Category: रायगड

raigad news and updates

 दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अशोक गायकवाड   रायगड : दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल -ताशे , शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते. रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचं होते. या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता. 00000

‘शिवराज्यभिषेक’ सोहळ्यासाठी रायगड सज्ज

अशोक गायकवाड *रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच २० जून रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अवघा रायगड सज्ज झाला आहे. १६७४ मध्ये ज्येष्ठ शुक्ल…

५ जुलैपासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम-  भरत बास्टेवाड

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे.…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपाइं रायगड जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत

अशोक गायकवाड   रायगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून रिपाइं जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी मंत्रीपदी वर्णी लागल्याने ना. रामदास आठवले हे मंगळवारी, दि १८ जून २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, कोकण युवा सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, मावळ लोकसभा उपाध्यक्ष पंकज सोनावणे, खालापूर तालुका युवा अध्यक्ष सुनिल सोनावणे, खोपोली शहर अध्यक्ष नितिन वाघमारे, राहुल महाडिक युवा नेते, रुपेश रूपवते खोपोली युवा शहर अध्यक्ष, अशोक गोतारणे , उमरोली पंचायत समिती वार्ड अध्यक्ष निलेश गायकवाड आदींनी आठवले यांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ, पुष्पमालेव्दारे शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले. 00000

महाड येथील निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात  105 युनिट रक्तदान

रघुनाथ भागवत   महाड : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड व रावतळी आयोजित श्री विरेश्वर मंदिर सभागृह येथील रक्तदान शिबीरामध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये 23 स्त्री रक्तदात्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय आहे, की निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्त दात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. तर उदघाट्न प्रसंगी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी बोलताना रायगड जिल्ह्यात रक्तदानाच्या महान कार्यात संत निरंकारी मिशनचे प्रथम स्थानी नंबर आहे. सदर शिबिराला महाड विधानसभा आमदार भरतशेठ गोगावले, युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, पत्रकार चंद्रहास नगरकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद माने यांनी सदिच्छा भेट दिली. महाड नगरपरिषद माजी बांधकाम सभापती प्रमोद महाडिक यांनी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून स्वच्छता अभियानामध्ये महाड नगर परिषदेला मिळालेल्या यशामध्ये संत निरंकारी मिशनचे मोठे योगदान असल्याचे सांगून पूरपरिस्थितीच्या दरम्यान स्वच्छता अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे योगदान आहे असे यावेळी अधोरेखित केले. तर राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांनी देखील मनोगतात संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. महाड युनिट सेवादल संचालक नथुराम निंबरे यांनी सांगितले कि, संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करत आहे असे प्रास्ताविक मध्ये महाड सेवादल शिक्षक अनिल सकपाळ यांनी व्यक्त केले. रायगड 40-अ झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, संयोजक दयाळ पारधी, रावतळी शाखा मुखी प्रविण करबेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरमध्ये सेवादल युनिट नं. 357 महाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी रक्तसंकलन जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी केले. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र व संत निरंकारी मिशनकडून निरंकारी साहित्य, पुष्प देऊन आभार मानण्यात आले.

करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन

पनवेल : लाखो रुपये किमतीची घरे खरेदी केली मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. अशी संतापजनक परिस्थिती करंजाडेची असल्याने करंजाडेवासियांना दुसऱ्यांदा मोर्चाचे हत्यार उपसावे लागले. मंगळवार आणि पाऊस असल्याने कामावर सुट्टी टाकून अनेक नागरिक या मोर्चात छत्री व पाण्याची बाटली घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक व महिलांचा समावेश होता. करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्नासाठी उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर केला होता. अखेर चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आ. बालदी यांनी सिडको भवनात करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मागील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मदारांच्या बैठकीपूर्वीच नागरिकांच्या संघटनेने मंगळवारचा दिवस मोर्चासाठी जाहीर केल्यामुळे मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता मोर्चा वसाहतीमधील सेक्टर ६ येथील बस थांब्यापासून सुरू झाला. या मोर्चेकरींना जेएनपीटी महामार्ग रोखायचा होता. मात्र पोलिसांनी विरोध केल्यामुळे आणि सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीमध्येच आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन देण्याचे ठरल्याने मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारीच मोर्चा थांबवला. सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रणिक मुळ यांनी मोर्चेकऱ्यांना जीर्ण जलवाहिनी यापुढे बंद ठेऊन नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा कार्यान्वित केल्याची माहिती दिली. तसेच २० दश लक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या वसाहतीला यापुढे सूरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले. करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन या सोसायट्यांच्या संघटनेने पाठिंबा दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

पोलीस निरीक्षक कारवाई करतील का?   कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र स्थानिक पोलीस निरीक्षक याबाबत कोणतीच भूमिका घेताना दिसून येत माहित. खरंतर अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी यामध्ये काही आर्थिक हितसंबंध ठेऊन आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ नुसार राज्यात विनापरवाना खेळल्या जाणाऱ्या जुगारास प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश ठेऊन राज्यात जुगार,मटका यावर कारवाई होत आहेत. मात्र कर्जत तालुक्यात अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसून येत नाहीत.   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, गांजा, अमली पदार्थ, अवैध दारू यांची विक्री होताना दिसून येत आहे.  तरुणाई याच्या आहारी जात आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असून याला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मोठमोठ्या इंटरनॅशनल महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे सुद्धा येथील स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे.  सामान्य शेतकरयांना त्रास देणारे अधिकारी अशा ठिकाणी आपली सदसदविवेक गहाण टाकतात का असा प्रश्न सुद्धा जाणकारांना पडला आहे. अलीकडे फेब्रुवारी महिन्यात कर्जत शहरातील नाना मास्तर नगर येथील एका फॉर्म वर जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शहरामध्ये अनेक दिवस सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याबाबत कर्जत पोलीस स्टेशन मात्र अनभिज्ञ कसे हा प्रश्न देखील शिल्लकच राहिला. कर्जत पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आपली सदसदविवेक बुध्दी वापरून यावर कायदेशीर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 000000

‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही – सुनिल तटकरे

रोहा : राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही  कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि  त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द सुनिल तटकरे यांनी रोहेकरांना दिला. सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. ४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही  आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला. तटकरेसाहेब हे आपल्या घरातलीच व्यक्ती समजून तुम्ही मतदारसंघात उतरलात आणि आपण घेतलेल्या परिश्रमाला जनतेने प्रतिसाद चांगला दिला. महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आभार दौरा दिनांक १४ जूनपासून सुरू केला असून दुसर्‍या दिवशी रोहा येथे महायुतीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, नितीन तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कुणबी समाज नेते सुनिल मगर, कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नेत्या दिपिका चिपळूणकर आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

२९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : सर्वोच्च न्यायालयाद्वारे विधी सेवा प्राधिकरणने सहकार्य घेत २९ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचा नागरिकांनी लाभ…

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १ कोटी रूपयांचा गांजा जप्त

अशोक गायकवाड रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.