Category: ठाणे

Thane news

भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण शहापूर मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मतदानाच्या दिवशी घोळ दिसला. भिवंडीतील ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या वडघर येथे ८३ वर्षाचे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. मोतीराम जाणू जाधव असे मतदानापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव असून मतदार यादीत त्यांचे नाव गहाळ झाल्याने आज ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे आज मला मतदानाचा हक्क बजावता आला नाही, मतदार यादीतून अचानक माझे नाव कसे गायब झाले याची चौकशी होऊन यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मोतीराम जाधव यांनी केली आहे.

रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः  धावून गेले. आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्याना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्याना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्याना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.

ठाण्यात बोगस मतदान, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : ठाण्यातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यानेच या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा दावाही त्यांनी केला. सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्याच ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे येथील बाजूला असलेल्या सेंट जॉन शाळेत गेलेल्या एका मतदाराने सुध्दा बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. भरत दामजी बव्वा हे आपल्या पत्नी सोबत मतदान करण्यासाठी आले असता त्यांच्या नावा समोर अधिच मतदान झाले असल्याची टिक दिसून आली. म्हणून त्यांनी याचा जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मी त्यांना मतदान ओळखपत्र, आधारकार्ड दाखवले मात्र, तरी सुद्धा तुमचे मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल त्यांनी केला. ठाण्यात बोगस मतदानाचा सुळसुळाट मतदारांनी मतदार केंद्रावर जाऊन टेंडर वोट करण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर ,धर्मवीर आनंद दिघे व भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रावर सकाळी लवकर बोगस मतदान झालेले आहे. मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्यांनी केलं आहे. यासाठी आपला मतदानाचा हक्क वाया घालवू नका आपले मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ नंबर चा फॉर्म भरून पोस्टल बॅलेट द्वारे टेंडर वोट करून घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजन विचारे यांनी मतदारांना केले आहे. मुख्यमंत्र्याना प्रत्यूत्तर कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही. ते 50 जागा जिंकतील तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील त्यांचा काय भरोसा,  असं देखील आव्हाड म्हणाले. बोगस मतदान असल्याचा गंभीर आरोप ठाण्यात बोगस मतदान जोरदार सुरू आहे, शासकीय यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत, जिथे त्यांना मतदान कमी होणार आहे तिथे मशीन त्यांनी स्लो केल्या जातं आहेत.

कपिल पाटील यांचे कुटुंबियांसह दिवेअंजुर येथे मतदान

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिवेअंजुर गावातील प्राथमिक शाळेतील बूथ क्र. ३१८ मध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिवेअंजुर येथील गावात कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह सकाळी सव्वासातच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांचे पत्नी सौ. मीनल यांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. वडील स्व. मोरेश्वर पाटील, भाऊ स्व. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रतिमांना वंदन करून आशीर्वाद घेतले. देशहित व राष्ट्रहितासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजाावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले होते.

दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मतदारांत तीव्र संताप दिवा : दिव्यातील मतदारांचे नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे. दिव्यातील गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे मतदान ते स्वतः रहात असलेल्या ठिकाणापासून नेहमी…

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप…

वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान

वसई : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही…

मतदानाची शाई दाखवा दहा टक्के सूट मिळवा

ठाणे:  लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या मतदार राजासाठी विविध आस्थापनांनी आपल्या उत्पादनावर भरघोस सुट दिली आहे. यामध्ये आता हॉटेल व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत. ‘बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा, आणि १० टक्के डिस्काउंट मिळवा’, अशी योजना कल्याण आणि ठाणे शहरातील प्रमुख…

बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते- शिंदे

ठाणे:  शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मी किमान पाच वेळा तरी त्यांना भाजपसोबत युती करा असे सांगितले होते. त्यांना ते मान्य नव्हते. कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा…

शिवसेना कुणाची ? आज फैसला !

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान होत आहे. उद्या महाराष्ट्रातील होणाऱ्या १३ लोकसभेच्या जागेपैकी मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष…