Category: ठाणे

Thane news

 शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात

शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहेत.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत. दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे वन्यजीव नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत.निलगायी या भाजीपाला,व कडधान्य फस्त करीत आहेत.निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत.शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव,कुडशेत,मुसई बेडीसगाव,परटोली,उंब्रई,कानवे,चेरवली,आष्टा,आदिवासी,लवले,ठुणे,व किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत.या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा,वाल,मटकी,इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी,घोसाळी,शिरवळे,भोपळा,गवार,काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत.यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.एकिकडे शेतकऱ्यांना पावसाळ्या मोसमात वादळीवाऱ्यासह होणारा पाऊस बेमोसमी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नुकसानाला दरवर्षी समोर तर जावे लागतेच परंतु आता हिवाळ्यातील रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.नीलगायींचे कळप काही स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायीचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत.असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे. प्रतिक्रिया – नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे. संजय सावंत वनपाल, शेणवे वनपरिमंडळ,तालुका शहापूर प्रतिक्रिया – वाढत्या निलगायींच्या उपद्रवामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मनोहर खाडे शेतकरी

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडणून आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यावर पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.  अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. तर, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्रफ शानू पठान यांनी अजित पवार यांच्या अपघातात कोणी दोषी आहे? अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आमचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी मागणी केली. तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनीही आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबासोबत असून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास रेपाळे, राम रेपाळे यांनीही अजित पवार यांच्यासोबत निवडणूकांमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ही सभा  अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी तहकुब करण्यात आल्याचे सांगत लवकरच नवीन तारीख घोषित केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व

१४वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व ठाणे : श्री माँ विद्यालयाने ५१ गुणांची कमाई करत सिम्पथेसायझर स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रल्हाद भांगले स्मृती १४ व्या ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात ५५ गुण नोंदवणाऱ्या ठाणे पोलिस स्कूल संघाने अव्वल स्थान मिळवले.  मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेत विराज काटकर युग पाटील आणि विहान निकुंभने आपापल्या वयोगटात सुवर्णपदक जिंकले. तर मयांक भोकरे गोळा फेक स्पर्धेत विजेता ठरला. संक्षिप्त निकाल : मुले ८ वर्षे वयोगट – विराज कोटकर ( सुवर्ण – लांब उडी, २.९३ मिटर), मुले १० वर्षे वयोगट – विहान निकुंभ ( सुवर्ण – लांब उडी, ३.५९ मीटर, रौप्य – ६० मिटर धावणे, ९.६ सेकंद), मुले १२ वर्षे वयोगट – सुवर्ण – ४ X २५ मिटर रिले, १.३६.२ सेकंद, मुले १४ वर्षे वयोगट – युग पाटील ( सुवर्ण – लांब उडी, ४.९५ मिटर, सुवर्ण- ६० मिटर धावणे, ७.९ सेकंद), मयांक भोकरे ( सुवर्ण – गोळा फेक, ११.४६ मिटर, रौप्य – लांब उडी, ४.९२ मिटर), कैफ शेख ( रौप्य – ६० मिटर धावणे, ८.१ सेकंद, कांस्य- लांब उडी, ४.६८ मिटर), अश्विन केंद्रे ( रौप्य – गोळा फेक,९.८१ मिटर).  रिले ४X ५० मिटर – सुवर्ण, १.२४.९ सेकंद, रौप्य १.२९.५ सेकंद. मुली १४ वर्ष वयोगट – वैभवी पुजारी ( कांस्य – ६० मिटर धावणे, ८.९ सेकंद), रिले ४X ६० मिटर – रौप्य १.३३.०३ सेकंद.

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन कल्याण: आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन आज कल्याण डोंबिवली महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, समीर भुमकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण प्रभारी नियुक्त्या रद्द करण्याची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता ठाणे महानगर पालिकेकडून केली जात नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे रवींद्र चांगो शिंदे यांनी ठामपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. ठाणे महानगर पालिकेची सुमारे चार वर्षानंतर सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी, कर्मचारी थकीत देणी त्वरीत द्यावी, १०-२०-३० ची ठरावाची त्वरीत अंमल बजावणी करावी, शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभार रद्द करावा,  शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभारी पदे रद्द करावेत, महात्मा फुले खारटन रोड क्रिक रस्त्याचा १० वर्षांचा प्रलंबीत ठराव, तत्काळ मंजुर करावा आदी मागण्यांचे निवेदन रवींद्र शिंदे यांनी ठामपाला दिले.

 नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी दिवा : दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी, खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्मानीय नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, जयंता वालीकर आणि शक्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सोसायटीतील वरिष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटी कमिटीच्या वतीने मोहन मांडवकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा साठी कार्याध्यक्ष संदीप कोकणे, उपाध्यक्ष चिलवेरी, खजिनदार रितेश मिश्रा तसेच राहुल शर्मा, मोहन मांडवकर, जीत शुक्ला, संजीव नारायणकर, सुशील राजपूत, दुर्गेश आणि सतीश गंगातीवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गंगातीवरे यांनी केले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी गौतम कदम यांनी उपस्थित सर्व रहिवाशांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात

भिवंडी:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात  संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.

भारतरत्न मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन मुलगा अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.

छत्रपतींची ४००वी शिवजयंती वर्ल्डक्लास करणार – फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली…