेण-१, रोहा-१, महाड-३, पनवेल-१, खालापूर-२, अलिबाग-१) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ४८ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ५ कोटी ६६ लाख २८ हजार इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क. २,एन. के. मणेर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २८ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

 ‘महिला आयोग आपल्या दारी’

 सिंधुदुर्गात १९ डिसेंबरला जनसुनावणी…!   सिंधुदुर्गनगरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी हा एक अत्यावश्यक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीबाबतची जनसुनावणी येत्या१९ डिसेंबरला जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे या तक्रारी ऐकून सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यातील या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे लगेचच निवारण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीच्या तारखेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे बरंचदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरीत १८ डिसेंबरला आयोगाच्या वतीने अशाच प्रकारचा उपक्रम बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी हाती घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जवळपास १९ कोटींची तडजोड रक्कम वसूल – अमोल शिंदे

अशोक गायकवाड रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे. त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ५२ हजार ९०१ वादपूर्व प्रकरणे व ९ हजार ८१४ प्रलंबित अशी एकूण ६२ हजार ७१५ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार २९० वादपूर्व प्रकरणे व २ हजार ३२७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवून निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात १० जोडप्यांचा (पाली-१, पेण-१, रोहा-१, महाड-३, पनवेल-१, खालापूर-२, अलिबाग-१) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ४८ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ५ कोटी ६६ लाख २८ हजार इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क. २,एन. के. मणेर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २८ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

 जिल्ह्यातला पारा घसरला

 बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद   बदलापूर: सोमवार हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासाकांनी केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापुरात १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर शेजारच्या अंबरनाथमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बदलापूर शहरात १०.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. खाजगी हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद नोंदवली. बदलापूर शहराच्या एका बाजूला टाहुलीची डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उल्हास नदी आहे. शहरात मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे शहरात जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होत असते. यंदा सोमवारी आतापर्यंतच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शेजारच्या अंबरनाथ शहरात ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उल्हासनगर शहरात १२.५ अंश सेल्सिअस, कल्याण शहरात १२.८ अंश सेल्सिअस, डोंबिवली शहरात १२ अंश सेल्सिअस तर ठाणे शहरात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

माथेरानमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

माथेरान : नेहमीच्या शाळेच्या अभ्यास क्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर स्कुल, नगरपालिका प्राथमिक शाळा सेंट झेव्हीयर स्कुल आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन…