Category: रायगड

raigad news and updates

भारताने सहाव्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला; वर्ल्डकप जिंकणारा आयुष म्हात्रे विरारचा ‘दुसरा’ छोरा

हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे.…

  माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद!

माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद! मुकुंद रांजाणे माथेरान : हातरीक्षाच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांना कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्वच  हातरीक्षा बंद करून ई रिक्षांच्या संख्येत वाढ करावी असे स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने याबाबत काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हातरीक्षा सारखी अमानवीय प्रथा बंद करून सर्व ९४ हातरीक्षा चालकांचे ई रिक्षाच्या माध्यमातून पुनर्वसन करावे तसेच नवीन ई रिक्षा ह्या राज्य सरकारने खरेदी कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले होते. ६ फेब्रुवारी रोजी या आदेशाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असतानाही राज्य शासनाकडून अद्याप काहीही ठोस भूमिका बजावली नाही.त्यामुळेच श्रमिक रिक्षा संघटनेने १० फेब्रुवारी पासून सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विविध संबंधित अधिकारी वर्गाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे. या बंदच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे या व्यतिरिक्त अन्य कुणालाही ह्या सेवेचा लाभ दिला जाणार नाही. राज्य सरकारकडुन जोपर्यंत ई रिक्षा वाढीसंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा बंद ठेवण्यात यावा जेणेकरून सर्वांना या सुविधेची झळ सहन करावी लागणार आहे. रुग्णांसाठी नगरपरिषदेची रुग्णवाहिका उपलब्ध आहे. निर्णय लागेपर्यंत शालेय विद्यार्थी सुध्दा पायी चालत जाऊ शकतात. अधिकारी वर्गाला सुध्दा ही सुविधा बंद केल्याशिवाय त्यांना इथले रस्ते कशा पद्धतीचे झाले आहेत याचे आकलन होईल.असे ई रिक्षा समर्थकांमधून बोलले जात आहे. कोट सर्वोच्च न्यायालयाने माथेरान मधील सर्व ९४ हातरीक्षा कायमस्वरूपी बंद करून सहा महिन्यांत त्यांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून ई रिक्षाच्या संख्येत वाढ करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली आहे.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सुनील शिंदे–सचिव श्रमिक रिक्षा संघटना

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी…

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी… राजीव चंदने मुरबाड :  मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या अखत्यारीत मुरबाड शहर व तालुक्यात एकूण…

शरद पवार इन अक्शन

बारामती : पुतण्या अजित पवारांच्या निधनाचे दु:ख पचवून शरद पवार आज पुन्हा इन अक्शन आले. ते थेट आज नीरा नदीतील प्रदुषणाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचले! अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार…

 कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न

कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न पनवेल: तुपगाव येथील  संत गोरोबा काका मंदिरात खादी ग्रामोद्योग मुंबई व कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम प्रशिक्षण व इलेक्ट्रिक चाक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मुंबईचे अधिकारी अरुण कुमार प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजातील २० लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक चाकांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रथम सर्व इलेक्ट्रिक चाकांचे पूजन करण्यात आले. या लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक चाक वापरासंदर्भात १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, यापूर्वी पार पडलेल्या ३० दिवसांच्या माती काम प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मुंबईचे अरुण कुमार,  ग्रामसेवक विश्वास वारे, कुंभार समाज रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा सचिव रामदास साळवी यांनी इलेक्ट्रिक चाक योजनेविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास  उमेश मळवी (दादाजी फाउंडेशन, नाशिक), वसंत महाराज कुंभार (रायगड भूषण), नंदकुमार चिरनेरकर (जिल्हा उपाध्यक्ष), रविंद्र कुंभार , रमेश दहिवलीकर (जिल्हा कार्याध्यक्ष), दिलीप साळवी (जिल्हा सचिव), मधुकर कुंभार (जिल्हा महासचिव),  पनवेल तालुका अध्यक्ष बजरंग भागवत, भरत आपटेकर,  राजेंद्र साळवी,  वसंत कुंभार,  प्रविण कुंभार,  संजय शिर्के,  सविता मांडलेकर,  कांता नागावकर,  स्वप्निल नागावकर,  सिद्धेश कुंभार, प्रज्वल कुंभार (प्रशिक्षक),  सचिन साळवी, सुखदेव सारवे,  देवेंद्र कुंभार, यशवंत बिरवाडकर,  उद्धव साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास कुंभार समाजातील बांधव, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कुंभार समाजातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून समाजाच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

 पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन

पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके

दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके राज भंडारी पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे. मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.

युजीसीच्या नव्या नियमास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 नवी दिल्ली : देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी  कार्यरत असलेल्या युजीसीने लागू केलेल्या नव्या निमयमास सर्वोच्च न्यायालयातकडून  स्थगिती देण्यात आली आहे. देशभरातली अनेक विद्यार्थी संघटना, संस्थांनी विरोध दर्शविला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ युजीसीने एक नवा नियम जारी केला होता. मात्र, आता विद्यापीठ  अनुदान आयोगाच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयातकडून  स्थगिती देण्यात आली आहे. अशाने वेगवेगळ्या प्रवर्गाची वेगेवगळी वसतिगृह तयार होतील, अशी चिंता न्यायाधीशांनी व्यक्त केली. तसेच, केंद्र सरकारकडून नियमांचा मसुद्यावर पुनर्विचार करण्याबाबत सुतोवाचही न्यायालयाकडून करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत, याचिकाकर्त्यांच्यावकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, संविधनाने सर्वांनाच संरक्षण दिलं असून सर्वच नागरिकांचे रक्षण झाले पाहिजे. मात्र, युजीसीचा नवा नियम संभ्रमात टाकणारा असून भेदभाव करणारा आहे. या नियमांत केवळ ओबीसी, एसी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्याच संरक्षणाचा मुद्दा आहे.

विस्मरण होवू न देणारे अजितदादांचे ‘ वेगळेपण ‘

दिवाकर शेजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या करुण अंताने सारा महाराष्ट्र हळहळत आहे. एक दमदार नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले आहे. दादांचा राजकारणातील उदय, त्यांना मिळालेली…

अलविदा दादा

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस अजित पवार त्यांच्या बारामतीच्या मातीत विसावले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यां दोघांनी अजित पवारांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अवघा महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने शोकसागरात बुडाला. दादांना अलविदा करण्यासाठी आज देशभरातुन नेतेमंडळी आणि दादांच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येन गर्दी केली…