Category: ठाणे

Thane news

घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा तत्काळ होईल- सौरभ राव

अनिल ठाणेकर   ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल. आज असलेल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि…

खारफुटीवरील घरांच्या चौकशीचे केंद्रकडून राज्य सरकारला आदेश

पनवेल : खारघर आणि मानसरोवर येथे सिडको बांधत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम सागरी हद्द नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून खारफुटी क्षेत्रात होत असल्याने पर्यावरणवाद्यांनी याबाबतची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने…

खुशखबर ! नवी मुंबई मेट्रोचा प्रवास स्वस्त

मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून ७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध

ठाणे : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन २०२४च्या काजू…

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय)…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड पुणे :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. 0000

प्रांत प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीची सभा संपन्न

कर्जतः कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतमध्ये शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटीची सभा संपन्न झाली. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे , कर्जत अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, कर्जत पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या उपस्थितीत कर्जत येथील प्रशासकीय भवनात कर्जत पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस हद्दतील शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पडण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने नागरिकांच्या रस्ते, वीज, वाहतुकीची समस्या याबाबत असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. सदर बैठकीत करिता उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे, तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, कर्जत पोलीस ठाणे, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक संतोष साळुंखे व सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या सह ४५ ते ५० शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ००००

मुख्यमंत्री यांच्या हस्ते  मिरा भायंदरमध्ये  मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष ओनलाईन लोकार्पण सोहळा 

भाईंदर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  मिरा भायंदर मधील मुन्सिपल शाळेतील मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष लोकार्पण सोहळा  ओनलाईन  पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मुलींची, महिलांची सुरक्षितता महत्वाची असून मिरा-भायंदर महापालिकेने निर्णय…

 चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव!

 कोळीवाडावासियांच्या आत्मियतेच्या बंदराला भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्या मागणीला यश   ठाणे : अनेक दशकांपासून चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजबांधवांबरोबरच अन्य समाजातील नागरिकांच्याही आत्मियतेचे बंदर असलेल्या चेंदणी कोळीवाडा मिठबंदर रोड बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव देण्यात आले आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आयोजित कार्यक्रमात नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ठाणे शहराच्या स्थापनेपासून चेंदणी कोळीवाड्याला इतिहास आहे. कोळी समाजबांधवांचे वास्तव्य असलेल्या चेंदणी परिसराने अन्य मराठीजनांनाही सामावून घेतले. चेंदणी कोळीवाड्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी मिठाचे उत्पादन होत होते. त्यामुळे खाडीवरील बंदराला मिठबंदर रोड असे नाव पडले होते. कालांतराने मिठाचे उत्पादन बंद होऊन, गणेशोत्सवात दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे खाडी किनाऱ्यावर विसर्जन केले जात होते. त्यामुळे या बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे या ठिकाणी चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर अशा नावाचा फलक बसविण्यात आला. याबद्दल चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष विक्रांत कोळी, सुभाष कोळी, कमलाकर कोळी, प्रकाश ठाणेकर, जीत बारांगुळ, हेमंत ठाणेकर, कृष्णकुमार कोळी, गिरीश कोळी, प्रशांत नाखवा, कुणाल भोईर, जमीर कोळी यांच्यासह चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदे मार्फत देण्यात येणारा “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५” सोहळा गुरुवारी बी. जे हायस्कूल येथे पार पडला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षांतील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत.‌ शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, एफ. एल. एन, वोपा टूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्याज्ञान इ. दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षक दिनाच्या सदिच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा ५ सप्टेंबर रोजी पार पाडतोय ही आनंदाची बाब आहे. आई-वडील, शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचे काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा, असे मार्गदर्शन उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे तीन वर्षांतील १५ शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला.‌ जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात, शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव मिळण्यास मदत होते. शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्‍नशील असलेल्‍या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा, असे आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असे मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाराम ढमके, राजश्री पाटील यांनी केले. सन २०२२-२३ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील सहा. शिक्षिका अनघा आनंद सोनकांबळे, भिवंडी तालुक्यातील मुख्याध्यापिका पुष्पलता काशिनाथ गायकवाड, कल्याण तालुक्यातील पदवीधर शिक्षक आत्माराम बाळाराम पागडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अरुण विनायक गोडांबे, शहापूर तालुक्यातील सहा. शिक्षक डॉ. हरिश्चंद्र तुकाराम भोईर. सन २०२३-२४ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुचित्रा राजेंद्र सोनार, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विलास अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्रद्धा सुनिल पवार, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अशोक महादू रोठे, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुधीर पुंडलिक भोईरसन २०२४-२५ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुका तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणपत शंकर धुरी, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अर्चना अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चतूर महारू वाघ, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक डॉ. प्रशांत तुकाराम माळी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शेखर शिवराम घोडविंदे. ०००००