शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी योगाभ्यास करावा – रोहन घुगे
ठाणे : योग दिन खूप महत्वाचा आहे. आजच्या काळात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. साथीच्या रोगांना दूर करण्यासाठी शरीर व मन स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास…
Thane news
ठाणे : योग दिन खूप महत्वाचा आहे. आजच्या काळात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. साथीच्या रोगांना दूर करण्यासाठी शरीर व मन स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास…
मिरा भाईंदर : वसई विरार पोलिस आयुक्तालयात २३१ पोलीस शिपाई रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. सुरुवातीला १९ जून ते २५ जुन दरम्यान भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस…
ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार सुरुच राहील्यामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच शहराच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. यात काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली, त्यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे…
डोंबिवली – अवघ्या महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झालेय. शेतकरी खुष झालेत. पण या पावसामुळे डोंबिवलीकरांचे मात्र हाल झाले आहेत. डोंबिवलीत रेल्वे तिकीटासोबत ‘पाऊस फ्री’ मिळत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या…
पनवेल : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये आज भाजपच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा व युवा मोर्चाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीता पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, दिपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्निल खबाले ,वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याने फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धूत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंडघशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल्या. 00000
अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २२ जून व रविवार, दिनांक २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, 1.अधिवास (डोमेसाईल) दाखला, 2. रहिवासी दाखला, 3. उत्पन्नाचा दाखला आणि 4. ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. 00000
शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आरटीई प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे न्यायालयात गेले आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जेच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला. या कायद्यांतर्गत शासकीय, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवली जाते. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार १७ मे ते ४ जून या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते. परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागावरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. राज्य शासन आणि खासगी शाळा या वादात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळा सुरु झाल्या असून अभ्यासक्रमाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु, आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 00000
कल्याण : कल्याण- ळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गाव हद्दीत बुधवारी एका पोतळीमध्ये भरलेली हजारो मतदारांची ओळखपत्रे रस्त्यावर फेकलेली आढळून आली आहेत. बहुतांशी मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्व भागातील…
ठाणे : वस्तू व सेवा कर कार्यालय, ठाणे येथील कार्यालयीन कामकाजाकरिता ठाणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिक स्वरुपाची सुमारे 12000 चौ.फुट ते 14000 चौ.फुट इतक्या जागेची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्यकर सह आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक मालमत्ता धारकांनी मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावासह राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), कार्यालय, ठाणे, 3 रा मजला वस्तु व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, येथे संपर्क साधावा, असे ठाणे राज्यकर सह आयुक्त (प्रशासन) यांनी कळविले आहे. 00000000
ठाणे : महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. चालू खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक (खते) संदिप तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000